शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

पाणी वाचविण्यासाठी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:54 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, झरपट, उमा, अंधारी व इतर नद्यांवर बंधारे बांधून पाणी अडवा, नद्या वाचवा, शेतकरी, उद्योग व पिण्याचे पाणी वाचवा तसेच दुष्काळी कामे त्वरीत सुरू करण्याच्या मागणीला घेऊन विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात इरई नदीच्या परिसरातील तिरुपती बालाजी मंदिराजवळ सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देनरेश पुगलिया : आंदोलनामुळे प्रशासनाकडून हालचाली सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, झरपट, उमा, अंधारी व इतर नद्यांवर बंधारे बांधून पाणी अडवा, नद्या वाचवा, शेतकरी, उद्योग व पिण्याचे पाणी वाचवा तसेच दुष्काळी कामे त्वरीत सुरू करण्याच्या मागणीला घेऊन विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात इरई नदीच्या परिसरातील तिरुपती बालाजी मंदिराजवळ सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.सकाळी १० वाजतापासून सुरू झालेल्या या आंदोलनाची सांगता सायंकाळी ६ वाजता करण्यात आली. यानंतर एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यालगतच्या नद्यांवर बंधारे बांधा आणि पाणी अडवा. राजुरा येथील आदिवासी अल्पवयीन अनेक मुलींवर झालेल्या अत्याचाराची सीबीआय चौकशी झालीच पाहीजे व दोषींना कठोर कार्यवाही झाली पाहीजे. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा हत्यारा नत्थू गोडसे याला देशभक्त ठरविणाºया आतंकवाद्यांचा गंभीर आरोप असलेली असलेली भाजपची भोपाळची उमेदवार प्रज्ञा ठाकूर हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून अटक करण्यात यावी. या प्रमुख मागण्यांचा समावेश असल्याची माहिती आंदोलनकर्ते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.आंदोलनामुळे प्रशासनाकडून हालचाली सुरू झालेल्या आहे. सिंचन विभागाने बैठक घेतली आहे. पालकमंत्र्यांनी यामध्ये आता पुढाकार घेतल्याची माहिती आहे. लवकरच निधी उपलब्ध होऊन बंधारे निर्मितीला सुरूवात होईल, असे संकेत असल्याचेही पुगलिया यांनी यावेळी सांगितले.राजुरा येथील अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री स्वत: राजुरा येथे भेट देऊन पीडितांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. लोकसभा निकालानंतर मुख्यमंत्री केव्हाही येऊ शकते, असेही पुगलिया म्हणाले. या आंदोलनात युवा नेते राहुल पुगलिया, गजानन गावंडे, माजी नगराध्यक्ष डॉ. सुरेश महाकुलकर, दवेंद्र बेले, जि.प. सदस्य गोदरू जुमनाके, शिवचंद काळे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, गडचिरोलीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, अ‍ॅड. अविनाश ठावरी, नगरसेवक अशोक नागापुरे, प्रवीण पडवेकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.