शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

पथदिव्यांअभावी गाव अंधारात

By admin | Updated: December 30, 2015 01:46 IST

स्थानिक नगरपंचायत निवडणुक अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसतसा त्या-त्या प्रभागातील उमेदवाराने मतदारांशी आपला संपर्क वाढविला आहे.

अस्वच्छतेने बेजार : नागरिकांना विकासाची अपेक्षासंघरक्षित तावाडे जिवतीस्थानिक नगरपंचायत निवडणुक अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसतसा त्या-त्या प्रभागातील उमेदवाराने मतदारांशी आपला संपर्क वाढविला आहे. मात्र भेटण्यासाठी आलेल्या उमेदवारांना प्रभागातील समस्यांबाबत नागरिक अवगत करीत असल्याचे चित्र येथे पहायला मिळत आहे. जिवती नगरपंचायत होण्याअगोदर सहा किलोमीटर अंतरावरील सारंगपूर हे गावसुद्धा जिवती गट ग्रामपंचायतीअंतर्गत येत होते. आता हे गाव नगरपंचायतीला जोडण्यात आले आहे. येथे प्रभाग क्रमांक पाच व सहा असे दोन प्रभाग पडले आहेत. असे असले तरी हे गाव अनेक समस्यांनी ग्रासले आहे. या गावात जाण्यासाठी रस्ता असूनही तो नसल्यासारखाच आहे. या रस्त्यावरील गिट्टी ठिकठिकाणी उखडली आहे. सोबतच या गावात पाण्याची टंचाई असून गावात विजेचे खांब नाहीत. वस्तीतील रस्त्यांची कामे एक वर्षांपूर्वी करण्यात आली. परंतु आता संपूर्ण रस्ते उखडून गेले आहेत. पाण्याची समस्या सुटावी या हेतूने जलस्वराज्य योजनेतून विहीर बांधण्यात आली. पण कालांतराने ही योजनाच बंद पडली. प्रभाग सातमध्ये अनेक ठिकाणी अस्वच्छताच असल्याचे चित्र बघायला मिळते. येथे खांब तर आहेत, पण त्यावर पथदिवे नाहीत. आजपर्यंत ज्या समस्यांशी सामना केला, त्याचा या निवडणुकीनंतर तरी निपटारा व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. निवडून येणारा उमेदवार विकास कामे करणारा असावा, असी येथील मतदारांची अपेक्षा आहे. सारंगपूर येथे प्रभाग पाच व प्रभाग सहा असून या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपा पक्षाचा प्रत्येकी एक-एक उमेदवार उभा आहे. काँग्रेसने मात्र या ठिकाणी आपला उमेदवार उभा केला नाही. प्रभाग पाच सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव असून भाजपाचे रामराव चव्हाण तर राष्ट्रवादीचे केशव चव्हाण असे दोनच उमेदवार येथे उभे आहेत. प्रभाग सहा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव असून भाजपाकडून अनुसया राठोड तर राष्ट्रवादीकडून शेवंताबाई राठोड असे दोनच उमेदवार निवडणूक लढवत आहेत. प्रभाग सातमध्ये सर्वसाधारण महिला राखीव आहे. काँग्रेसकडून हेमलता तिडके, भाजपाच्या श्रद्धा वडेट्टीवार, राष्ट्रवादीकडून कविता झाडे तर बहुजन समाजपार्टीकडून चैत्राबाई गायकवड रिंगणात आहेत. या तिनही प्रभागातील उभ्या असणाऱ्या समस्या पाहता मतदारांचा कौल कुणाकडे जाणार, हा प्रश्न आहे.