शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पॅसेंजर बंद असल्याने रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मार्च २०२० पासून लाॅकडाऊन करण्यात आले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तेव्हापासून रेल्वेची ...

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मार्च २०२० पासून लाॅकडाऊन करण्यात आले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तेव्हापासून रेल्वेची प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मधल्या काळात शिथिलता मिळाली. त्यामुळे काही रेल्वे सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्यात आला. मात्र, पॅसेंजर अद्यापही बंदच आहे. त्यातच आता कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे या रेल्वे सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. परिणामी, नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करून प्रवास करावा लागत आहे.

चंद्रपूर, तसेच बल्लारपूर रेल्वे स्थानकावर बहुतांश रेल्वे थांबतात. मात्र, आता काही विशेष गाड्यांशिवाय अन्य रेल्वे धावतच नसल्याने, रेल्वे स्थानकावरही आता शुकशुकाट बघायला मिळत आहे. विशेषत: बल्लारपूर येथून बल्लारशा-गोंदिया, बल्लारशहा-वर्धा या पॅसेंजर धावतात. मात्र, लाॅकडऊनपासून या रेल्वे गाड्या बंद आहे. परिणामी, अनेकांचा रोजगारही बुडाला आहे. पॅसेंजर बंद असल्याने या मार्गावरून प्रवास करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. त्यामुळे प्र‌वाशांचे नुकसान होत आहे. या मार्गाने प्रवास करणारे प्रवासी आता रेल्वे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, रुग्णसंख्या वाढत असल्याने सध्यातरी पॅसेंजर सुरू होण्याची शक्यता कमीच आहे.

मागील मार्च महिन्यापासून बल्लारपूर-गोंदिया, तसेच बल्लारपूर वर्धा ही पॅसेंजर बंद आहे. परिणामी, या मागार्वरील दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसत आहे. बसने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नाहक आर्थिक फटका बसत आहे.

बल्लारशहा-गोंदिया, बल्लारशहा-वर्धा या प्रवासासाठी पॅसेंजर गाडी आहे. मात्र, त्या बंद असल्यामुळे प्रवाशांना जाण्या-येण्यासाठी ४०० ते ५०० रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.