शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभाच गावाची संसद - अण्णा हजारे

By admin | Updated: December 2, 2014 23:03 IST

शब्दाने ज्ञान सांगून प्रभाव पडत नाही. त्यासाठी आधी कृती केली पाहिजे. आपण जर तुकडोजी महाराज, तुकाराम दादा, महात्मा गांधी यांचे विचार अंगिकारण्याची प्रतिज्ञा केली तर येत्या पाच वर्षांत

ब्रह्मपुरी : शब्दाने ज्ञान सांगून प्रभाव पडत नाही. त्यासाठी आधी कृती केली पाहिजे. आपण जर तुकडोजी महाराज, तुकाराम दादा, महात्मा गांधी यांचे विचार अंगिकारण्याची प्रतिज्ञा केली तर येत्या पाच वर्षांत विदर्भ बदलून जाईल. शुद्ध आचार, विचार, निष्कलंक जीवन अंगिकारायचे असेल तर वाईट गोष्टींचा त्याग करावा लागेल. देश बदलविण्यापूर्वी पहिल्यांदा गावापासून सुरूवात करावी लागेल. डोनेशन किंवा अनुदान देऊन देश बदलता येणार नाही. त्यासाठी उत्तम कार्यकर्ता बनून पुढाकार घ्यावा लागेल. लोकसभा, विधानसभेपेक्षाही ग्रामसभा ही सर्वोच्च आहे. त्यामुळे ग्रामसभा हिच गावाची संसद होय, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. ते कर्मयोगी संत तुकारामदादा गीताचार्य जन्मशताब्दी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते. अड्याळ (टेकडी) येथे तीन दिवसीय जन्मशताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमाची सांगता मंगळवारी झाली. या कार्यक्रमासाठी ेसमाजसेवक अण्णा हजारे, सिंधूताई सपकाळ, ुलक्ष्मणदादा नारखेडे, उमेश चौबे, देवाजी तोफा, सत्यपाल महाराज, भाऊसाहेब थुटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी भजनाने, श्रमदान करून झाली. दुपारच्या सत्रात समारोपीय कार्यक्रमात सिंधूताई सपकाळ यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, बापाची गरीबी झाकायसाठी मुलीचा जन्म व्हावा, देशाची इज्जत राखण्यासाठी आईचा जन्म व्हावा. दादांनी दिलेला वसा सतत जिवंत ठेवा, असे त्यांनी सांगितले. महिलांना घराबाहेर काढा. त्यांना सक्षम बनवा, असे वेळोवेळी सांगितल्यामुळे महिलांना चांगले दिवस आले आहेत. आत्महत्या शेतकरी करतो. परंतु तो माणुससच असतो. महिला आत्महत्या करीत नाही. कारण ती आई असते, असेही सिंधूताईंनी सांगितले. सत्यपाल महाराजांनी आपल्या भाषणातून बुवाबाजीवर प्रहार केला. देवाजी तोफा, लक्ष्मणदादा नारखेडे यांनीही या समारोपीय कार्यक्रमात विचार मांडले. या कार्यक्रमाला हजारो गुरूदेवभक्त उपस्थित होते. प्रास्ताविक कुंभारे यांनी तर, संचालन रविदादा खळतकर यांनी केले. तीन दिवस चाललेल्या महोत्सवात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी परिसरातील बहुसंख्य गुरुदेव भक्त उपस्थित होते.(प्रतिनिधी)