शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

धनसंपत्तीला चांगल्या कामात वापरा

By admin | Updated: November 24, 2014 22:55 IST

कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी व उदरनिर्वाहासाठी पैसा कमाविणे योग्य आहे. मात्र सुख-समुध्दी नाहिशी होतपर्यंत धनाचा लोभ करणे व त्याच्या मागे धावणे योग्य नाही. गरजवंताला मदत केली

नानाबाई रो मायरो : जयाकिशोरीजी यांचे प्रतिपादनचंद्रपूर : कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी व उदरनिर्वाहासाठी पैसा कमाविणे योग्य आहे. मात्र सुख-समुध्दी नाहिशी होतपर्यंत धनाचा लोभ करणे व त्याच्या मागे धावणे योग्य नाही. गरजवंताला मदत केली तर आपणाला आनंद मिळतो. त्यामुळे धनसंपत्तीला चांगल्या कामात वापरा, असा मोलाचा सल्ला राधास्वरुप पूज्य जया किशोरीजी यांंनी दिला.माहेश्वरी महिला मंडळ व माहेश्वरी युवक मंडळच्या वतीने येथील न्यू इंग्लिश हॉयस्कूलच्या पटांगणावर आयोजित ‘नानीबाई रो मायरो’ या कथात्मक कार्यक्रमाच्या आज दुसऱ्या दिवशी पूज्य जया किशोरीजी यांनी विविध बाबींवर प्रकाश टाकला. आधुनिक तंत्रज्ञानामुळे संसार अतिव्यस्ततेकडे जात आहे. त्यामुळे संसार भक्तीच्या मार्गापासून अलिप्त होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने मोबाईल दिला. मात्र या मोबाईलमुळे सर्वच स्वत: अति व्यस्त करून टाकत आहे. परिणामी आपणाला आपल्या संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. यावेळी पूज्य जया किशोरीजी यांनी संत नरसी मेहता यांची कथा ऐकविली. या कथेत दान देणे म्हणजेच जीवनात सुख, शांती व आनंद मिळविणे आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे गरीब, विकलांग लोकांना नेहमी सहकार्य करा, असेही त्यांनी सांगितले. भगवान श्रीकृष्णांची लिला अपरंपार आहे, याची जाणीव आपणाला असायला पाहिजे. प्रतिदिन आपण त्यांच्या भक्तीरसात लिन झालो पाहिजे. असे झाले तर आयुष्यातील अनेक दु:ख कमी होईल, असेही पूज्य जया किशोरीजी यांनी सांगितले. याप्रसंगी जया किशोरीजी यांनी गायलेल्या भजनात श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. यावेळ मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)