शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

उथळपेठ देशातील आदर्श गाव बनविण्याचा संकल्प

By admin | Updated: October 10, 2016 00:42 IST

केवळ वीज, लाईट, रस्ते आणि विविध सुविधा निर्माण केल्यानेच गाव आदर्श होत नाही. ज्या गावात आनंद आहे.

सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती : गावकऱ्यांना सोलर किटचे वाटपचंद्रपूर : केवळ वीज, लाईट, रस्ते आणि विविध सुविधा निर्माण केल्यानेच गाव आदर्श होत नाही. ज्या गावात आनंद आहे. तेच खरे आदर्श गाव आहे. उथळपेठ येथे लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासोबतच प्रत्येकाला रोजगार व विविध प्रकारच्या सोईसुविधांच्या माध्यमातून हे गाव देशात सर्वात सुंदर आदर्श गाव बनवू, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.उथळपेठ हे गाव पालकमंत्र्यानीे दत्तक घेतले आहे. या गावातील नागरिकांना शनिवारी घरगुती सोलर किटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सदर किट आयटीसी तसेच बिजली एलईडी लाईटनिंग कंपनीच्या वतीने वितरीत करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, जिल्हा परिषदेचे सभापती देवराव भोंगळे, भाजपा जिल्हा अध्यक्ष हरीष शर्मा, आयटीसी कंपनीचे दक्षिण विभागाचे प्रमुख आशिष पाल, जनरल मॅनेजर प्रशांत मिश्रा, बिजली एलईडी लाईटनिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गगन सिंहाल, जिल्हा परिषद सदस्या वर्षा परचाके, उपवनसंरक्षक धाबेकर, पंचायत समिती सदस्य सुनिल आलमवार, उथळपेठचे सरपंच रविंद्र सातपुते, उपसरपंच अविनाश बुरांडे आदी उपस्थित होते.उथळपेठ सर्वांत आदर्श गांव बनविण्याचा संकल्प आपण केला आहे. हा संकल्प गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय पूर्ण होणार नाही. त्यामुळे यासाठी गावकऱ्यांच्या सकारात्मक विचाराची आवश्यकता आहे. देशात सर्वात सुंदर गावच्या संकल्पपूतीनंतर पंतप्रधानसुध्दा आपल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये या गावाचा उल्लेख केल्याशिवाय राहणार नाही, असे पालकमंत्री म्हणाले. तसेच परिसरातील २७ गावाच्या सरपंचांना हिवरेबाजार, राळेगणसिध्दी गावे दाखविणार असल्याचे त्यांनी सांगितले.सदर गांव शंभर टक्के सौरऊर्जेवर करणार असून त्यासाठी आराखडा तयार केला जात आहे. पर्यटनाचा आराखडाही केला जात असून त्याचे लवकरच भूमिपूजन होणार आहे. गावाच्या विकासासाठी ५० लक्ष रुपये देण्यात आले आहे. तसेच निधीची आवश्यकता भासल्यास डिसेंबरमध्ये पुन्हा निधी देण्यात येईल. गावातील रस्ते या निधीतून सुंदर करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. बचत गटाच्या माध्यमातून कुक्कुट पालनाचे क्लस्टर तयार करण्यात येणार असून प्रत्येक शेतकऱ्यांच्या जमिनीचे आरोग्य पत्रकही दिल्या जाणार आहे. उथळपेठ रोजगारयुक्त गाव करण्याचा संकल्पही त्यांनी बोलून दाखविला. प्रास्ताविक सरपंच रविंद्र सातपुते यांनी केले. (नगर प्रतिनिधी)ईश्वरच्या घरातून ईश्वरी कार्यास प्रारंभपालकमंत्र्यांच्या हस्ते गावातील काही घरात प्रत्यक्ष सोलर किट बसवून वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. ज्या घरातून त्यांनी शुभारंभ केला, त्या घरमालकाचे नांव ईश्वर चिचघरे असे होते. ईश्वर नावाच्या व्यक्तीच्या घरातून ईश्वरी कार्याचा प्रारंभ झाला आहे. त्यामुळे निश्चितच उथळपेठ हे गाव पूर्णपणे सोलर गांव होणार असल्याचे आम मुनगंटीवार यावेळी म्हणाले. काही गावकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरुपात पालकमंत्र्यांच्या हस्ते सोलर किटचे वितरण करण्यात आले.