शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

धानपीक नुकसानग्रस्तांना हवे १७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:22 IST

मावा-तुडतुडा रोगांच्या प्रादुर्भावामुळे धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. भरपाईसाठी तालुक्यातील २६ हजार ६२७ शेतकऱ्यांना १७ कोटी २१ लाख रूपयांची आवश्यकता आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यामुळे ही मदत केव्हा मिळते, याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देनागभीड तालुका : मावा-तुडतुडा रोगाने धानपीक नष्ट

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : मावा-तुडतुडा रोगांच्या प्रादुर्भावामुळे धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. भरपाईसाठी तालुक्यातील २६ हजार ६२७ शेतकऱ्यांना १७ कोटी २१ लाख रूपयांची आवश्यकता आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यामुळे ही मदत केव्हा मिळते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.धान पीक अंतिम टप्प्यात आल्यानंतर पिकांवर मावा व तुडतुडा रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. रोगांच्या निर्मूलनासाठी शेतकऱ्यांनी विविध औषधांची तीन ते चारदा फवारणी केली. मात्र, काहीच फायदा झाला नाही. उलट रोगाचा प्रकोप वाढतच गेला. बऱ्याच शेतकऱ्यांचे संपूर्ण धानपीक नष्ट झाले होते. धानाची कापणी, जमा करणी व मळणी केली तरी हातात काहीच येणार नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या धान पिकास आग लावली. बऱ्याच शेतकऱ्यांनी नाईलाज म्हणून हा मार्ग स्वीकारला होता. एकीकडे धान पिकाच्या उत्पादनासाठी लावलेला खर्च आणि दुसरीकडे औषधांवर झालेल्या खर्चाने शेतकºयांचे कंबरडेच मोडून गेले. शेतकऱ्यांवर झालेल्या या आक्रमणाचा विषय माध्यामांनी उचलून धरल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेतली. दरम्यान, आदेश निर्गमित करून सर्वेक्षण करण्याचे दिले होते. या आदेशानंतर महसूल, कृषी विभागाचे कर्मचारी व ग्रामसेवकांच्या मदतीने नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. नागभीड तालुक्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार २८ हजार २१२ हेक्टर जमीन क्षतिग्रस्त आहे. यात २६ हजार ६२७ शेतकऱ्यांची संख्या आहे. सर्व लाभार्थ्यांना १७ कोटी २१ लाख रूपयांची आवश्यकता आहे. नुकसानीचे सर्वेक्षण होऊन आता तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे शासन ही मदत शेतकऱ्यांना केव्हा वाटप करते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.मंडळनिहाय नुकसानीचे क्षेत्र व मदत निधीनागभीड मंडळात ६५१६.११ हेक्टर क्षेत्र क्षतीग्रस्त असून ५ हजार २११ शेतकरी आहेत. या मंडळासाठी ३ कोटी ८६ लाख रूपयांची आवश्यता आहे. मेंढा मंडळात ६१९२.५१ हेक्टर क्षेत्र क्षतिग्रस्त असून ५३९२ शेतकरी आहेत. त्यासाठी ३.७६ कोटी रूपयांची गरज आहे. मिंडाळा मंडळात ७०२८.३५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. ६ हजार ७११ शेतकऱ्यांना ४ कोटी ३५ लाख रूपयांची गरज आहे. तळोधी मंडळात ८४७५.९८ हेक्टर क्षेत्र क्षतिग्रस्त असून ९ हजार ३१३ शेतकºयांना ५ कोटी २४ लाख रूपयांचा द्यावा लागणार आहे.