शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिविरुद्ध ग्रामस्थांचा एल्गार

By admin | Updated: December 16, 2014 22:50 IST

येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून वेकोलि प्रशासन केवळ आश्वासन देत आहे. अद्यापही गावांत सुविधी पुरविण्यात आल्या नाही. त्यामुळे आता ग्रामस्थ संतापले

गोवरी : येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून वेकोलि प्रशासन केवळ आश्वासन देत आहे. अद्यापही गावांत सुविधी पुरविण्यात आल्या नाही. त्यामुळे आता ग्रामस्थ संतापले असून आंदोलनाचा इशारा वेकोलि प्रशासनाला दिला आहे.गावातील समस्यासंदर्भात वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सरपंच सुनील उरकुडे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी चर्चा केली. यावेळी मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले. मात्र दिलेल्या कालावधीत प्रकल्पग्रस्त गावांच्या मागण्या मंजूर न झाल्यास गोवरीवासी आंदोलन छेडणार आहे.वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजुरा तालुक्यात वेस्टर्न कोलफिल्डच्या मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहे. गोवरी, पोवनी, गोयेगाव ही गावे वेकोलीला अगदी लागून असल्याने ती वेकोली डेंजरझोन परिसरात येतात.वेकोलिच्या प्रदूषणामुळे अनेक दुष्परिणाम या गावांना नेहमीच सहन करावे लागत आहे. मात्र वेकोलिकडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही. प्रकल्पग्रस्त ‘दत्तकगाव’ योजनेअंतर्गत वेकोलिने गावात सोईसुविधा करणे आवश्यक आहे. परंतु वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. केवळ आश्वासनावरच आजपर्यंत वेळ मारून नेली आहे. २००६-०७ मध्ये पोवनी कोळसा खाणीसाठी नाला वळविला. मात्र त्यावर कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे पुराच्या पाण्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली येते. याला वेकोलिचे नियोजनशुन्य धोरण जबाबदार असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. गोवरी, पोवनी, साखरी, चिंचोली, गोयेगाव, अंतरगाव येथे वेकोलिचे कामगार मोठ्या प्रमाणात आहे. गावकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांच्या व गावकऱ्यांच्या मुलांना स्कुलबस देण्याची मागणी केली. मात्र वेकोलिने याकडही दुुर्लक्ष केले. कोळसा उत्खननासाठी शक्तीशाली ब्लॉस्टिंग करण्यात येत असल्याने अनेक घरांना तडे गेले आहे. नवीन बांधकाम यामुळे प्रभावित होत आहे. वेकोलितर्फे पाणी उपसामुळे परिसरातील पाण्याची पातळी खालावली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील बोरवेल आटत असल्याने शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. नव्याने निर्माण केलेलि ‘गोवरीडीप’ कोळसा खाण परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. कोळसा वाहतुकीसाठी कोणताही पक्का डांबरी रस्ता तयार न करता केवळ माती टाकून रस्ता तयार केल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेली शेती निकामी होत आहे. मात्र अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही. यासाठी केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर, अर्थ व वनमंत्री मुनगंटीवार, आमदार धोटे, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक ांना निवेदन देण्यात आले असून मागण्या मान्य न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.(वार्ताहर)