शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

रेल्वेला कर्मचारी पुरविणारे एक गाव

By admin | Updated: October 25, 2015 00:51 IST

काही काही गावाचे एक वैशिष्ट्य असते आणि या वैशिष्ट्यामुळेच त्या गावाची पंचक्रोशीत ओळख निर्माण होत असते.

नागभीड : काही काही गावाचे एक वैशिष्ट्य असते आणि या वैशिष्ट्यामुळेच त्या गावाची पंचक्रोशीत ओळख निर्माण होत असते. नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव या गावाचेही असेच आहे. तेथील रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता या गावाची ओळख रेल्वे कर्मचाऱ्यांचे गाव म्हणूनच निर्माण झाली आहे.नवेगाव पांडव हे गाव नागभीडपासून सात कि.मी. अंतरावर आहे. नागभीड येथे रेल्वेचे जंक्शन आहे. नागभीड येथूनच गोंदिया, नागपूर आणि चंद्रपूरकडे रेल्वे गाड्या रवाना होतात. नागभीडची रेल्वे १०० ते १२५ वर्षांपूर्वीची आहे. त्याकाळी रेल्वेच्या निर्माणाकरिता कामगारांची मोठ्या प्रमाणावर गरज होती. आणि लोकांना कामाची, या गरजेतूनच लोक रेल्वेकडे वळले असावेत.सदर प्रतिनिधीने या गावात जावून रेल्वेत कार्यरत असलेल्या व्यक्तींची माहिती काढली असता ६० ते ७० व्यक्ती आजही रेल्वेत कार्यरत असल्याची माहिती मिळाली. अनेकजण निवृत्त झाले आहेत. निवृत्त लोकांची संख्या लक्षात घेतली तर ही संख्या १०० च्या घरात पोहचते. हे कार्यरत कर्मचारी केवळ नागभीड येथेच कार्यरत नाहीत तर विदर्भ व इतर भागातही कार्यरत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, अरुण फुकट, रमेश फुकट, आनंद फुकट, मंसाराम पांडव, रामभाऊ चौधरी, शांताराम लटारे, मनोज आटमांडे, हिवराज कोहपरे, गोपाळा म्हशाखेत्री, थामदेव बोरकुटे, बंडू आटमांडे, मारोती ठाकरे, निरंजन शेंडे, प्रकाश लटारे, सुधाकर पांडव, खेकारे, सुमित पानसे, अनिल रामटेके, भगवान मेश्राम, श्रावण ठाकरे, किसन पांडव, रामेश्वर पांडव, निखिल नवघडे, अशोक उरकुडे, रामटेके, कवलदास बोरकुटे, नवघडे, पांडव, कुडलिक अटमांडे, हरिचंद्र निमगडे, माधुरी रडके, नागोजी रडके, बाबुराव आटमांडे, विठ्ठल तिवाडे, मारोती म्हशाखेत्री, महादेव म्हशाखेत्री, गोपाळा म्हशाखेत्री, मारोतीलाल पांडव, नामदेव आटमांडे, कवडू नवघडे, चंद्रुजी पांडव, रघुनाथ पानसे, पंढरी तिजारे, शशिभूषण रामटेके, दामोदर नवघडे, गुलाब बोरकुटे, श्रीपत बोरकुटे, श्रीराम बोरकुटे आदी रेल्वेत कार्यरत व निवृत्त लोकांची नावे मिळाली. उल्लेखनीय बाब अशी की, अनेक कर्मचारी मृत पावले असून त्याचे कुटुंबीय निवृत्ती वेतन घेत आहेत. निवृत्तीवेतन धारकांचीही संख्याही बरीच आहे. केवळ रेल्वेतच नाही तर शिक्षण आणि प्रशासनाच्या इतर विभागातही या गावातील कर्मचाऱ्यांची संख्या बरीच आहे. गावात कर्मचारी बरेच असल्याने एक सधन गाव अशीही या गावाची ओळख आहे. (तालुका प्रतिनिधी)