शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पथदिव्यांअभावी गाव अंधारात

By admin | Updated: December 30, 2015 01:46 IST

स्थानिक नगरपंचायत निवडणुक अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसतसा त्या-त्या प्रभागातील उमेदवाराने मतदारांशी आपला संपर्क वाढविला आहे.

अस्वच्छतेने बेजार : नागरिकांना विकासाची अपेक्षासंघरक्षित तावाडे जिवतीस्थानिक नगरपंचायत निवडणुक अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसतसा त्या-त्या प्रभागातील उमेदवाराने मतदारांशी आपला संपर्क वाढविला आहे. मात्र भेटण्यासाठी आलेल्या उमेदवारांना प्रभागातील समस्यांबाबत नागरिक अवगत करीत असल्याचे चित्र येथे पहायला मिळत आहे. जिवती नगरपंचायत होण्याअगोदर सहा किलोमीटर अंतरावरील सारंगपूर हे गावसुद्धा जिवती गट ग्रामपंचायतीअंतर्गत येत होते. आता हे गाव नगरपंचायतीला जोडण्यात आले आहे. येथे प्रभाग क्रमांक पाच व सहा असे दोन प्रभाग पडले आहेत. असे असले तरी हे गाव अनेक समस्यांनी ग्रासले आहे. या गावात जाण्यासाठी रस्ता असूनही तो नसल्यासारखाच आहे. या रस्त्यावरील गिट्टी ठिकठिकाणी उखडली आहे. सोबतच या गावात पाण्याची टंचाई असून गावात विजेचे खांब नाहीत. वस्तीतील रस्त्यांची कामे एक वर्षांपूर्वी करण्यात आली. परंतु आता संपूर्ण रस्ते उखडून गेले आहेत. पाण्याची समस्या सुटावी या हेतूने जलस्वराज्य योजनेतून विहीर बांधण्यात आली. पण कालांतराने ही योजनाच बंद पडली. प्रभाग सातमध्ये अनेक ठिकाणी अस्वच्छताच असल्याचे चित्र बघायला मिळते. येथे खांब तर आहेत, पण त्यावर पथदिवे नाहीत. आजपर्यंत ज्या समस्यांशी सामना केला, त्याचा या निवडणुकीनंतर तरी निपटारा व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. निवडून येणारा उमेदवार विकास कामे करणारा असावा, असी येथील मतदारांची अपेक्षा आहे. सारंगपूर येथे प्रभाग पाच व प्रभाग सहा असून या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपा पक्षाचा प्रत्येकी एक-एक उमेदवार उभा आहे. काँग्रेसने मात्र या ठिकाणी आपला उमेदवार उभा केला नाही. प्रभाग पाच सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव असून भाजपाचे रामराव चव्हाण तर राष्ट्रवादीचे केशव चव्हाण असे दोनच उमेदवार येथे उभे आहेत. प्रभाग सहा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव असून भाजपाकडून अनुसया राठोड तर राष्ट्रवादीकडून शेवंताबाई राठोड असे दोनच उमेदवार निवडणूक लढवत आहेत. प्रभाग सातमध्ये सर्वसाधारण महिला राखीव आहे. काँग्रेसकडून हेमलता तिडके, भाजपाच्या श्रद्धा वडेट्टीवार, राष्ट्रवादीकडून कविता झाडे तर बहुजन समाजपार्टीकडून चैत्राबाई गायकवड रिंगणात आहेत. या तिनही प्रभागातील उभ्या असणाऱ्या समस्या पाहता मतदारांचा कौल कुणाकडे जाणार, हा प्रश्न आहे.