शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

कर्जासाठी बळीराजाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:54 IST

सध्या एकीकडे लग्नसराई धडाक्यात सुरू आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना तोंडावर आलेल्या खरीप हंगामाची चिंता लागली आहे. मागील वर्षीची कर्जमाफी अनेकांना मिळाली नाही. प्रत्येक शेतकऱ्याला तत्काळ कर्ज देऊ, असे शासन सांगत असले तरी बहुतांश शेतकरी कर्जासाठी बँकाच्या चकरा मारीत आहे.

ठळक मुद्देआता प्रतीक्षा पावसाची : मशागतीची कामे अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या एकीकडे लग्नसराई धडाक्यात सुरू आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना तोंडावर आलेल्या खरीप हंगामाची चिंता लागली आहे. मागील वर्षीची कर्जमाफी अनेकांना मिळाली नाही. प्रत्येक शेतकऱ्याला तत्काळ कर्ज देऊ, असे शासन सांगत असले तरी बहुतांश शेतकरी कर्जासाठी बँकाच्या चकरा मारीत आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात छदामही नसल्याने त्यांची झोप उडाली आहे. नाईलाजाने शेतकरी सावकरांच्या दारात जात आहेत.मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. मृग नक्षत्राला पाऊस पडला की जोमात पेरणी करायची, असा त्यांंचा मानस होता. मात्र पावसाने सातत्याने शेतकऱ्यांची निराशाच केली. पावसाने अनेकवेळा शेतकऱ्यांना दगा दिला. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकºयांच्या हाती आले नाही. दुसरीकडे शेतमालालाही भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. लावलेला पैसाही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज तो फेडू शकला नाही. शासनाच्या कर्जमाफीचाही अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. रबी हंगाम उलटून गेल्यानंतरही अनेक शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. आता शेतकरी पुन्हा खरीप हंगामाच्या कामाला लागला आहे. हंगामपूर्व मशागतीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. मात्र हंगामासाठी शेतकºयांना पैसा हवा आहे. प्रत्येक शेतकऱ्याला कर्जाचे वाटप करा, असे निर्देश शासन दरवर्षी बँकांना देते. मात्र तसे होत नाही.पुन्हा सावकारी पाशखरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, मजूरवर्ग यासाठी पैैशाची गरज आहे. बँकाकडून अद्याप अनेक शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही. हातात पैसा नाही. रबीनेही खिसा गरम केला नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा सावकाराच्या दारात उभे होत आहे. या संधीचा फायदा घेत अनेक अवैध सावकार सक्रिय झाले असून आपला पाश शेतकºयांच्या गळ्याभोवती आवळत आहेत.बियाण्यांचा प्रश्न बिकटचंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही, तळोधी, नागभीड, ब्रह्मपुरी, मूल, सावली, चिमूर या तालुक्यांना धानाचा पट्टा म्हटले जाते. धान उत्पादक मागील वर्षीच्या हंगामातील धान ठेवून तेच बियाणे म्हणून वापरतात. मात्र मागील वर्षी अत्यल्प उत्पादन झाल्यामुळे धान उत्पादकांनी हाती असलेले धानही विकून टाकले आहे. त्यामुळे आता त्यांच्यासमोर बियाण्यांचा मोठा बिकट प्रश्न आहे.