शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी माना जमात बांधव रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:38 IST

माना जमातीवर शासनाकडून वारंवार अन्याय केला जात आहे. या अन्यायाविरूद्ध सर्व माना जमातीच्या वतीने शहीदांची भूमी असलेल्या तळोधी (नाईक) येथून रविवारी चेतावनी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो समाजबांधव राजकीय पुढाऱ्याविना सहभागी झाले होते.

ठळक मुद्देएसडीओंना निवेदन : चिमुरात धडकला चेतावनी मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : माना जमातीवर शासनाकडून वारंवार अन्याय केला जात आहे. या अन्यायाविरूद्ध सर्व माना जमातीच्या वतीने शहीदांची भूमी असलेल्या तळोधी (नाईक) येथून रविवारी चेतावनी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो समाजबांधव राजकीय पुढाऱ्याविना सहभागी झाले होते.संविधानातील ३४२ व्या कलमानुसार महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये १८ व्या क्रमांकावर 'माना' जमातीची नोंद आहे. उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय माना जमातीच्या बाजूने आहेत. शिवाय राज्य शासनाचे माना जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, असे परिपत्रक असतानाही अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती गडचिरोली, नागपूर, अमरावती माना जमातीस जात वैधता प्रमाणपत्र देण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ करीत आहे. तसेच माना जमातीचे सर्व प्रकरणे अवैध ठरविण्याचा घाट वरील सर्व तपासणी समित्यांनी घातलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकही माना नाही, अशा पध्दतीचा खोटा अहवाल शासनास गडचिरोली समितीने सादर केला आहे. माना जमातीवर अन्याय करणाºया अधिकाºयांवर कारवाई करावी व माना जमातीस न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अनेकदा केली. परंतु अद्याप कुठलेही पाऊल शासनाकडून उचलले गेलेले नाही. त्यामुळे माना जमातीतील आक्रोश मोर्चाच्या स्वरुपात रस्त्यावर दिसून आला. सदर मोर्चा चिमुरातील उपविभागीय कार्यालयावर धडकला. डॉ. भगवान नन्नावरे, देवीदास जांभुळे, कुलदीप श्रीरामे, संदीप खडसंगे, बळीराम गडमडे, रामराव नन्नावरे आदींच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी भैयासाहेब बेहरे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.