शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

देऊरवाडा गाव तहानेने व्याकूळ

By admin | Updated: February 10, 2016 01:10 IST

तालुक्यातील देऊरवाडा गावातील गेल्या पाच महिन्यांपासून टाकीत पाणी नसल्याने संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे हे गाव तहानेने व्याकूळ झाले आहे.

पाच महिन्यांपासून नळाला पाणी नाही : दोन किमीवरून आणावे लागते पाणीविनायक येसेकर भद्रावतीतालुक्यातील देऊरवाडा गावातील गेल्या पाच महिन्यांपासून टाकीत पाणी नसल्याने संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे हे गाव तहानेने व्याकूळ झाले आहे. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन किलोमिटरची पायपीट करावी लागते. या गावातील भिषण समस्येकडे लक्ष देवून ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समिती, जिल्हा परिषद, वेकोलिी व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करुनसुद्धा याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने गावात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे.९०० लोकसंख्या असलेल्या या देऊरवाडा गावाला पूर्वी पाण्याचा गाव म्हणून ओळखला जात होता. मात्र या गावाला कोळसा खाणीने वेढले. परिणामी गावातील पाण्याची पातळी खूपच खोल गेली आहे. या गावात पाच हातपंप असून त्यातील चार हातपंप बंद स्थितीत आहेत. सुरु असलेल्या एका हातपंपावर गावकऱ्यांची पाण्यासाठी गर्दी उसळते. मात्र बोअरवेलच्या पाण्याची पातळी अतिशय या पंपातील पाणी खूप खोलवर गेल्याने ते काढण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काहींनी तर बैल बंडीच्या माध्यमातून पाणी पुरवठा चालू केला आहे. त्यांना पाणी आणण्यासाठी काहीही साधन नसल्याने डोक्यावर गुंड घेवून दोन किलोमिटर अंतरावरुन पायपीट करत पाणी आणावे लागत आहे.शेतावरुन मोलमजुरी करुन घरी परत आल्यानंतर येथील गावकऱ्यांना पाण्याची विवंचना असते. पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती करावी लागत असल्याचे चित्र या गावात प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर दिसून आले. या गावातील नागरिकांच्या पाण्याविषयी समस्या जाणून घेतल्यानंतर येथील सरपंच सुनिता बल्की यांची भेट घेतली असता, त्या म्हणाल्या, पूर्वी या गावात लोकवर्गणीतून ट्युबवेल खोदण्यात आली होती. ती गेल्या पाच महिन्यांपूर्वी ती निकामी झाल्याने पाण्याच्या टाकीमध्ये येणारे पाणी बंद झाले. त्यामुळे संपूर्ण गावात नळाद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. गावात बिकट पाणी समस्या निर्माण झाली आहे. या बाबत ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंत्यांना चंद्रपूर यांना पत्राद्वारे कळविले. संवर्ग विकास अधिकारी यांना पत्र दिले. वेकोलि प्रशासनाला, लोकप्रतिनिधींनासुद्धा त्वरीत चालू करण्यासंबंधी पत्र व्यवहार केला. मात्र याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याने संपूर्ण गावकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.