शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

निवडणूक लढविण्यावर बंदी तरी वेकोलि कर्मचाऱ्यांचे नामांकन

By admin | Updated: July 29, 2015 00:46 IST

४ आॅगस्टला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामीण भागात मोर्चेबांधणी सुरू आहे.

नियमांची पायमल्ली : वेकोलि प्रशासनाचे मात्र कार्यवाही करण्यास दुर्लक्षवतन लोणे घोडपेठ४ आॅगस्टला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामीण भागात मोर्चेबांधणी सुरू आहे. ताडाळी ग्रामपंचायतीमध्येही राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीसाठी अनेक वेकोलि कर्मचाऱ्यांनी नामांकन दाखल केले आहे. मात्र वेकोलिच्या कर्मचाऱ्यांना निवडणूक लढविण्यास नागपूरच्या वेकोलि कार्यालयाने बंदी घातली असतानाही कर्मचाऱ्यांकडून या नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. नागपूर वेकोलि कार्यालयाच्या पत्रानुसार वेकोलि कर्मचाऱ्याने निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतांना नोकरीचा राजीनामा द्यावा, अशी अट आहे. तसेच निवडणूक जिंकल्यास वेकोलिच्या नोकरीवर संबंधीत कर्मचाऱ्याचा कुठल्याही प्रकारचा हक्क राहणार नाही, असेही नमुद आहे. मात्र या पत्राची सर्रास पायमल्ली होत आहे.सध्या ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अनेक पक्षांनी मोर्चेबांधणी करून आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. चंद्रपूर तालुक्यातील ताडाळी व जवळच असलेल्या वेकोलितील नागरिकांचा ताडाळी ग्रामपंचायतीमध्ये समावेश होतो. वेकोलि येथील वणी व चंद्रपूर प्रभागातून पाच सदस्य तसेच ताडाळी गावामधून आठ सदस्य निवडून ग्रामपंचायतीला आवश्यक असणारी तेरा ही सदस्य संख्या पूर्ण करण्यात येते. या निवडणूक प्रक्रियेमध्ये वेकोलिचे कर्मचारीही उमेदवारी दाखल करतात. मात्र, यामध्ये वेकोलि प्रशासनाकडून निवडणूक लढविण्यास घालून दिलेल्या अटींचे सर्रास उल्लंघन केले जात आहे.२ मे २००२ रोजी नागपूरच्या वेकोलि कार्यालयाकडून वेकोलि कर्मचाऱ्यांनी निवडणूक लढविण्यासाठी घातलेल्या अटींचे पत्र वेकोलिच्या सर्व कार्यालयांतील सामान्य प्रबंधक यांना पाठविण्यात आले होते. यानुसार, वेकोलि कर्मचाऱ्याने निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना नोकरीचा राजीनामा द्यावा, अशी अट आहे. तसेच निवडणूक जिंकल्यास वेकोलिच्या नोकरीवर संबंधीत कर्मचाऱ्याचा कुठल्याही प्रकारचा हक्क राहणार नाही. मात्र असे असताना देखील ताडाळी वेकोलिचे कर्मचारी सर्रासपणे निवडणूक लढवून ग्रामपंचायत सदस्य पदाचा उपभोग घेत आहेत. तसेच वेकोलि प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येत नसल्याने, आश्चर्य व्यक्त केला जात आहे.ताडाळी ही तालुक्यातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी ग्रामपंचायत असल्याने तसेच एमआयडीसी परिसरातील कंपन्यांकडून दरवर्षी मिळणारी कराची रक्कम ही लाखोंच्या घरात असल्यामुळे या ठिकाणी गावातील नागरिकांप्रमाणेच वेकोली कर्मचारीही निवडणूक लढण्यास इच्छूक असतात.एका कर्मचाऱ्याची ‘रौप्य महोत्सवी’ वर्षाकडे वाटचाल वेकोलि येथील एक कर्मचारी मागील विस वर्षांपासून निवडणूक लढवत असून ग्रामपंचायत सदस्य पदाचा उपभोग घेत आहे. या निवडणुकीत देखील त्या कर्मचाऱ्याने उमेदवारी अर्ज दाखल करून ‘रौप्य महोत्सवी’ वर्षाकडे वाटचाल करण्याचा निश्चय केला आहे. मात्र वेकोलि प्रशासनाकडून यावर्षी तरी या कर्मचाऱ्यावर कार्यवाही करणार का, याकडे लक्ष लागले आहे.अशा आहेत निवडणूक लढविण्याच्या अटी संबंधित कर्मचाऱ्याने नोकरीचा राजीनामा द्यावा, निकाल लागल्यापासुन एक महिन्याच्या आत पुन्हा नोकरीसाठी प्रस्ताव पाठवावा, त्याला नोकरीवर घेतले जाईल मात्र तो निवडणुक हरल्यावरच, एखादा कर्मचारी निवडणुक जिंकल्यास त्याला परत नोकरीवर घेतले जाणार नाही, वेकोलिच्या माहितीशिवाय निवडणूक लढवत असेल अथवा निवड झालेल्या पदावर कायम राहत असेल तर त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.