शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

मतदारांकडून १८५३ वेळा टोल फ्रीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 21:55 IST

सध्या निवडणूक रणधुमाळी सुरु आहे. राजकीय मंडळी गावे, शहरे पिंजून काढीत असतानाच प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडताना मतदारांच्या तक्रारी राहू नयेत, यासाठी निवडणूक विभागाने विविध पाऊल उललले आहेत.

ठळक मुद्देमतदारांचा उत्तम प्रतिसाद : भाजपा ५१, काँंग्रेसविरोधात १० तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या निवडणूक रणधुमाळी सुरु आहे. राजकीय मंडळी गावे, शहरे पिंजून काढीत असतानाच प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडताना मतदारांच्या तक्रारी राहू नयेत, यासाठी निवडणूक विभागाने विविध पाऊल उललले आहेत. मतदारांना सहजरीत्या संपर्क साधून आपल्या शंकेचे निरसन करता यावे, यासाठी १९५० या टोल फ्री क्रमांकाची सोय उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेला मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मागील काही दिवसात या टोल फ्री क्रमांकावर तब्बल १ हजार ८५३ फोन कॉल आले असून अनेक मतदारांना शंकेचे निरसन केले आहे. विशेष म्हणजे, या नंबरवर काहींनी तक्रारही केल्या आहे. यामध्ये भाजपाविरुद्ध ५१, तर काँग्रेसविरुध्द १० तक्रारींचा समावेश आहे.जिल्हा निवडणूक विभागाने लोकसभा मतदार संघातील मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. मतदार यादीत आपले नाव आहे का? असेल, तर नावामध्ये काही चुका आहे का? याची माहिती मतदारांना घरबसल्या घेता यावी, यासाठी निवडणूक विभागाने टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.मागील काही दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या या क्रमाकांवर येणाऱ्या फोन कॉलची संख्या वाढली आहे.ही सेवा २४ तास सुरु आहे. आजवर या टोल फ्री क्रमांकावर तब्बल १ हजार ८५३ जणांनी फोन कॉल करुन आपल्या शंका, अडचणी मांडल्या आहेत. १९५० या क्रमांकावर मतदारांनी नोंदविलेल्या प्रत्येक शंकेचे निसरन करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.अधिकारी, कर्मचारीही करताहेत फोन कॉलमतदार टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून मतदार यादीमध्ये आमचे नाव आहे का? नवीन आॅनलाईन फॉर्म भरणे सुरु आहे का? आमचे मतदान ओळखपत्र मिळाले नाही, नाव दुरुस्ती करता येईल का? आॅनलाईन फॉर्म कसा भरावा? असे विविध प्रश्न मतदार विचारत आहेत. शासकीय सेवेत कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारीही टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन इलेक्शन ड्युटीचा भाग क्रमांकासह विविध माहिती घेत आहेत.केंद्राबाबत विचारणाग्रामीण भागातील मतदारांना मतदार केंद्र शोधण्याची गरज पडत नाही. परंतु शहरातील एकाच भागात अनेक मतदान केंद्र असतात. त्यामुळे नेमक्या कोणत्या केंद्रावर आपले मतदान आहे? याची अनेकांना माहिती नसते. याच अनुषंगाने विशेषत: शहरी भागातील मतदार आमचे मतदान कोणत्या केंद्रावर आहे, अशी विचारणा १९५० क्रमांकावर करीत आहेत.तातडीने रिस्पॉन्सग्रामीण अथवा शहरी भागातील मतदारांनी टोल फ्री क्रमांकावर फोन कॉल केल्यानंतर संबंधित मतदाराला उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून तातडीने रिस्पॉन्स दिला जात आहे.त्यामुळेच मागील काही दिवसात फोन कॉलची संख्या वाढली आहे.१९५० वर ७१ तक्रारी१९५० या नंबरची सेवा सुरु केल्यांनतर नागरिक सतर्क झाले आहे. त्यानुसार नागरिक या नंबरवर तक्रारसुद्धा करीत आहे. यामध्ये ७१ तक्रारी आल्या आहेत. विशेष म्हणजे, या तक्रारींपैकी तब्बल ५१ तक्रारी भाजपाविरुद्ध, तर १० तक्रारी काँग्रेसविरुद्ध आहे. अन्य १० तक्रारी विविध अपक्ष उमदेवारांविरुद्ध आहे.शंकेचे निरसनदोन महिन्यापूर्वी सुरु केलेल्या या सहाय्यता नंबरवर आचारसंहितेपूर्वी म्हणजे १० मार्च पूर्वी केवळ ३४९ कॉल आले होते. आचारसंहितेनंतर यात वाढ झाली. १ एप्रिलपर्यंत तब्बल १८५३ जणांनी कॉल करुन शंकेचे निरसन करुन घेतले.जिल्ह्यात प्रथमच हा प्रयोग सुरु करण्यात आला आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या तक्रारीसुद्धा या नंबरवर घेण्यात येत आहे. या नंबरचा मतदारांना लाभ होत आहे.- संजय डांगे, सहाय्यक, जिल्हा मदत केंद्र.