शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

धानपीक नुकसानग्रस्तांना हवे १७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:22 IST

मावा-तुडतुडा रोगांच्या प्रादुर्भावामुळे धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. भरपाईसाठी तालुक्यातील २६ हजार ६२७ शेतकऱ्यांना १७ कोटी २१ लाख रूपयांची आवश्यकता आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यामुळे ही मदत केव्हा मिळते, याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देनागभीड तालुका : मावा-तुडतुडा रोगाने धानपीक नष्ट

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : मावा-तुडतुडा रोगांच्या प्रादुर्भावामुळे धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. भरपाईसाठी तालुक्यातील २६ हजार ६२७ शेतकऱ्यांना १७ कोटी २१ लाख रूपयांची आवश्यकता आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यामुळे ही मदत केव्हा मिळते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.धान पीक अंतिम टप्प्यात आल्यानंतर पिकांवर मावा व तुडतुडा रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. रोगांच्या निर्मूलनासाठी शेतकऱ्यांनी विविध औषधांची तीन ते चारदा फवारणी केली. मात्र, काहीच फायदा झाला नाही. उलट रोगाचा प्रकोप वाढतच गेला. बऱ्याच शेतकऱ्यांचे संपूर्ण धानपीक नष्ट झाले होते. धानाची कापणी, जमा करणी व मळणी केली तरी हातात काहीच येणार नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या धान पिकास आग लावली. बऱ्याच शेतकऱ्यांनी नाईलाज म्हणून हा मार्ग स्वीकारला होता. एकीकडे धान पिकाच्या उत्पादनासाठी लावलेला खर्च आणि दुसरीकडे औषधांवर झालेल्या खर्चाने शेतकºयांचे कंबरडेच मोडून गेले. शेतकऱ्यांवर झालेल्या या आक्रमणाचा विषय माध्यामांनी उचलून धरल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेतली. दरम्यान, आदेश निर्गमित करून सर्वेक्षण करण्याचे दिले होते. या आदेशानंतर महसूल, कृषी विभागाचे कर्मचारी व ग्रामसेवकांच्या मदतीने नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. नागभीड तालुक्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार २८ हजार २१२ हेक्टर जमीन क्षतिग्रस्त आहे. यात २६ हजार ६२७ शेतकऱ्यांची संख्या आहे. सर्व लाभार्थ्यांना १७ कोटी २१ लाख रूपयांची आवश्यकता आहे. नुकसानीचे सर्वेक्षण होऊन आता तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे शासन ही मदत शेतकऱ्यांना केव्हा वाटप करते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.मंडळनिहाय नुकसानीचे क्षेत्र व मदत निधीनागभीड मंडळात ६५१६.११ हेक्टर क्षेत्र क्षतीग्रस्त असून ५ हजार २११ शेतकरी आहेत. या मंडळासाठी ३ कोटी ८६ लाख रूपयांची आवश्यता आहे. मेंढा मंडळात ६१९२.५१ हेक्टर क्षेत्र क्षतिग्रस्त असून ५३९२ शेतकरी आहेत. त्यासाठी ३.७६ कोटी रूपयांची गरज आहे. मिंडाळा मंडळात ७०२८.३५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. ६ हजार ७११ शेतकऱ्यांना ४ कोटी ३५ लाख रूपयांची गरज आहे. तळोधी मंडळात ८४७५.९८ हेक्टर क्षेत्र क्षतिग्रस्त असून ९ हजार ३१३ शेतकºयांना ५ कोटी २४ लाख रूपयांचा द्यावा लागणार आहे.