शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

दारुबंदीसाठी स्थापणार गावनिहाय समित्या

By admin | Updated: May 31, 2015 01:54 IST

दारुबंदी हा विषय तात्पुरता नसून दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा आहे. यात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे, त्याशिवाय प्रभावी यश दिसणार नाही.

वित्तमंत्री म्हणतात : पावसाळी अधिवशेनात कायद्यात बदल करणारचंद्रपूर: दारुबंदी हा विषय तात्पुरता नसून दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा आहे. यात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे, त्याशिवाय प्रभावी यश दिसणार नाही. हे लक्षात घेऊन दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी गावनिहाय समित्या तयार केल्या जातील. जिल्हाभरातील अंदाजे दोन हजार समित्यामध्ये २० हजार महिला व ८४७ सरपंचांचा समावेश असेल. या समित्यानना कायदेशिर अधिकारही दिले जातील, असा मानस वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी दारुबंदी अंमलबजावणी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.पी. कल्याणकर, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक सुरेंद्र्र मनपिया, अप्पर पोलीस अधिक्षक संजय जाधव, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी व पोलीस अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.प्रशासनाला निर्देश नेताना ना.मुनगंटीवार म्हणाले, दारुबंदी संबंधी नागुिरकांमध्ये जनजागृती करायला हवी. ग्राम पंचायत व पंचायत समिती स्तरावर व्यसनमुक्तीचे मेळावे घेण्यात घेतले जावे, अशी अपेक्षा त्याननी व्यक्त केली.पोलीस विभागाने दारुबंदी अंमलबजावणीसाठी विशेष शाखा स्थापन करण्याच्या सुचना त्याननी केल्या. तक्रार निवारणासाठी व तक्रारदाराला फिडबॅक देण्यासाठी आधुनिक सॉफ्टवेअर तयार करता येईल का यावर विचार करावा, असे त्यांनी सुचविले. पोलीस विभागाने दारु विकणाऱ्यांना पाठीशी न घालता कडक कारवाई करावी. वर कडक कारवाई करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. ही लढाई सोपी नसल्याने एकत्रितपणे लढण्यासाठी त्यांनी यंत्रणेला आवाहन केले.दारूबंदीसंर्भातील कारवाईबाबत माहिती देताना जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत ८४८ कारवाया करण्यात आल्या असून ५५ लाख रूपयांची दारु जप्त केली आहे. टोल फ्री नंबरवर ५१६ कॉल प्राप्त झाले असून ब-याच ठिकाणी कारवाई यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. कॉल करणा-या व्यक्तीला काय कारवाई झाली याबाबत फिडबँक देण्याचे काम सुरु केल्याचे ते म्हणाले. मद्य चाचणी प्रयोग शाळा चंद्रपुरात असावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. बैठकीला सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)ंपावसाळी अधिवेशनात कायद्यात बदलना. मुनगंटीवार म्हणाले, दारूबंदीसंदर्भातील सध्याच्या प्रचलित कायद्यामुळे या अवैध व्यवसायात गुंतलेल्यांवर कडक कारवाई होत नाही. कायद्यातील तरतुदीचा आधार घेऊन हे अवैध व्यावसायिक लवकर तुरूंगाबाहेर येतात. दारु विकणे व वहन करणे यासाठी शिक्षेची तरतूद कमी आहे. हा अडथळा लक्षात घेता, येत्या पावसाळी अधिवेशनात दारूविक्रसंर्भातील कायद्यामध्ये मोठया प्रमाणात बदल करुन कडक शिक्षेची तरतूद करण्यात येईल.