शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वेकोलि बल्लारपूर क्षेत्राला कोट्यवधीचा फटका

By admin | Updated: February 8, 2015 23:32 IST

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्रांतर्गत सुरू असलेल्या खाणीमध्ये अंधाधुंद कारभार सुरू आहे. वेकोलि बल्लारपूर क्षेत्रामधील नवीन खाणी सुरू करताना योग्य काळजी न घेतल्याने जवळपास

बी.यू. बोर्डेवार - राजुरावेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्रांतर्गत सुरू असलेल्या खाणीमध्ये अंधाधुंद कारभार सुरू आहे. वेकोलि बल्लारपूर क्षेत्रामधील नवीन खाणी सुरू करताना योग्य काळजी न घेतल्याने जवळपास १०० कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे. कोळशाच्या पाहणीसाठी सरकारतर्फे सर्व्हे करण्यात येतो. सदर सर्व्हे करताना योग्य दिशानिर्देशाचे पालन करून खाणीची निर्मिती करणे आवश्यक आहे. मात्र असे झाले नसल्याने अनेक खाणी बंद पडल्या आहे.विरूर-सुबई परिसरातील खाणीवर जवळपास ७० कोटी रुपये खर्च करण्यात आले. येथील शेतकऱ्याच्या शेतजमिनी हस्तांतरीत करण्यात आल्या. प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळाली परंतु खाण सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याने बंद करण्यात आली. येथे बांधकाम करताना योग्य काळजी घेण्यात आली नसल्याचा सूर आता कर्मचाऱ्यांत आहे. वेकोलि अधिकाऱ्यांच्या थातुरमातुर कार्यप्रणालीमुळे या भागातील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. या ठिकाणी क्वार्टर तयार करण्यात आले. मात्र त्यातील काही क्वार्टर तोडण्यात आले आहे. या खाणी बंद पडण्यासाठी जबाबदार असलेल्या वेकोलि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. गोवरी-२ या खाणीच्या निर्मितीसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले. बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत गोवरी-२ ही खाणसुद्धा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ३०० च्या वर कर्मचारी या खाणीत इतरत्र हलविण्यात आले. खाण सुरु केल्यानंतर काही वर्ष चालविल्यानंतर त्या लवकरच बंद करण्यात येतात. त्यामुळे शासनाला मोठा फटका बसत आहे. आता पवनी खुल्या खाणीचे काम सुरू आहे. या ठिकाणीसुद्धा पाहिजे त्या प्रमाणात कोल बेंच नसल्याचे बोलल्या जात आहे. बल्लारपूर क्षेत्रामध्ये कोलबेल्ट असला तरी भूगर्भ सर्व्हे योग्य न झाल्यामुळे वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राला कोट्यवधीचा फटका बसत आहे. यापूर्वी बल्लारपूर क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर अनेकवेळा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. परंतु चौकशीला येणारे अधिकारी हे वेकोलिचेच असल्यामुळे कुठलीच कार्यवाही होताना दिसत नाही. कोळसा खाणीमध्ये कोळसा, यंत्र चोरीवर आळा घालणे गरजेचे असून संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.