शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
4
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
5
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
6
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
7
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
8
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
9
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
10
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
11
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
12
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
13
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
15
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
16
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
17
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
18
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
19
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
20
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ

प्लास्टिकचा अनिर्बंध वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:33 IST

मच्छीनाल्याचे अस्तित्व धोक्यात चंद्रपूर : मूल मार्गावरील मच्छीनाल्याचा उपयोग काही नागरिक कचरा टाकण्यासाठी करीत असल्यामुळे नाल्याचे अस्तित्व धोक्यात येण्याची ...

मच्छीनाल्याचे अस्तित्व धोक्यात

चंद्रपूर : मूल मार्गावरील मच्छीनाल्याचा उपयोग काही नागरिक कचरा टाकण्यासाठी करीत असल्यामुळे नाल्याचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिकेने नाल्याची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बांधकाम साहित्यामुळे अडथळा

चंद्रपूर: शहरात अनेक ठिकाणी घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर-नागपूर रोडवरील वरोरा नाका ते वडगाव पर्यंतही अनेक ठिकाणी साहित्य टाकून ठेवण्यात आले आहे.

नियमानुसार, असे साहित्य रस्त्यावर टाकता येत नाही. परंतु महानगरपालिकाही ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे.

डासांच्या प्रादुर्भावाने नागरिक त्रस्त

चंद्रपूर : शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे शहरात विविध आजारांचा फैलाव होत आहे. त्यामुळे डास प्रतिबंधक फवारणी मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांंपासून शहरात डेंग्यू, मलेरिया रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

भुरट्या चोरांमुळे नागरिक त्रस्त

चंद्रपूर : शहरातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे़ हातात लागतील त्या वस्तू पळविण्याचा सपाटा त्यांनी सुरू केला आहे़. पोलिसांनी याकडे लक्ष देऊन रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.

व्यवसायात घरगुती सिलिंडर

चंद्रपूर : मागील काही दिवसांंमध्ये सिलिंडरच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना सिलिंडर घेणे कठीण जात आहे. त्यातच घरगुती वापराचे सिलिंडर काही व्यावसायिक व्यवसायाकरिता वापर करीत अधिक नफा कमविण्याचा प्रयत्न करीत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

वाहनतळाअभावी वाहनधारक त्रस्त

चंद्रपूर : शहरातील बहुतांश इमारतीमध्ये वाहनतळाची जागा नसल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही वर्षांंपूर्वी ज्या इमारतींना वाहनतळ नाही अशा इमारतींवर कारवाई केली होती. यामध्ये काही इमारतधारकांनी वाहनतळाची व्यवस्था केली. मात्र आता परिस्थिती जैसे थे झाली आहे. महानगरपालिकेच्या प्रशासकांनी याकडे लक्ष देऊन वाहनतळाची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात

चंद्रपूर : परिसरातील उद्योगांमुळे तसेच सातत्याने वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे ध्वनी तसेच वायू प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ऊर्जानगर मार्गावर मोठ्या प्रमाणावर कोळशाची वाहतूक केली जाते. त्यामुळे कोळशाचे बारीक कण वातावरणात मिसळून हवा प्रदूषित होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.