शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हाच उपाय - वामनराव चटप

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

विदर्भातील मुख्यमंत्री, अर्थमंत्री, आदिवासी विकास राज्यमंत्री असतानांही विदर्भावरील अन्यायाने कळस गाठला आहे.

गडचांदूर : विदर्भातील मुख्यमंत्री, अर्थमंत्री, आदिवासी विकास राज्यमंत्री असतानांही विदर्भावरील अन्यायाने कळस गाठला आहे. सत्तेवर येण्यापूर्वी विदर्भ विकासाचे आश्वासन देणाऱ्यांच्या राजवटीतच विदर्भाचा अनुशेष कमी होण्याऐवजी तो वाढतच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव उपाय असल्याचे प्रतिपादन बुधवारी माजी आमदार तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रमुख अ‍ॅड. वामनराव चटप यांनी येथे केले. ते स्थानिक महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात वेगळे विदर्भ राज्य या विषयावरील चर्चासत्रात बोलताना केले.अध्यक्षस्थानी प्राचार्य सुभाष पाथ्रीकर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रभाकरराव दिवे, संस्थेचे सहसचिव धनंजय गोरे, उपप्राचार्य अशोक जिवतोडे, उपमुख्याध्यापिका रश्मी भालेराव, प्राचार्य डॉ. अनिस खान होते.अ‍ॅड. चटप म्हणाले, सिंचन अनुशेष ६० हजार कोटी असुन शेतमालाला भाव न दिल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधीत शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद गिनिज बुकात झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकही धरण व उद्योग नाही. आदिवासींच्या पुरवणी अर्थसंकल्पातून चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती हे जिल्हे पूर्णपणे वगळण्यात आले असुन एका नव्या पैशाची तरतूद करण्यात आली नाही. यवतमाळ जिल्ह्यात आर्णी व राळेगाव हे दोन आदिवासीबहुल मतदार संघ असुन आदिवासी आमदाराकरीता राखीव आहे. या दोनही मतदार संघातील आदिवासींची लोकसंख्या २६ टक्क्याच्या वर आहे. यवतमाळ जिल्हा विदर्भातील पाच नक्षलग्रस्त जिल्ह्यापैकी एक असुन विशेष कृती कार्यक्रमात समाविष्ठ होता. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदार संघात २२.४० टक्के आदिवासी लोकसंख्या असून हा नक्षलग्रस्त तालुका आहे व येथेही शासनाचा विशेष कृती कार्यक्रम राबविण्यात आला आहे. शिवाय चिमूर हा आदिवासीबहुल मतदार संघ असुन आदिवासींची लोकसंख्या २२.७५ टक्के असुन चंद्रपूर जिल्हा नक्षलग्रस्त जिल्ह्याचा यादीत समाविष्ट आहे अमरावती जिल्ह्यात मेळघाट हा कुपोषणग्रस्त व रस्त्याचा अनुशेष असलेला दुर्गम व आदिवासीसाठी राखीव मतदारसंघ असुन आदिवासीची संख्या २६ टक्क्यावर आहे.आर्णी, राळेगाव, मेळघाट, राजुरा व चिमूर या पाचही मतदारसंघातील आमदार हे सत्ताधारी भाजपचे असून चंद्रपूर-आर्णी लोकसभेचे खासदार भाजपचे असुन केंद्रात राज्यमंत्री आहेत व अमरावतीचे खासदार हे शिवसेनेचे आहेत. याशिवाय चंद्रपूरचे पालकमंत्री अर्थमंत्री असून अमरावतीचे पालकमंत्री हे दोघेही भाजपाचे आहेत तर यवतमाळचे पालकमंत्री हे शिवसेनेचे आहे. एवढे सर्व मंत्री खासदार, आमदार सत्तारूढ पक्षाचे असतानाही विदर्भासाठी हे सर्व ‘कुऱ्हाडीचे दांडे, गोतास काळ’ ठरले असल्याचा आरोपीही अ‍ॅड.वामनराव चटप यांनी केला. आदिवासी विकास विभागाच्या रस्ते, पूल व डांबरीकरणाच्या पुरवणी अर्थसंकल्प २०१५ च्या यादीतील परिशिष्ट २ मधून यवतमाळ, अमरावती व चंद्रपूर हे तिनही जिल्हे आदिवासी उपयोजना क्षेत्रातून पूर्णपणे वगळण्यात आले आहे. याची माहिती कुणालाही कशी लागली नाही, असा गहन प्रश्न विदर्भवासी व आदिवासी नागरिकांपुढे उपस्थित झाला असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांनी विदर्भाचा विकास आणि आदिवासीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तिनही जिल्ह्याचा अनुशेष १५ कोटीचा झाला आहे. तेव्हा विदर्भाचा सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव पर्याय असून सर्व विदर्भवासीयांनी एकसंघ होण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी प्रभाकरराव दिवे यांनी आपल्या भाषणातून विदर्भ राज्याची मागणी फार जुनी असून विदर्भावरील अन्याय सातत्याने वाढत आहे. बेरोजगारी वाढत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य सुभाष पाथ्रीकर यांनी केले. संचालन प्रा. अशोक डोईफोडे यांनी केले. आभार प्रा. विजय आकनुरवार यांनी मानले. (वार्ताहर)