शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
3
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
6
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
7
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
8
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
9
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
10
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
11
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
13
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
14
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
15
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
16
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
17
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
18
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
19
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
20
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय

ग्रामसभाच गावाची संसद - अण्णा हजारे

By admin | Updated: December 2, 2014 23:03 IST

शब्दाने ज्ञान सांगून प्रभाव पडत नाही. त्यासाठी आधी कृती केली पाहिजे. आपण जर तुकडोजी महाराज, तुकाराम दादा, महात्मा गांधी यांचे विचार अंगिकारण्याची प्रतिज्ञा केली तर येत्या पाच वर्षांत

ब्रह्मपुरी : शब्दाने ज्ञान सांगून प्रभाव पडत नाही. त्यासाठी आधी कृती केली पाहिजे. आपण जर तुकडोजी महाराज, तुकाराम दादा, महात्मा गांधी यांचे विचार अंगिकारण्याची प्रतिज्ञा केली तर येत्या पाच वर्षांत विदर्भ बदलून जाईल. शुद्ध आचार, विचार, निष्कलंक जीवन अंगिकारायचे असेल तर वाईट गोष्टींचा त्याग करावा लागेल. देश बदलविण्यापूर्वी पहिल्यांदा गावापासून सुरूवात करावी लागेल. डोनेशन किंवा अनुदान देऊन देश बदलता येणार नाही. त्यासाठी उत्तम कार्यकर्ता बनून पुढाकार घ्यावा लागेल. लोकसभा, विधानसभेपेक्षाही ग्रामसभा ही सर्वोच्च आहे. त्यामुळे ग्रामसभा हिच गावाची संसद होय, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. ते कर्मयोगी संत तुकारामदादा गीताचार्य जन्मशताब्दी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते. अड्याळ (टेकडी) येथे तीन दिवसीय जन्मशताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमाची सांगता मंगळवारी झाली. या कार्यक्रमासाठी ेसमाजसेवक अण्णा हजारे, सिंधूताई सपकाळ, ुलक्ष्मणदादा नारखेडे, उमेश चौबे, देवाजी तोफा, सत्यपाल महाराज, भाऊसाहेब थुटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी भजनाने, श्रमदान करून झाली. दुपारच्या सत्रात समारोपीय कार्यक्रमात सिंधूताई सपकाळ यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, बापाची गरीबी झाकायसाठी मुलीचा जन्म व्हावा, देशाची इज्जत राखण्यासाठी आईचा जन्म व्हावा. दादांनी दिलेला वसा सतत जिवंत ठेवा, असे त्यांनी सांगितले. महिलांना घराबाहेर काढा. त्यांना सक्षम बनवा, असे वेळोवेळी सांगितल्यामुळे महिलांना चांगले दिवस आले आहेत. आत्महत्या शेतकरी करतो. परंतु तो माणुससच असतो. महिला आत्महत्या करीत नाही. कारण ती आई असते, असेही सिंधूताईंनी सांगितले. सत्यपाल महाराजांनी आपल्या भाषणातून बुवाबाजीवर प्रहार केला. देवाजी तोफा, लक्ष्मणदादा नारखेडे यांनीही या समारोपीय कार्यक्रमात विचार मांडले. या कार्यक्रमाला हजारो गुरूदेवभक्त उपस्थित होते. प्रास्ताविक कुंभारे यांनी तर, संचालन रविदादा खळतकर यांनी केले. तीन दिवस चाललेल्या महोत्सवात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी परिसरातील बहुसंख्य गुरुदेव भक्त उपस्थित होते.(प्रतिनिधी)