शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

रोहित्र लावून देण्यास विद्युत मंडळाची "ना"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : शेतातील कृषीपंपांसाठी लावण्यात आलेले रोहित्र बंद पडले. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ते काढून नेण्यात आले असले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागभीड : शेतातील कृषीपंपांसाठी लावण्यात आलेले रोहित्र बंद पडले. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ते काढून नेण्यात आले असले तरी ते लावून देण्यात विद्युत मंडळाची चालढकल सुरू आहे. या प्रकाराने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.

वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वीज जोडण्या देण्यात आल्या; मात्र लावण्यात आलेले काही रोहित्र निकृष्ट निघाले. परिणामी, अनेक शेतकऱ्यांचे वर्षभरातच रोहित्र बंद पडले. रोहित्र बंद पडल्यामुळे वीज पुरवठाही बंद झाला. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडणीचे रोहित्र बंद पडले, त्या शेतकऱ्यांनी वीज वितरणकडे तक्रार केल्यानंतर दुरुस्तीसाठी म्हणून ते वीज मंडळाकडून रोहित्र काढून घेण्यात आले; मात्र या बाबीस आता सहा-सात महिन्यांचा कालावधी होत असला तरी ते अद्यापही लावून देण्यात आले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. विश्वसनीय माहितीनुसार, अशा बंद असलेल्या व वीज वितरण कंपनीने दुरुस्तीसाठी काढून घेतलेल्या रोहित्रांची संख्या २० च्या घरात आहे.

बॉक्स

आता स्वतंत्र रोहित्र

नागभीड तालुक्यात २००० ते मार्च २०१८ पर्यंत २ हजार २०३ शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली. काही वर्षांपूर्वी रोहित्र सामूहिक म्हणजे कमीत कमी १० शेतकऱ्यांना देण्यात येत होते; पण आता स्वतंत्र रोहित्र देण्यात येत आहे. नागभीड तालुक्यात मुख्य पीक धानाचे आहे. सद्यस्थितीत पाऊस योग्य पडत असला तरी तो, केव्हा आपला इंगा दाखवेल, याचा भरवसा नाही. वीज वितरण कंपनीने ज्या शेतकऱ्यांचे रोहित्र दुरुस्तीसाठी काढले त्यांचे रोहित्र त्वरित लावून द्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

कोट

काही रोहित्र दुरुस्तीसाठी काढून आणण्यात आले आहेत; मात्र नियमानुसार थकीत असलेले बिल अदा केल्याशिवाय रोहित्र लावून देता येणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी बिल भरले त्या शेतकऱ्यांचे रोहित्र लावून देण्यात आले आहेत.

- आर. यु. कारगावकर

उपविभागीय अभियंता, नागभीड.