शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
3
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
4
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
5
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
6
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
7
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
8
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
9
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
10
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
11
सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हाच उपाय - वामनराव चटप

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

विदर्भातील मुख्यमंत्री, अर्थमंत्री, आदिवासी विकास राज्यमंत्री असतानांही विदर्भावरील अन्यायाने कळस गाठला आहे.

गडचांदूर : विदर्भातील मुख्यमंत्री, अर्थमंत्री, आदिवासी विकास राज्यमंत्री असतानांही विदर्भावरील अन्यायाने कळस गाठला आहे. सत्तेवर येण्यापूर्वी विदर्भ विकासाचे आश्वासन देणाऱ्यांच्या राजवटीतच विदर्भाचा अनुशेष कमी होण्याऐवजी तो वाढतच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव उपाय असल्याचे प्रतिपादन बुधवारी माजी आमदार तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रमुख अ‍ॅड. वामनराव चटप यांनी येथे केले. ते स्थानिक महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात वेगळे विदर्भ राज्य या विषयावरील चर्चासत्रात बोलताना केले.अध्यक्षस्थानी प्राचार्य सुभाष पाथ्रीकर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रभाकरराव दिवे, संस्थेचे सहसचिव धनंजय गोरे, उपप्राचार्य अशोक जिवतोडे, उपमुख्याध्यापिका रश्मी भालेराव, प्राचार्य डॉ. अनिस खान होते.अ‍ॅड. चटप म्हणाले, सिंचन अनुशेष ६० हजार कोटी असुन शेतमालाला भाव न दिल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधीत शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद गिनिज बुकात झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकही धरण व उद्योग नाही. आदिवासींच्या पुरवणी अर्थसंकल्पातून चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती हे जिल्हे पूर्णपणे वगळण्यात आले असुन एका नव्या पैशाची तरतूद करण्यात आली नाही. यवतमाळ जिल्ह्यात आर्णी व राळेगाव हे दोन आदिवासीबहुल मतदार संघ असुन आदिवासी आमदाराकरीता राखीव आहे. या दोनही मतदार संघातील आदिवासींची लोकसंख्या २६ टक्क्याच्या वर आहे. यवतमाळ जिल्हा विदर्भातील पाच नक्षलग्रस्त जिल्ह्यापैकी एक असुन विशेष कृती कार्यक्रमात समाविष्ठ होता. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदार संघात २२.४० टक्के आदिवासी लोकसंख्या असून हा नक्षलग्रस्त तालुका आहे व येथेही शासनाचा विशेष कृती कार्यक्रम राबविण्यात आला आहे. शिवाय चिमूर हा आदिवासीबहुल मतदार संघ असुन आदिवासींची लोकसंख्या २२.७५ टक्के असुन चंद्रपूर जिल्हा नक्षलग्रस्त जिल्ह्याचा यादीत समाविष्ट आहे अमरावती जिल्ह्यात मेळघाट हा कुपोषणग्रस्त व रस्त्याचा अनुशेष असलेला दुर्गम व आदिवासीसाठी राखीव मतदारसंघ असुन आदिवासीची संख्या २६ टक्क्यावर आहे.आर्णी, राळेगाव, मेळघाट, राजुरा व चिमूर या पाचही मतदारसंघातील आमदार हे सत्ताधारी भाजपचे असून चंद्रपूर-आर्णी लोकसभेचे खासदार भाजपचे असुन केंद्रात राज्यमंत्री आहेत व अमरावतीचे खासदार हे शिवसेनेचे आहेत. याशिवाय चंद्रपूरचे पालकमंत्री अर्थमंत्री असून अमरावतीचे पालकमंत्री हे दोघेही भाजपाचे आहेत तर यवतमाळचे पालकमंत्री हे शिवसेनेचे आहे. एवढे सर्व मंत्री खासदार, आमदार सत्तारूढ पक्षाचे असतानाही विदर्भासाठी हे सर्व ‘कुऱ्हाडीचे दांडे, गोतास काळ’ ठरले असल्याचा आरोपीही अ‍ॅड.वामनराव चटप यांनी केला. आदिवासी विकास विभागाच्या रस्ते, पूल व डांबरीकरणाच्या पुरवणी अर्थसंकल्प २०१५ च्या यादीतील परिशिष्ट २ मधून यवतमाळ, अमरावती व चंद्रपूर हे तिनही जिल्हे आदिवासी उपयोजना क्षेत्रातून पूर्णपणे वगळण्यात आले आहे. याची माहिती कुणालाही कशी लागली नाही, असा गहन प्रश्न विदर्भवासी व आदिवासी नागरिकांपुढे उपस्थित झाला असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांनी विदर्भाचा विकास आणि आदिवासीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तिनही जिल्ह्याचा अनुशेष १५ कोटीचा झाला आहे. तेव्हा विदर्भाचा सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव पर्याय असून सर्व विदर्भवासीयांनी एकसंघ होण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी प्रभाकरराव दिवे यांनी आपल्या भाषणातून विदर्भ राज्याची मागणी फार जुनी असून विदर्भावरील अन्याय सातत्याने वाढत आहे. बेरोजगारी वाढत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य सुभाष पाथ्रीकर यांनी केले. संचालन प्रा. अशोक डोईफोडे यांनी केले. आभार प्रा. विजय आकनुरवार यांनी मानले. (वार्ताहर)