शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

चंद्रपूर जिल्ह्यातले एकारा हे गाव कायमचे जगापासून तुटलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 11:12 IST

विज्ञानाने फार मोठी प्रगती केली आहे. अमेरिकेत काय घडले, हे एका मिनिटात भारताच्या टोकावर असलेल्या कन्याकुमारीत समजते. पण ब्रम्हपुरी तालुक्यातील एकारा गाव मात्र आजही संपर्क कक्षेच्या बाहेर आहे.

ठळक मुद्दे६ वाजताच सर्वत्र शांतता

घनश्याम नवघडे।आॅनलाईन लोकमतनागभीड : विज्ञानाने फार मोठी प्रगती केली आहे. अमेरिकेत काय घडले, हे एका मिनिटात भारताच्या टोकावर असलेल्या कन्याकुमारीत समजते. पण ब्रम्हपुरी तालुक्यातील एकारा गाव मात्र आजही संपर्क कक्षेच्या बाहेर आहे.ब्रम्हपुरी तालुक्याच्या शेवटच्या टोकाला हे गाव असून घनदाट जंगलात वसले आहे. गावाची लोकसंख्या दीड हजारांच्या आसपास आहे. परिसरातील गावांचे हे गाव मुख्यालय आहे. ये-जा करायला पक्के डांबरी रस्ते असले तरी संपर्काच्या दृष्टीने भ्रमणध्वनीची कोणतीही सेवा या ठिकाणी काम करीत नाही. आज सर्वच मोबाईल कंपन्यांनी आपल्या सेवेच्या नेटवर्कचे जाळे सर्वत्र विनले आहे. मात्र या परिसरात सेवा देण्यास या कंपन्याही अपयशी ठरल्या आहेत. या गावातून इतर गावांसोबत मोबाईलद्वारे संपर्क करतो म्हटले तर घरावर चढावे लागते. एवढे करुनही संपर्क होईलच, याची शाश्वती नाही. येथील लोकांनी महागडे मोबाईल खरेदी केले आहेत. पण ते कुचकामी ठरले आहेत. या ठिकाणी एक शासनमान्य आश्रमशाळा आहे. साडेतीनशे ते चारशे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. वन विभागाचे कार्यालय येथे असून विश्रामगृहही आहे. जिल्हा परिषदेची केंद्रीय शाळा या ठिकाणी कार्यरत आहे. एवढेच नाही तर परिसरात १० ते १२ गावांचा समावेशही आहे. एवढया जमेच्या बाजू असताना मोबाईल कंपन्यांनी आपले नेटवर्क उभारू नये, हे आश्चर्यच आहे.

६ वाजताच सर्वत्र शांततासंपूर्ण परिसर घनदाट जंगलाने व्याप्त आहे. त्यामुळे वाघ, बिबट व अन्य जंगली श्वापदांचा वावर याठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. परिणामी लोक नेहमीच या प्राण्यांच्या दहशतीखाली वावरत असतात. संध्याकाळी ६ वाजताच या गावात सर्वत्र शांतता पसरली असते.

तर रेल्वे मार्ग होईल जवळ

हे गाव नागभीड तालुक्यातील बाळापूरला अगदी जवळ आहे. कागदोपत्री नोंद असलेल्या आणि जंगलातून गेलेल्या कच्च्या रस्त्याचे पक्क्या रस्त्यात रूपांतर केले तर हे अंतर केवळ १० कि.मी. होईल, अशी माहिती तेथील एक कर्मचारी गणेश कडस्कर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यामुळे हे गावच नाही तर परिसरातील काही गावेसुद्धा बाळापूर जाणाऱ्या रेल्वेशी जुळतील व जिल्ह्याच्या अगदी जवळ येतील.

टॅग्स :agricultureशेती