शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जिल्हा कचेरीवर भाविकांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:11 IST

येथील प्रसिद्ध महाकाली मंदिराचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा, मंदिर शासनाने ताब्यात घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी भाविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. युवा परिवर्तन संघर्ष समिती आणि बिरसा ब्रिगेडने मोर्चाचे नेतृत्व केले.

ठळक मुद्देमहाकाली मंदिर शासनाने ताब्यात घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील प्रसिद्ध महाकाली मंदिराचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा, मंदिर शासनाने ताब्यात घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी भाविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. युवा परिवर्तन संघर्ष समिती आणि बिरसा ब्रिगेडने मोर्चाचे नेतृत्व केले.महाकाली मंदिरावर एकाच कुटुंबाचा ताबा असून विश्वस्त मंडळ नाममात्र आहे. मंदिरात कोट्यवधी रुपयांची देणगी गोळा होते. पण, भाविकांसाठी मूलभूत सुविधा नाहीत. त्यामुळे विश्वस्त मंडळ बरखास्त करून शासनाने मंदिर ताब्यात घ्यावी, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र, प्रशासनाने दखल घेतली नाही. भाविकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून केवळ स्वार्थ साधले जात आहे, असा आरोपही मोर्चेकऱ्यांनी केला. त्यामुळे शुक्रवारी शहरातून मोर्चा काढण्यात आला. महाकाली मंदिरातून निघालेल्या या मोर्चाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. महाकाली मंदिरात भक्तनिवास, स्नानगृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, मंदिराला पर्यटनाचा दर्जा देवून जीर्णोद्धार करावा, देवकर, देवकरीण, पोतराज, देवदासी, बाजा, वाद्य यांना मंदिर परिसरात तख्त टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, तळेगावची गुरू राजामाय, शेळगावची गुरू यमुनामाय यांच्या नावाने मंदिर परिसरात भक्त निवास बांधून द्यावे, यात्रा कालावधीत नांदेड ते चंद्रपूर रेल्वेसेवा सुरू करावी, आदी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याकडे सादर करण्यात आले. बीड, परभणी, नांदेड, औरंगाबाद, उस्मानाबाद आणि तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून आलेले शेकडो भाविक सहभागी झाले होते. निवेदन देताना चंद्रमाय लक्ष्मण डोणगावकर, रवी मेश्राम, बालाजी गाडेकर, मारोती वाघमारे, राहूबाई डवलगरे आदी उपस्थित होते.