शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेला कर्मचारी पुरविणारे एक गाव

By admin | Updated: October 25, 2015 00:51 IST

काही काही गावाचे एक वैशिष्ट्य असते आणि या वैशिष्ट्यामुळेच त्या गावाची पंचक्रोशीत ओळख निर्माण होत असते.

नागभीड : काही काही गावाचे एक वैशिष्ट्य असते आणि या वैशिष्ट्यामुळेच त्या गावाची पंचक्रोशीत ओळख निर्माण होत असते. नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव या गावाचेही असेच आहे. तेथील रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता या गावाची ओळख रेल्वे कर्मचाऱ्यांचे गाव म्हणूनच निर्माण झाली आहे.नवेगाव पांडव हे गाव नागभीडपासून सात कि.मी. अंतरावर आहे. नागभीड येथे रेल्वेचे जंक्शन आहे. नागभीड येथूनच गोंदिया, नागपूर आणि चंद्रपूरकडे रेल्वे गाड्या रवाना होतात. नागभीडची रेल्वे १०० ते १२५ वर्षांपूर्वीची आहे. त्याकाळी रेल्वेच्या निर्माणाकरिता कामगारांची मोठ्या प्रमाणावर गरज होती. आणि लोकांना कामाची, या गरजेतूनच लोक रेल्वेकडे वळले असावेत.सदर प्रतिनिधीने या गावात जावून रेल्वेत कार्यरत असलेल्या व्यक्तींची माहिती काढली असता ६० ते ७० व्यक्ती आजही रेल्वेत कार्यरत असल्याची माहिती मिळाली. अनेकजण निवृत्त झाले आहेत. निवृत्त लोकांची संख्या लक्षात घेतली तर ही संख्या १०० च्या घरात पोहचते. हे कार्यरत कर्मचारी केवळ नागभीड येथेच कार्यरत नाहीत तर विदर्भ व इतर भागातही कार्यरत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, अरुण फुकट, रमेश फुकट, आनंद फुकट, मंसाराम पांडव, रामभाऊ चौधरी, शांताराम लटारे, मनोज आटमांडे, हिवराज कोहपरे, गोपाळा म्हशाखेत्री, थामदेव बोरकुटे, बंडू आटमांडे, मारोती ठाकरे, निरंजन शेंडे, प्रकाश लटारे, सुधाकर पांडव, खेकारे, सुमित पानसे, अनिल रामटेके, भगवान मेश्राम, श्रावण ठाकरे, किसन पांडव, रामेश्वर पांडव, निखिल नवघडे, अशोक उरकुडे, रामटेके, कवलदास बोरकुटे, नवघडे, पांडव, कुडलिक अटमांडे, हरिचंद्र निमगडे, माधुरी रडके, नागोजी रडके, बाबुराव आटमांडे, विठ्ठल तिवाडे, मारोती म्हशाखेत्री, महादेव म्हशाखेत्री, गोपाळा म्हशाखेत्री, मारोतीलाल पांडव, नामदेव आटमांडे, कवडू नवघडे, चंद्रुजी पांडव, रघुनाथ पानसे, पंढरी तिजारे, शशिभूषण रामटेके, दामोदर नवघडे, गुलाब बोरकुटे, श्रीपत बोरकुटे, श्रीराम बोरकुटे आदी रेल्वेत कार्यरत व निवृत्त लोकांची नावे मिळाली. उल्लेखनीय बाब अशी की, अनेक कर्मचारी मृत पावले असून त्याचे कुटुंबीय निवृत्ती वेतन घेत आहेत. निवृत्तीवेतन धारकांचीही संख्याही बरीच आहे. केवळ रेल्वेतच नाही तर शिक्षण आणि प्रशासनाच्या इतर विभागातही या गावातील कर्मचाऱ्यांची संख्या बरीच आहे. गावात कर्मचारी बरेच असल्याने एक सधन गाव अशीही या गावाची ओळख आहे. (तालुका प्रतिनिधी)