शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी दिल्लीत विदर्भवादी देणार धरणे

By admin | Updated: March 4, 2016 00:56 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिल्लीमध्ये ३१ मार्चला धरणे देण्याचे ठरविले आहे.

३१ मार्चला आंदोलन : भेटीसाठी पंतप्रधानांना मागितली वेळचंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिल्लीमध्ये ३१ मार्चला धरणे देण्याचे ठरविले आहे. या आंदोलनादरम्यान पंतप्रधानांकडे विदर्भाची मागणीसंदर्भातील चर्चेसाठी वेळ मागण्यात आला आहे.विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेत अ‍ॅड. वामनराव चटप यानी गुरूवारी चंद्रपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या आंदोलनासंदर्भात माहिती देताना अ‍ॅड. चटप म्हणाले, दिल्लीतील जंतर-मंतरवर ३१ मार्चला सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणे देण्याचा कार्याक्रम आखण्यात आला आहे. या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना निमंत्रण दिले आहे. या सोबतच लोकसभेचे माजी अध्यक्ष पी.ए. संगमा, गृहमंत्री राजेंद्रसिंग, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही विदर्भ राज्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळाच्या भेटीची वेळ मागीतली आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी २८ मार्चपासून दिल्लीत थांबून महत्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. या धरणे आंदोलनानिमीत्त जनजागृतीसाठी विदर्भात जिल्हा बैठका सुरु झाल्या आहेत. अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, हिंगणघाट, वर्धा या ठिकाणी बैठका झाल्या असून चंद्रपुरात ३ मार्चला बैठक पार पडली. ५ मार्चला गोंदीया आणि ६ मार्चला भंडारा येथे बैठक होत आहे. १० ते २५ मार्चपर्यंत विदर्भभर मोठ्या जाहीर सभा आणि तालुका बैठका असा कार्यक्रम आखण्यात आल्याची माजिहती यावेळी देण्यात आली. सत्तेत आल्यावर स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यचा शब्द भाजपाने दिला होता. मात्र सत्तेत येऊन दीड वर्ष लोटूनही यावर मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. विदर्भवाद्यांनी त्यांच्या घरी जावून जाब विचारण्यचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी बळजबरीने कार्यकर्त्यांना अटक केली. त्यामुळे दिल्लीत जावून धरणे देण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)