शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

चार लाख ८१ हजार जनावरांना लाळखुरकत लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST

शेतीला पूरक म्हणून शेतकऱ्यांनी मागील पाच वर्षांपासून जनावरे पाळण्याकडे विशेष लक्ष देत आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून काही शेतकºयांनी दुधाळी जनावरेही घेतली. या जनावरांच्या आरोग्याकडे लक्ष दिले तरच शेतकऱ्यांची स्थिती सुधारू शकते. हे लक्षात घेऊन लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागातर्फे घेण्यात आला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : जि. प. पशुसंवर्धन विभागाची १५ वी फेरी पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जनावरांमध्ये आढळणाºया लाळखुरकत या संसंर्गजन्य गंभीर आजाराच्या निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे लाळखुरकत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेची १५ वी फेरी राबविण्यात आली. या फेरी अंतर्गत ३० ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर २०१९ पर्यंत जिल्ह्यातील चार लाख ८१ हजार २१७ जनावरांचे लसीकरण करण्यात आले.शेतीला पूरक म्हणून शेतकऱ्यांनी मागील पाच वर्षांपासून जनावरे पाळण्याकडे विशेष लक्ष देत आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून काही शेतकºयांनी दुधाळी जनावरेही घेतली. या जनावरांच्या आरोग्याकडे लक्ष दिले तरच शेतकऱ्यांची स्थिती सुधारू शकते. हे लक्षात घेऊन लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागातर्फे घेण्यात आला. विशेषत: लाळखुरकत आजाराला प्रतिबंध केला नाही तर जनावरे दगावण्याचा धोका आहे. लाळखुरकत हा गंभीर आजार असून यालाच ग्रामीण भागात लाळे, पायखुरी व तोंडखुरी असेही म्हटले आहे. या आजारामध्ये तोंड व खुरात जखमा होतात. जनावर चारा खाणे बंद करतात. तोंडातून लाळ गळते, जनावरे चालताना लंगडतात, ताप येतो, थकवा जाणवतो व धाप लागते. यावर उपचार न झाल्यास जनावर मृत्यूमुखी पडण्याचा धोका आहे. शेतीच्या हंगामाची जनावरांचे कधी-कधी स्थलांतरही होते. अशा स्थलांतरीत जनावरांमुळे लाळखुरकत रोगाची लागण होण्याची शक्यता जास्त वाढते. यावर तातडीने प्रतिबंध घातला नाही तर शेतीबरोबरच दुग्ध व्यवसायाचेही मोठे आर्थिक नुकसान होऊ होते. या रोगाला पायबंद घालण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून १५ व्या फेरी अंतर्गत ३० आॅक्टोबरपासून लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जिल्हा परिषद अंतर्गत श्रेणी- १ चे ३१, २ चे ११८ केंद्र तसेच ६ फिरत्या पशुचिकित्सा अशा १५५ केंद्रांत लाळ्खुरकतची लस उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे ४ लाख ८१ हजार २१७ जनावरांचे यशस्वी लसीकरण करणे शक्य होऊ शकले.अशी घ्यावी जनावरांची काळजीसध्या सर्वत्र कडाक्याची थंडी पडत आहे. दिवसा कडक उन्ह तर सकाळी व रात्रभर कडाक्याची थंडी जाणवत आहे. वातावरणातील या बदलामुळे जनावरांच्या प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होण्याचा संभव असतो. त्यामुळे योग्य पद्धतीचे खाद्य आणि स्वच्छ पाण्याबरोबरच जनावरांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पाळीव जनावरांना विशेषत: गाय, बैल, म्हशीला तोंड व पायांना जखमा होऊन लाळखुरकत रोगाची लागण होते. रोगाच्या प्राथमिक टप्यात जनावर अशक्त होते. खाद्यावरची त्याची इच्छा नाहीशी होते, अशी माहिती पशु चिकित्सकांनी दिली.उत्तम शेती करण्यासाठी पाळीव जनावरांची गरज आहे. शेतकºयांची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी या जनावरांचा मोठा लाभ होतो. परंतु जनावरांचे आरोग्य बिघडल्यास याचा अनिष्ट परिणाम शेतकºयांच्या अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे लाळखुरकत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेची १५ वी फेरी जिल्ह्यात यशस्वीरित्या राबवण्यात आली.- डॉ. अविनाश सोमनाथे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि. प.

टॅग्स :doctorडॉक्टर