शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

रोहित्र लावून देण्यास विद्युत मंडळाची "ना"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:20 IST

घनश्याम नवघडे नागभीड : शेतातील कृषिपंपांसाठी लावण्यात आलेले रोहित्र बंद पडले. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ते काढून नेण्यात आले असले तरी ...

घनश्याम नवघडे

नागभीड : शेतातील कृषिपंपांसाठी लावण्यात आलेले रोहित्र बंद पडले. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ते काढून नेण्यात आले असले तरी ते लावून देण्यात विद्युत मंडळाची चालढकल सुरू आहे. या प्रकाराने शेतकरीवर्गात नाराजी व्यक्त होत आहे.

महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वीज जोडण्या देण्यात आल्या. मात्र, लावण्यात आलेले काही रोहित्र निकृष्ट निघाले. परिणामी अनेक शेतकऱ्यांचे वर्षभरातच रोहित्र बंद पडले. रोहित्र बंद पडल्यामुळे वीज पुरवठाही बंद झाला. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडणीचे रोहित्र बंद पडले. त्या शेतकऱ्यांनी वीज वितरणकडे तक्रार केल्यानंतर दुरूस्तीसाठी म्हणून ते वीज मंडळाकडून रोहित्र काढून घेण्यात आले. मात्र, या बाबीस आता सहा ते सात महिन्यांचा कालावधी होत असला तरी ते अद्याप लावून देण्यात आले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. विश्वसनीय माहितीनुसार अशा बंद असलेल्या व महावितरण कंपनीने दुरूस्तीसाठी काढून घेतलेल्या रोहित्रांची संख्या २० च्या घरात असल्याची माहिती आहे.

बॉक्स

आता स्वतंत्र रोहित्र

माहितीनुसार नागभीड तालुक्यात २००० ते मार्च २०१८ पर्यंत २ हजार २०३ शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आल्या आहेत. काही वर्षांपूर्वी रोहित्र सामूहिक म्हणजे कमीत कमी १० शेतकऱ्यांना देण्यात येत होते. पण आता स्वतंत्र रोहित्र देण्यात येत आहे. नागभीड तालुक्यात मुख्य पीक धानाचे आहे. सद्यस्थितीत पाऊस योग्य पडत असला तरी तो केव्हा आपला इंगा दाखवेल, याचा भरवसा नाही. महावितरण कंपनीने ज्या शेतकऱ्यांचे रोहित्र दुरूस्तीसाठी काढले, त्यांचे रोहित्र त्वरित लावून द्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

कोट

काही रोहित्र दुरूस्तीसाठी काढून आणण्यात आले आहेत. मात्र, नियमानुसार थकीत असलेले बिल अदा केल्याशिवाय रोहित्र लावून देता येणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी बिल भरले त्या शेतकऱ्यांचे रोहित्र लावून देण्यात आली आहेत.

- आर. यु. कारगावकर

उपविभागीय अभियंता, नागभीड

140721\img-20210713-wa0019.jpg

रोहित्राशिवाय विद्युत खांब