शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात भाजीपाला मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 23:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र व राज्यात मागील चार वर्षांपासून भाजपा सरकार सत्तारूढ आहे. परंतु सरकारने शेतकऱ्यांना उत्पादित मालावर योग्य भाव न दिल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या न्याय मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. सरकारचा निषेध ...

ठळक मुद्देकाँग्रेसच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे आंदोलन : सरकार विरोधात घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र व राज्यात मागील चार वर्षांपासून भाजपा सरकार सत्तारूढ आहे. परंतु सरकारने शेतकऱ्यांना उत्पादित मालावर योग्य भाव न दिल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या न्याय मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. सरकारचा निषेध करण्याच्या अनुषंगाने बुधवारी काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी गांधी चौकात आंदोलन करीत घाम गाळून पिकविलेला भाजीपाला मोफत वाटून दिला.यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सरकार विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनाचे नेतृत्व कॉंग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले. यावेळी नरेश पुगलिया म्हणाले, सरकार शेतकरीविरोधी भूमिका घेत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतमालाला उचित भाव देण्याचे आश्वासन दिले. मात्र सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला. यामुळेच शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून ऐन खरिपाच्या हंगामात आंदोलन करावे लागत आहे. शेतकरी आजघडीला डबघाईस आला आहे. त्याच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे तो आर्थिक संकटात सापडला आहे. कृषी प्रधान देशात विद्यमान सरकारने शेतकऱ्यांची अवस्था गलितगात्र करून ठेवली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंंबा म्हणून आंदोलनात सहभाग घेतला आहे, त्याचप्रमाणे १ ते १० जूनदरम्यान सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देत असल्याचे ते म्हणाले.मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना लालीपाप दाखवत उत्पादित मालाच्या लागत मुल्यापेक्षा ५० टक्के आधारमूल्य देण्याची घोषणा केली. मात्र सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला भाव मिळत नाही. बि-बियाण्यांसाठी शेतकऱ्यांचा लागणारा खर्च निघत नाही. यामुळे शेतकरी त्रस्त झाला. याचे पडसाद देशभर उमटले आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंंबा देण्यासाठी व त्यांच्या न्याय मागण्या त्वरित सोडविल्या जाव्या म्हणून जिल्ह्यातील शेतकºयांना भाजीपाला रस्त्यावर न टाकता गरजू लोकांना मोफत वाटला.यावेळी आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळीच कर्ज वाटप झाले पाहिजे व मोफत बि- बियाण्यांचा पुरवठा करावा, अशी घोषणाबाजी करून सरकारकडे न्याय मागितला. या आंदोलनात विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेस, चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस, एनएसयुआय, युवक कॉंग्रेस, महिला कॉंग्रेस तसेच कॉंग्रेसचे पदाधिकाऱ्यासह कॉंग्रेसचे राहुल पुगलिया, चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, मनपा गटनेते तथा विरोधी पक्षनेते डॉ. सुरेश महाकूलकर, नगरसेवक अशोक नागापुरे आदी उपस्थित होते.अनेक गावातील शेतकरी सहभागीसदर आंदोलन शेतकऱ्यांचे व शेतकऱ्यांच्या मागणीसाठी असल्याने मार्डा, विसापूर, शिवणी, पिपरी, दाताळा, वेंडली यासह चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला. केवळ सहभागच दर्शविला नाही तर त्यांनी बैलबंडीतून आपल्या शेतातील भाजीपालाही वाटण्यासाठी आणला.