शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

निवडणुकीच्या रणधुमाळीला आलाय वेग

By admin | Updated: February 5, 2017 00:30 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी १८ फेब्रुवारीला होत आहे. याला आता केवळ १४ दिवस शिल्लक आहेत.

मतपरिवर्तनाचीही लगबग : छाननीनंतर उमेदवारांच्या गाठीभेटी सुरूचंद्रपूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी १८ फेब्रुवारीला होत आहे. याला आता केवळ १४ दिवस शिल्लक आहेत. म्हणजेच प्रचारासाठी केवळ बाराच दिवस उरले असल्याने उमेदवारांची धावपळ वाढली आहे. छाननीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती मिळून एक हजार २७ उमेदवार रिंगणात आहेत. हे सर्व उमेदवार आता आपल्या मतदार क्षेत्रात मतदारांच्या भेटीगाठी घेत असून रणधुमाळीला आता वेग येऊ लागला आहे.यावेळी उमेदवारांकडे प्रचारासाठी फारच कमी कालावधी असल्याने उमेदवार आपल्या समर्थकांच्या माध्यमातूनही प्रचार करीत आहे. प्रत्येक मतदारांपर्यंत उमेदवार स्वत: जाऊ शकत नसल्याने आपल्या समर्थकांना मतदारांपर्यंत पाठवून त्यांचे मतपरिवर्तन केले जात आहे. दरम्यान, गुरूवारी झालेल्या छानणीनंतर आता रिंगणात एक हजार २७ उमेदवार उरले आहेत. यात पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी ६२० तर, जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी ४०७ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेसाठी भरलेले २३ नामांकन अपात्र ठरले आहे. यासोबतच पंचायत समितीसाठी भरलेले ५८ नामांकन छानणीत रद्द झाले. अनेक उमेदवारांनी दक्षता घेवून दोन नामांकन भरले होते. आज छानणीदरम्यान ते गळाले. असे असले तरी काही ठिकाणी धोका झालाच. जिल्हा न्यायाधिशांकडे अपिल करण्याची तारीख ५ फेब्रुवारी असून नामनिर्देशपत्र परत घेण्याचा अखेरचा दिवस ७ फेब्रुवारी आहे. त्यानंतरच रिंगणातील खरे चित्र स्पष्ट होणार आहे. असे असले तरी ज्यांचे रिंगणात स्थान निश्चित आहे, त्यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. काही उमेदवारांनी तर मतदारांना आतापासूनच पार्ट्या देणे सुरू केले आहे. तर काही उमेदवार मतदारांना विविध विकासकामांचे प्रलोभन देत असल्याचेही मतदार क्षेत्रात दिसून येत आहे. ग्रामीण भागातील पानटपरी, चहाटपरी व चौकाचौकात निवडणुकीच्याच गोष्टी सुरू असल्याचे दिसून येत आहे. विद्यमान पदाधिकारी आपण केलेल्या कामांची आठवण मतदारांना करून देण्यात गुंतले आहे. (शहर प्रतिनिधी)निवडणूक निरीक्षक नियुक्तचंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीवर देखरेख ठेवण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक व निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या संबंधी नागरिकांना व मतदारांना काही तक्रार, निवेदन अथवा अडचण असल्यास निवडणूक निरीक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी व उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अर्जुन चिखले यांनी केले आहे. सावली, मूल व चंद्रपूर तालुक्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांची तर वरोरा, भद्रावती, पोंभुर्णा व बल्लारपूर तालुक्याकरिता निवडणूक निरीक्षक म्हणून नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त करमणूक शुल्क पराग सोमण हे तर नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही व चिमूर तालुक्यासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून गोंदिया येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते यांची तर राजुरा, गोंडपिपरी, जिवती व कोरपना तालुक्याकरिता निवडणूक निरीक्षक म्हणून गडचिरोली येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांची नियुक्ती केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसंबंधातील काही तक्रारी असल्यास निवडणूक निरीक्षक तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांच्याकडे करता येतील, अशी माहिती चंद्रपूरचे उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी म्हटले आहे.