शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

चंद्रपुरात भाजीपाला मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 23:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र व राज्यात मागील चार वर्षांपासून भाजपा सरकार सत्तारूढ आहे. परंतु सरकारने शेतकऱ्यांना उत्पादित मालावर योग्य भाव न दिल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या न्याय मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. सरकारचा निषेध ...

ठळक मुद्देकाँग्रेसच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे आंदोलन : सरकार विरोधात घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र व राज्यात मागील चार वर्षांपासून भाजपा सरकार सत्तारूढ आहे. परंतु सरकारने शेतकऱ्यांना उत्पादित मालावर योग्य भाव न दिल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या न्याय मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. सरकारचा निषेध करण्याच्या अनुषंगाने बुधवारी काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी गांधी चौकात आंदोलन करीत घाम गाळून पिकविलेला भाजीपाला मोफत वाटून दिला.यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सरकार विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनाचे नेतृत्व कॉंग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले. यावेळी नरेश पुगलिया म्हणाले, सरकार शेतकरीविरोधी भूमिका घेत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतमालाला उचित भाव देण्याचे आश्वासन दिले. मात्र सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला. यामुळेच शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून ऐन खरिपाच्या हंगामात आंदोलन करावे लागत आहे. शेतकरी आजघडीला डबघाईस आला आहे. त्याच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे तो आर्थिक संकटात सापडला आहे. कृषी प्रधान देशात विद्यमान सरकारने शेतकऱ्यांची अवस्था गलितगात्र करून ठेवली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंंबा म्हणून आंदोलनात सहभाग घेतला आहे, त्याचप्रमाणे १ ते १० जूनदरम्यान सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देत असल्याचे ते म्हणाले.मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना लालीपाप दाखवत उत्पादित मालाच्या लागत मुल्यापेक्षा ५० टक्के आधारमूल्य देण्याची घोषणा केली. मात्र सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला भाव मिळत नाही. बि-बियाण्यांसाठी शेतकऱ्यांचा लागणारा खर्च निघत नाही. यामुळे शेतकरी त्रस्त झाला. याचे पडसाद देशभर उमटले आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंंबा देण्यासाठी व त्यांच्या न्याय मागण्या त्वरित सोडविल्या जाव्या म्हणून जिल्ह्यातील शेतकºयांना भाजीपाला रस्त्यावर न टाकता गरजू लोकांना मोफत वाटला.यावेळी आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळीच कर्ज वाटप झाले पाहिजे व मोफत बि- बियाण्यांचा पुरवठा करावा, अशी घोषणाबाजी करून सरकारकडे न्याय मागितला. या आंदोलनात विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेस, चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस, एनएसयुआय, युवक कॉंग्रेस, महिला कॉंग्रेस तसेच कॉंग्रेसचे पदाधिकाऱ्यासह कॉंग्रेसचे राहुल पुगलिया, चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, मनपा गटनेते तथा विरोधी पक्षनेते डॉ. सुरेश महाकूलकर, नगरसेवक अशोक नागापुरे आदी उपस्थित होते.अनेक गावातील शेतकरी सहभागीसदर आंदोलन शेतकऱ्यांचे व शेतकऱ्यांच्या मागणीसाठी असल्याने मार्डा, विसापूर, शिवणी, पिपरी, दाताळा, वेंडली यासह चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला. केवळ सहभागच दर्शविला नाही तर त्यांनी बैलबंडीतून आपल्या शेतातील भाजीपालाही वाटण्यासाठी आणला.