शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी दिल्लीत विदर्भवादी देणार धरणे

By admin | Updated: March 4, 2016 00:56 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिल्लीमध्ये ३१ मार्चला धरणे देण्याचे ठरविले आहे.

३१ मार्चला आंदोलन : भेटीसाठी पंतप्रधानांना मागितली वेळचंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिल्लीमध्ये ३१ मार्चला धरणे देण्याचे ठरविले आहे. या आंदोलनादरम्यान पंतप्रधानांकडे विदर्भाची मागणीसंदर्भातील चर्चेसाठी वेळ मागण्यात आला आहे.विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेत अ‍ॅड. वामनराव चटप यानी गुरूवारी चंद्रपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या आंदोलनासंदर्भात माहिती देताना अ‍ॅड. चटप म्हणाले, दिल्लीतील जंतर-मंतरवर ३१ मार्चला सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणे देण्याचा कार्याक्रम आखण्यात आला आहे. या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना निमंत्रण दिले आहे. या सोबतच लोकसभेचे माजी अध्यक्ष पी.ए. संगमा, गृहमंत्री राजेंद्रसिंग, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही विदर्भ राज्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळाच्या भेटीची वेळ मागीतली आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी २८ मार्चपासून दिल्लीत थांबून महत्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. या धरणे आंदोलनानिमीत्त जनजागृतीसाठी विदर्भात जिल्हा बैठका सुरु झाल्या आहेत. अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, हिंगणघाट, वर्धा या ठिकाणी बैठका झाल्या असून चंद्रपुरात ३ मार्चला बैठक पार पडली. ५ मार्चला गोंदीया आणि ६ मार्चला भंडारा येथे बैठक होत आहे. १० ते २५ मार्चपर्यंत विदर्भभर मोठ्या जाहीर सभा आणि तालुका बैठका असा कार्यक्रम आखण्यात आल्याची माजिहती यावेळी देण्यात आली. सत्तेत आल्यावर स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यचा शब्द भाजपाने दिला होता. मात्र सत्तेत येऊन दीड वर्ष लोटूनही यावर मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. विदर्भवाद्यांनी त्यांच्या घरी जावून जाब विचारण्यचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी बळजबरीने कार्यकर्त्यांना अटक केली. त्यामुळे दिल्लीत जावून धरणे देण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)