शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देऊरवाडा गाव तहानेने व्याकूळ

By admin | Updated: February 10, 2016 01:10 IST

तालुक्यातील देऊरवाडा गावातील गेल्या पाच महिन्यांपासून टाकीत पाणी नसल्याने संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे हे गाव तहानेने व्याकूळ झाले आहे.

पाच महिन्यांपासून नळाला पाणी नाही : दोन किमीवरून आणावे लागते पाणीविनायक येसेकर भद्रावतीतालुक्यातील देऊरवाडा गावातील गेल्या पाच महिन्यांपासून टाकीत पाणी नसल्याने संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे हे गाव तहानेने व्याकूळ झाले आहे. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन किलोमिटरची पायपीट करावी लागते. या गावातील भिषण समस्येकडे लक्ष देवून ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समिती, जिल्हा परिषद, वेकोलिी व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करुनसुद्धा याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने गावात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे.९०० लोकसंख्या असलेल्या या देऊरवाडा गावाला पूर्वी पाण्याचा गाव म्हणून ओळखला जात होता. मात्र या गावाला कोळसा खाणीने वेढले. परिणामी गावातील पाण्याची पातळी खूपच खोल गेली आहे. या गावात पाच हातपंप असून त्यातील चार हातपंप बंद स्थितीत आहेत. सुरु असलेल्या एका हातपंपावर गावकऱ्यांची पाण्यासाठी गर्दी उसळते. मात्र बोअरवेलच्या पाण्याची पातळी अतिशय या पंपातील पाणी खूप खोलवर गेल्याने ते काढण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काहींनी तर बैल बंडीच्या माध्यमातून पाणी पुरवठा चालू केला आहे. त्यांना पाणी आणण्यासाठी काहीही साधन नसल्याने डोक्यावर गुंड घेवून दोन किलोमिटर अंतरावरुन पायपीट करत पाणी आणावे लागत आहे.शेतावरुन मोलमजुरी करुन घरी परत आल्यानंतर येथील गावकऱ्यांना पाण्याची विवंचना असते. पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती करावी लागत असल्याचे चित्र या गावात प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर दिसून आले. या गावातील नागरिकांच्या पाण्याविषयी समस्या जाणून घेतल्यानंतर येथील सरपंच सुनिता बल्की यांची भेट घेतली असता, त्या म्हणाल्या, पूर्वी या गावात लोकवर्गणीतून ट्युबवेल खोदण्यात आली होती. ती गेल्या पाच महिन्यांपूर्वी ती निकामी झाल्याने पाण्याच्या टाकीमध्ये येणारे पाणी बंद झाले. त्यामुळे संपूर्ण गावात नळाद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. गावात बिकट पाणी समस्या निर्माण झाली आहे. या बाबत ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंत्यांना चंद्रपूर यांना पत्राद्वारे कळविले. संवर्ग विकास अधिकारी यांना पत्र दिले. वेकोलि प्रशासनाला, लोकप्रतिनिधींनासुद्धा त्वरीत चालू करण्यासंबंधी पत्र व्यवहार केला. मात्र याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याने संपूर्ण गावकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.