शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

विदर्भवादी आंदोलक २५ आॅक्टोबरला कोळसा रोखणार

By admin | Updated: October 22, 2015 00:57 IST

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा आणि विदर्भातील जनतेचे वीज बिल निम्मे कमी करा, ...

विदर्भासाठी आंदोलन : वैदर्भीयांचे वीज बिल कमी करण्याची मागणीचंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा आणि विदर्भातील जनतेचे वीज बिल निम्मे कमी करा, या मागणीसाठी २५ आॅक्टोबरला कोळसा रोको आंदोलन छेडणार असल्याचा ईशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेतून दिला.२५ आॅक्टोबरच्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषकदेत ते म्हणाले, मागील तीन वर्षांपासून विदर्भ राज्य आंदोलन समिती स्वतंत्र विदर्भासाठी सतत आंदोलने करीत आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून नागपूर कराराची विदर्भभर होळी झाली. जिल्हास्तरीय धरणे झाले, विदर्भ गर्जना यात्रेने शंभरावर सभा घेऊन जनजागृती केली. राज्यकर्त्यांकडून अद्यापही ठोस आश्वासन मिळालेले नाही. केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. विदर्भ हे सक्षम राज्य होऊ शकते. येथील कोळश्यावर पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने चालतात. मात्र येथील शेतकरी अंधारात राहतो. प्रकल्पांच्या प्रदूषणाची झळ येथील नागरिक सोसत असले तरी त्याचा विचार कधीच होत नाही. प्रदुषणाची झळ येथील नागरिकांना बसत असल्याने आणि कोळश्यावर विदर्भाचा हक्क असल्याने विदर्भातील नागरिकांचे विज बिल निम्मे करावे, अशी मागणी असल्याचे चटप यांनी सांगितले. आंदोलनाच्या दिवशी कोळश्याच्या वाहनांची अडवणूक करून राज्य सरकारला संकेत दिला जाणार आहे. विदर्भातील कोळसा वीज प्रकल्पात पोहोचला नाही तर प्रकल्प बंद पडून शकतात, याची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन असल्याचे ते म्हणाले. वणी येथे सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत हे आंदोलन होणार असून यात विदर्भातील जनतेने सहभागी होण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली. पत्रकारपरिषदेला किशोर पोतनवार, प्रा. एस.टी. चिकटे, प्रभाकर दिवे, आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)