शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

शीतपेय तयार करताना अशुद्ध पाण्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:27 IST

दोन आठवड्यांपासून शहरातील तापमानात वाढ झाली. दुपारी उन्हाचे चटके बसू लागल्याने शहरातील गांधी चौक, कस्तुरबा मार्ग, बंगाली कॅम्प, बाबूपेठ, ...

दोन आठवड्यांपासून शहरातील तापमानात वाढ झाली. दुपारी उन्हाचे चटके बसू लागल्याने शहरातील गांधी चौक, कस्तुरबा मार्ग, बंगाली कॅम्प, बाबूपेठ, बागला चौक, तुकूम, दुर्गापूर तसेच विविध मार्गांवर शीतपेयांचे हातठेले सुरू झाले. उन्हामुळे आइसक्रीम पार्लर, ज्युस व रसवंती ठेल्यांसमोर युवक-युवतींची गर्दी दिसत आहे. शीतपेये तयार करण्यासाठी बर्फाची गरज भासते. चंद्रपूर शहरात बर्फनिर्मिती करणाऱ्यांची संख्या बरीच आहे. मात्र, याकरिता अशुद्ध पाण्याचा वापर सुरू असल्याचा आरोप ग्राहकांनी केला. बर्फ निर्मिती करताना पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे लागतात. अन्न व औषध प्रशासनाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. तपासणीनंतरच संबंधित विभागाकडून परवानगी दिली जाते. परंतु, बऱ्याच व्यावसायिकांनी याकडे दुर्लक्ष करून बर्फ उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. कोरोना संसर्गाच्या काळात प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही, तर गर्दीमुळे रुग्णांची संख्या पुन्हा वाढू शकते.

शीतपेयांची तपासणी करावी

शीतपेये तयार करताना अशुद्ध पाण्याचा वापर सुरू असल्याने चंद्रपूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशुद्ध पाण्यातून आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे महापालिका, अन्न व औषध प्रशासनाने सोडामिश्रित शीतपेये, रस्त्यावरील सरबते व फळांचे रस यांची तपासणी मोहीम सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दुर्धर आजारांना निमंत्रण

कृत्रिम पेयामुळे दुर्धर आजारांना निमंत्रण मिळते. अशा पेयांमध्ये कॅपिन, घातक रंग, कॉबर्न डायऑक्साईड, अ‍ॅल्युमिनियम आदीचा वापर केला जातो. अशा घटकांमुळे शरीराचे संतुलन बिघडते. प्रतिकारशक्ती कमी होते. कोरोना संसर्ग काळात हे अत्यंत धोकादायक असल्याची माहिती चंद्रपुरातील आहारतज्ज्ञ डॉ. श्रीपाद डुमरे यांनी दिली.

उन्हाच्या काहिलीत लिंबू रसाला पसंती

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंबू रसाला अत्यंत महत्त्व आहे. शरीरातील ऊर्जा टिकविण्यासाठी लिंबू पाणी व सरबत उत्तम पर्याय असल्याने नागरिकांची विशेष पसंती आहे. काही दिवसांपूर्वी १० रुपयांना चार लिंबू मिळत होते. आता मागणी वाढल्याने दोनच लिंबू मिळतात.