शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

प्रदूषण कमी करण्यासाठी मूल शहरात सौर ऊर्जेचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:23 IST

मूल : दिवसेंदिवस विद्युतच्या वापराने प्रदूषण मानवजातीसाठी घातक परिणाम करणारे ठरत आहे. त्यावर उपाय म्हणजे जास्तीत जास्त सौर ...

मूल : दिवसेंदिवस विद्युतच्या वापराने प्रदूषण मानवजातीसाठी घातक परिणाम करणारे ठरत आहे. त्यावर उपाय म्हणजे जास्तीत जास्त सौर उर्जेचा वापर करणे गरजेचे आहे. हे हेरुन मूल शहरात प्रथमच गांधी चौकात सौर उर्जेचे वाहतूक सिग्नल लावण्यात आले. हे सिग्नल व्यवस्थित सुरू असल्याने सौर उर्जेचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. यासाठी नगर परिषदेच्या माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात असल्याने सौर ऊर्जेचा वापर अधिकाधिक वाढला असून, मूल शहरात दुकाने, घरात, कार्यालय, राईस मिल आदी ठिकाणी सौर ऊर्जा संच बसविण्यात आला आहे. त्यामुळे प्रदूषणावर काही प्रमाणात आळा बसणार आहे.

प्रदूषण ही फार मोठी समस्या असून, दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येते. विद्युतचा वापर घरापासून तर कारखान्यापर्यंत केला जातो. यात होणारी स्पार्किंग असो की जास्त दाबामुळे जळणारे ट्रान्स्फार्मर असो यामुळे सर्वत्र प्रदूषण पसरत असते. यासाठी सौर ऊर्जावर चालणारी विद्युतवाहिनीचा वापर करणे आवश्यक ठरते. हे हेरुन मूल शहरात घरगुतीपासून तर औद्योगिक कामासाठी सौर ऊर्जाचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. प्रदूषण वाढू नये यासाठी शासनाने प्लॅस्टिकवर बंदी घातली आहे. मात्र आडमार्गाने काही प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर सुरू आहे. हा वापर बंद होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, तसेच दुचाकीऐवजी सायकलचा वापर झाल्यास प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.