शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

बल्लारपूर ठरला विदर्भातील पहिला हागणदारीमुक्त तालुका

By admin | Updated: October 8, 2016 01:42 IST

विदर्भात पहिला हागणदारीमुक्त तालुका ठरण्याचा मान बल्लारपूरला मिळाला आहे. त्याकरिता बल्लारपूर

पुण्यात गौरव : बल्लारपूर पंचायत समितीची उल्लेखनीय कामगिरीचंद्रपूर : विदर्भात पहिला हागणदारीमुक्त तालुका ठरण्याचा मान बल्लारपूरला मिळाला आहे. त्याकरिता बल्लारपूर पंचायत समितीचा पुणे येथे गौरव करण्यात आला आहे. बल्लारपूर हागणदारीमुक्त तालुका ठरल्यामुळे पुणे येथे नुकत्याच झालेल्या सरपंच मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरव केला आहे. कार्यक्रमाला याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) विपुल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) रवींद्र मोहिते, स्वच्छ भारत मिशनचे कृष्णकांत खानझोडे, विस्तार अधिकारी नैताम, बीआरसी सुवर्णा जोशी, सीआरसी सुनील नुत्तलवार आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिंह यांना बल्लारपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भुजंग गजभे यांच्या कामगिरीचे कौतुक केले. गजभे यांना बल्लारपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करुन, विदर्भातील पहिला तालुका हागणदारीमुक्त करण्याचा मान मिळविल्याबद्दल व त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल सन्मानित करण्यात आले आहे. पुढील काळात अशाच प्रकारची विविध योजनांमधून भरीव कामगिरी करावी व जिल्ह्याचे नाव चांगल्या कामातून नावलौकीक करावा, अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंह यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी) विदर्भातून पहिला हागणदारीमुक्त तालुका म्हणून बल्लारपूर पंचायत समितीला मिळालेले यश हे खरोखरीच उल्लेखनिय आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील उर्वरीत पंचायत समिती अंतर्गत सुद्धा अशाच प्रकारे कामे झाल्यास जिल्हा हागणदारीमुक्त होण्यास वेळ लागणार नाही. - एम.डी.सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी