शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धानपीक नुकसानग्रस्तांना हवे १७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:22 IST

मावा-तुडतुडा रोगांच्या प्रादुर्भावामुळे धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. भरपाईसाठी तालुक्यातील २६ हजार ६२७ शेतकऱ्यांना १७ कोटी २१ लाख रूपयांची आवश्यकता आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यामुळे ही मदत केव्हा मिळते, याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देनागभीड तालुका : मावा-तुडतुडा रोगाने धानपीक नष्ट

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : मावा-तुडतुडा रोगांच्या प्रादुर्भावामुळे धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. भरपाईसाठी तालुक्यातील २६ हजार ६२७ शेतकऱ्यांना १७ कोटी २१ लाख रूपयांची आवश्यकता आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यामुळे ही मदत केव्हा मिळते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.धान पीक अंतिम टप्प्यात आल्यानंतर पिकांवर मावा व तुडतुडा रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. रोगांच्या निर्मूलनासाठी शेतकऱ्यांनी विविध औषधांची तीन ते चारदा फवारणी केली. मात्र, काहीच फायदा झाला नाही. उलट रोगाचा प्रकोप वाढतच गेला. बऱ्याच शेतकऱ्यांचे संपूर्ण धानपीक नष्ट झाले होते. धानाची कापणी, जमा करणी व मळणी केली तरी हातात काहीच येणार नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या धान पिकास आग लावली. बऱ्याच शेतकऱ्यांनी नाईलाज म्हणून हा मार्ग स्वीकारला होता. एकीकडे धान पिकाच्या उत्पादनासाठी लावलेला खर्च आणि दुसरीकडे औषधांवर झालेल्या खर्चाने शेतकºयांचे कंबरडेच मोडून गेले. शेतकऱ्यांवर झालेल्या या आक्रमणाचा विषय माध्यामांनी उचलून धरल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेतली. दरम्यान, आदेश निर्गमित करून सर्वेक्षण करण्याचे दिले होते. या आदेशानंतर महसूल, कृषी विभागाचे कर्मचारी व ग्रामसेवकांच्या मदतीने नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. नागभीड तालुक्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार २८ हजार २१२ हेक्टर जमीन क्षतिग्रस्त आहे. यात २६ हजार ६२७ शेतकऱ्यांची संख्या आहे. सर्व लाभार्थ्यांना १७ कोटी २१ लाख रूपयांची आवश्यकता आहे. नुकसानीचे सर्वेक्षण होऊन आता तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे शासन ही मदत शेतकऱ्यांना केव्हा वाटप करते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.मंडळनिहाय नुकसानीचे क्षेत्र व मदत निधीनागभीड मंडळात ६५१६.११ हेक्टर क्षेत्र क्षतीग्रस्त असून ५ हजार २११ शेतकरी आहेत. या मंडळासाठी ३ कोटी ८६ लाख रूपयांची आवश्यता आहे. मेंढा मंडळात ६१९२.५१ हेक्टर क्षेत्र क्षतिग्रस्त असून ५३९२ शेतकरी आहेत. त्यासाठी ३.७६ कोटी रूपयांची गरज आहे. मिंडाळा मंडळात ७०२८.३५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. ६ हजार ७११ शेतकऱ्यांना ४ कोटी ३५ लाख रूपयांची गरज आहे. तळोधी मंडळात ८४७५.९८ हेक्टर क्षेत्र क्षतिग्रस्त असून ९ हजार ३१३ शेतकºयांना ५ कोटी २४ लाख रूपयांचा द्यावा लागणार आहे.