शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

पाणी वाचविण्यासाठी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:54 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, झरपट, उमा, अंधारी व इतर नद्यांवर बंधारे बांधून पाणी अडवा, नद्या वाचवा, शेतकरी, उद्योग व पिण्याचे पाणी वाचवा तसेच दुष्काळी कामे त्वरीत सुरू करण्याच्या मागणीला घेऊन विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात इरई नदीच्या परिसरातील तिरुपती बालाजी मंदिराजवळ सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देनरेश पुगलिया : आंदोलनामुळे प्रशासनाकडून हालचाली सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, झरपट, उमा, अंधारी व इतर नद्यांवर बंधारे बांधून पाणी अडवा, नद्या वाचवा, शेतकरी, उद्योग व पिण्याचे पाणी वाचवा तसेच दुष्काळी कामे त्वरीत सुरू करण्याच्या मागणीला घेऊन विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात इरई नदीच्या परिसरातील तिरुपती बालाजी मंदिराजवळ सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.सकाळी १० वाजतापासून सुरू झालेल्या या आंदोलनाची सांगता सायंकाळी ६ वाजता करण्यात आली. यानंतर एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यालगतच्या नद्यांवर बंधारे बांधा आणि पाणी अडवा. राजुरा येथील आदिवासी अल्पवयीन अनेक मुलींवर झालेल्या अत्याचाराची सीबीआय चौकशी झालीच पाहीजे व दोषींना कठोर कार्यवाही झाली पाहीजे. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा हत्यारा नत्थू गोडसे याला देशभक्त ठरविणाºया आतंकवाद्यांचा गंभीर आरोप असलेली असलेली भाजपची भोपाळची उमेदवार प्रज्ञा ठाकूर हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून अटक करण्यात यावी. या प्रमुख मागण्यांचा समावेश असल्याची माहिती आंदोलनकर्ते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.आंदोलनामुळे प्रशासनाकडून हालचाली सुरू झालेल्या आहे. सिंचन विभागाने बैठक घेतली आहे. पालकमंत्र्यांनी यामध्ये आता पुढाकार घेतल्याची माहिती आहे. लवकरच निधी उपलब्ध होऊन बंधारे निर्मितीला सुरूवात होईल, असे संकेत असल्याचेही पुगलिया यांनी यावेळी सांगितले.राजुरा येथील अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री स्वत: राजुरा येथे भेट देऊन पीडितांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. लोकसभा निकालानंतर मुख्यमंत्री केव्हाही येऊ शकते, असेही पुगलिया म्हणाले. या आंदोलनात युवा नेते राहुल पुगलिया, गजानन गावंडे, माजी नगराध्यक्ष डॉ. सुरेश महाकुलकर, दवेंद्र बेले, जि.प. सदस्य गोदरू जुमनाके, शिवचंद काळे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, गडचिरोलीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, अ‍ॅड. अविनाश ठावरी, नगरसेवक अशोक नागापुरे, प्रवीण पडवेकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.