शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

चार लाख ८१ हजार जनावरांना लाळखुरकत लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST

शेतीला पूरक म्हणून शेतकऱ्यांनी मागील पाच वर्षांपासून जनावरे पाळण्याकडे विशेष लक्ष देत आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून काही शेतकºयांनी दुधाळी जनावरेही घेतली. या जनावरांच्या आरोग्याकडे लक्ष दिले तरच शेतकऱ्यांची स्थिती सुधारू शकते. हे लक्षात घेऊन लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागातर्फे घेण्यात आला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : जि. प. पशुसंवर्धन विभागाची १५ वी फेरी पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जनावरांमध्ये आढळणाºया लाळखुरकत या संसंर्गजन्य गंभीर आजाराच्या निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे लाळखुरकत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेची १५ वी फेरी राबविण्यात आली. या फेरी अंतर्गत ३० ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर २०१९ पर्यंत जिल्ह्यातील चार लाख ८१ हजार २१७ जनावरांचे लसीकरण करण्यात आले.शेतीला पूरक म्हणून शेतकऱ्यांनी मागील पाच वर्षांपासून जनावरे पाळण्याकडे विशेष लक्ष देत आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून काही शेतकºयांनी दुधाळी जनावरेही घेतली. या जनावरांच्या आरोग्याकडे लक्ष दिले तरच शेतकऱ्यांची स्थिती सुधारू शकते. हे लक्षात घेऊन लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागातर्फे घेण्यात आला. विशेषत: लाळखुरकत आजाराला प्रतिबंध केला नाही तर जनावरे दगावण्याचा धोका आहे. लाळखुरकत हा गंभीर आजार असून यालाच ग्रामीण भागात लाळे, पायखुरी व तोंडखुरी असेही म्हटले आहे. या आजारामध्ये तोंड व खुरात जखमा होतात. जनावर चारा खाणे बंद करतात. तोंडातून लाळ गळते, जनावरे चालताना लंगडतात, ताप येतो, थकवा जाणवतो व धाप लागते. यावर उपचार न झाल्यास जनावर मृत्यूमुखी पडण्याचा धोका आहे. शेतीच्या हंगामाची जनावरांचे कधी-कधी स्थलांतरही होते. अशा स्थलांतरीत जनावरांमुळे लाळखुरकत रोगाची लागण होण्याची शक्यता जास्त वाढते. यावर तातडीने प्रतिबंध घातला नाही तर शेतीबरोबरच दुग्ध व्यवसायाचेही मोठे आर्थिक नुकसान होऊ होते. या रोगाला पायबंद घालण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून १५ व्या फेरी अंतर्गत ३० आॅक्टोबरपासून लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जिल्हा परिषद अंतर्गत श्रेणी- १ चे ३१, २ चे ११८ केंद्र तसेच ६ फिरत्या पशुचिकित्सा अशा १५५ केंद्रांत लाळ्खुरकतची लस उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे ४ लाख ८१ हजार २१७ जनावरांचे यशस्वी लसीकरण करणे शक्य होऊ शकले.अशी घ्यावी जनावरांची काळजीसध्या सर्वत्र कडाक्याची थंडी पडत आहे. दिवसा कडक उन्ह तर सकाळी व रात्रभर कडाक्याची थंडी जाणवत आहे. वातावरणातील या बदलामुळे जनावरांच्या प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होण्याचा संभव असतो. त्यामुळे योग्य पद्धतीचे खाद्य आणि स्वच्छ पाण्याबरोबरच जनावरांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पाळीव जनावरांना विशेषत: गाय, बैल, म्हशीला तोंड व पायांना जखमा होऊन लाळखुरकत रोगाची लागण होते. रोगाच्या प्राथमिक टप्यात जनावर अशक्त होते. खाद्यावरची त्याची इच्छा नाहीशी होते, अशी माहिती पशु चिकित्सकांनी दिली.उत्तम शेती करण्यासाठी पाळीव जनावरांची गरज आहे. शेतकºयांची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी या जनावरांचा मोठा लाभ होतो. परंतु जनावरांचे आरोग्य बिघडल्यास याचा अनिष्ट परिणाम शेतकºयांच्या अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे लाळखुरकत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेची १५ वी फेरी जिल्ह्यात यशस्वीरित्या राबवण्यात आली.- डॉ. अविनाश सोमनाथे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि. प.

टॅग्स :doctorडॉक्टर