शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

पॅसेंजर बंद असल्याने रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मार्च २०२० पासून लाॅकडाऊन करण्यात आले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तेव्हापासून रेल्वेची ...

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मार्च २०२० पासून लाॅकडाऊन करण्यात आले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तेव्हापासून रेल्वेची प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मधल्या काळात शिथिलता मिळाली. त्यामुळे काही रेल्वे सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्यात आला. मात्र, पॅसेंजर अद्यापही बंदच आहे. त्यातच आता कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे या रेल्वे सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. परिणामी, नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करून प्रवास करावा लागत आहे.

चंद्रपूर, तसेच बल्लारपूर रेल्वे स्थानकावर बहुतांश रेल्वे थांबतात. मात्र, आता काही विशेष गाड्यांशिवाय अन्य रेल्वे धावतच नसल्याने, रेल्वे स्थानकावरही आता शुकशुकाट बघायला मिळत आहे. विशेषत: बल्लारपूर येथून बल्लारशा-गोंदिया, बल्लारशहा-वर्धा या पॅसेंजर धावतात. मात्र, लाॅकडऊनपासून या रेल्वे गाड्या बंद आहे. परिणामी, अनेकांचा रोजगारही बुडाला आहे. पॅसेंजर बंद असल्याने या मार्गावरून प्रवास करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. त्यामुळे प्र‌वाशांचे नुकसान होत आहे. या मार्गाने प्रवास करणारे प्रवासी आता रेल्वे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, रुग्णसंख्या वाढत असल्याने सध्यातरी पॅसेंजर सुरू होण्याची शक्यता कमीच आहे.

मागील मार्च महिन्यापासून बल्लारपूर-गोंदिया, तसेच बल्लारपूर वर्धा ही पॅसेंजर बंद आहे. परिणामी, या मागार्वरील दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसत आहे. बसने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नाहक आर्थिक फटका बसत आहे.

बल्लारशहा-गोंदिया, बल्लारशहा-वर्धा या प्रवासासाठी पॅसेंजर गाडी आहे. मात्र, त्या बंद असल्यामुळे प्रवाशांना जाण्या-येण्यासाठी ४०० ते ५०० रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.