शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

प्लास्टिकचा अनिर्बंध वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:33 IST

मच्छीनाल्याचे अस्तित्व धोक्यात चंद्रपूर : मूल मार्गावरील मच्छीनाल्याचा उपयोग काही नागरिक कचरा टाकण्यासाठी करीत असल्यामुळे नाल्याचे अस्तित्व धोक्यात येण्याची ...

मच्छीनाल्याचे अस्तित्व धोक्यात

चंद्रपूर : मूल मार्गावरील मच्छीनाल्याचा उपयोग काही नागरिक कचरा टाकण्यासाठी करीत असल्यामुळे नाल्याचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिकेने नाल्याची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बांधकाम साहित्यामुळे अडथळा

चंद्रपूर: शहरात अनेक ठिकाणी घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर-नागपूर रोडवरील वरोरा नाका ते वडगाव पर्यंतही अनेक ठिकाणी साहित्य टाकून ठेवण्यात आले आहे.

नियमानुसार, असे साहित्य रस्त्यावर टाकता येत नाही. परंतु महानगरपालिकाही ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे.

डासांच्या प्रादुर्भावाने नागरिक त्रस्त

चंद्रपूर : शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे शहरात विविध आजारांचा फैलाव होत आहे. त्यामुळे डास प्रतिबंधक फवारणी मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांंपासून शहरात डेंग्यू, मलेरिया रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

भुरट्या चोरांमुळे नागरिक त्रस्त

चंद्रपूर : शहरातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे़ हातात लागतील त्या वस्तू पळविण्याचा सपाटा त्यांनी सुरू केला आहे़. पोलिसांनी याकडे लक्ष देऊन रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.

व्यवसायात घरगुती सिलिंडर

चंद्रपूर : मागील काही दिवसांंमध्ये सिलिंडरच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना सिलिंडर घेणे कठीण जात आहे. त्यातच घरगुती वापराचे सिलिंडर काही व्यावसायिक व्यवसायाकरिता वापर करीत अधिक नफा कमविण्याचा प्रयत्न करीत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

वाहनतळाअभावी वाहनधारक त्रस्त

चंद्रपूर : शहरातील बहुतांश इमारतीमध्ये वाहनतळाची जागा नसल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही वर्षांंपूर्वी ज्या इमारतींना वाहनतळ नाही अशा इमारतींवर कारवाई केली होती. यामध्ये काही इमारतधारकांनी वाहनतळाची व्यवस्था केली. मात्र आता परिस्थिती जैसे थे झाली आहे. महानगरपालिकेच्या प्रशासकांनी याकडे लक्ष देऊन वाहनतळाची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात

चंद्रपूर : परिसरातील उद्योगांमुळे तसेच सातत्याने वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे ध्वनी तसेच वायू प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ऊर्जानगर मार्गावर मोठ्या प्रमाणावर कोळशाची वाहतूक केली जाते. त्यामुळे कोळशाचे बारीक कण वातावरणात मिसळून हवा प्रदूषित होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.