शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शीतपेय तयार करताना अशुद्ध पाण्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:27 IST

दोन आठवड्यांपासून शहरातील तापमानात वाढ झाली. दुपारी उन्हाचे चटके बसू लागल्याने शहरातील गांधी चौक, कस्तुरबा मार्ग, बंगाली कॅम्प, बाबूपेठ, ...

दोन आठवड्यांपासून शहरातील तापमानात वाढ झाली. दुपारी उन्हाचे चटके बसू लागल्याने शहरातील गांधी चौक, कस्तुरबा मार्ग, बंगाली कॅम्प, बाबूपेठ, बागला चौक, तुकूम, दुर्गापूर तसेच विविध मार्गांवर शीतपेयांचे हातठेले सुरू झाले. उन्हामुळे आइसक्रीम पार्लर, ज्युस व रसवंती ठेल्यांसमोर युवक-युवतींची गर्दी दिसत आहे. शीतपेये तयार करण्यासाठी बर्फाची गरज भासते. चंद्रपूर शहरात बर्फनिर्मिती करणाऱ्यांची संख्या बरीच आहे. मात्र, याकरिता अशुद्ध पाण्याचा वापर सुरू असल्याचा आरोप ग्राहकांनी केला. बर्फ निर्मिती करताना पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे लागतात. अन्न व औषध प्रशासनाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. तपासणीनंतरच संबंधित विभागाकडून परवानगी दिली जाते. परंतु, बऱ्याच व्यावसायिकांनी याकडे दुर्लक्ष करून बर्फ उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. कोरोना संसर्गाच्या काळात प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही, तर गर्दीमुळे रुग्णांची संख्या पुन्हा वाढू शकते.

शीतपेयांची तपासणी करावी

शीतपेये तयार करताना अशुद्ध पाण्याचा वापर सुरू असल्याने चंद्रपूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशुद्ध पाण्यातून आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे महापालिका, अन्न व औषध प्रशासनाने सोडामिश्रित शीतपेये, रस्त्यावरील सरबते व फळांचे रस यांची तपासणी मोहीम सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दुर्धर आजारांना निमंत्रण

कृत्रिम पेयामुळे दुर्धर आजारांना निमंत्रण मिळते. अशा पेयांमध्ये कॅपिन, घातक रंग, कॉबर्न डायऑक्साईड, अ‍ॅल्युमिनियम आदीचा वापर केला जातो. अशा घटकांमुळे शरीराचे संतुलन बिघडते. प्रतिकारशक्ती कमी होते. कोरोना संसर्ग काळात हे अत्यंत धोकादायक असल्याची माहिती चंद्रपुरातील आहारतज्ज्ञ डॉ. श्रीपाद डुमरे यांनी दिली.

उन्हाच्या काहिलीत लिंबू रसाला पसंती

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंबू रसाला अत्यंत महत्त्व आहे. शरीरातील ऊर्जा टिकविण्यासाठी लिंबू पाणी व सरबत उत्तम पर्याय असल्याने नागरिकांची विशेष पसंती आहे. काही दिवसांपूर्वी १० रुपयांना चार लिंबू मिळत होते. आता मागणी वाढल्याने दोनच लिंबू मिळतात.