शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

सेवा हक्क कायद्याचा वापर सर्वसामान्यांमध्ये रुजवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:00 IST

सामान्य जनतेमध्ये पारंपारिक पद्धतीने काम करणारी प्रशासन व्यवस्था रुजली आहे. त्यामुळे आॅनलाईन व्यवस्थेकडे सेवा हक्क कायदयाच्यामार्फत सर्व सामान्य जनतेला वळविताना या कायद्याचे फायदे, येणारे अडथळे व ही यंत्रणा पूर्णता कार्यान्वित झाल्यानंतर भविष्यात बदलणारे प्रशासन याबाबतची माहिती सर्वसामान्य जनतेला झाली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी केले.

ठळक मुद्देस्वाधीन क्षत्रिय : जिल्हाधिकारी कार्यालयात विभागप्रमुखांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सामान्य जनतेमध्ये पारंपारिक पद्धतीने काम करणारी प्रशासन व्यवस्था रुजली आहे. त्यामुळे आॅनलाईन व्यवस्थेकडे सेवा हक्क कायदयाच्यामार्फत सर्व सामान्य जनतेला वळविताना या कायद्याचे फायदे, येणारे अडथळे व ही यंत्रणा पूर्णता कार्यान्वित झाल्यानंतर भविष्यात बदलणारे प्रशासन याबाबतची माहिती सर्वसामान्य जनतेला झाली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी केले.चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित विभाग प्रमुखांच्या बैठकीमध्ये त्यांनी लोकसेवा हक्क आयोगाच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांची प्रत्येक कार्यालयात कशा पद्धतीने अंमलबजावणी केली जाते, याबाबतचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. बी. राठोड, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी सुरुवातीला सादरीकरण केले.जिल्ह्यांमध्ये वरोºयापासून सुरू झालेल्या लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीने गेल्या दोन वर्षात जिल्ह्यामध्ये प्रशासकीय सेवा प्रदान करताना झालेले बदल व आलेल्या अडचणी याबाबतची मांडणी केली. यानंतर प्रत्येक विभागाने सेवा हक्क आयोगाच्या निर्देशाप्रमाणे काम करताना नागरिकांना सुविधा देताना येत असलेल्या अडचणी बाबतही माहिती दिली. तर विविध विभागांच्या आॅनलाईन अंमलबजावणीमध्ये येणाºया अडचणीबाबत आयुक्तांनी बैठकीमध्ये माहिती जाणून घेतली.५०० सेवांची सुविधा मिळणारलोकसेवा हक्क कायद्यान्वये आगामी काळात ५०० सेवांची सुविधा सामान्य नागरिकांना प्रत्येक केंद्रावर दिली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये २२ लाख लोकांना जवळपास १ हजार केंद्राच्या माध्यमातून विविध सुविधा पोहोचविल्या जातात. यामध्ये सेतू केंद्र, सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र यांचा समावेश आहे.