शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

अज्ञात रोगाने कपाशीचे पीक उद्ध्वस्त होण्याचा धोका

By admin | Updated: September 20, 2016 00:45 IST

कापूस पिकांवर अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे.

गोवरी : कापूस पिकांवर अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे. फळधारणेवर आलेल्या कपाशीला बाधा झाल्याने पिकांची तर वाढ खुंटलीच. परंतु संपूर्ण पिक उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरीपुन्हा आर्थिक विवंचनेत सापडला असून शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांच्या योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.विदर्भात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. चंद्रपूर जिल्हा तर नेहमीच कापूस उत्पादनात अग्रेसर असतो. कापूस हे नगदी पिक असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली आहे. सध्या कपाशीचे पीक फळधारणेवर आले आहे. दिवस-रात्र काबाडकष्ट करून पिकांना वाढविले आहे. मात्र त्याच पिकांवर आता अज्ञात रोगाचा विळखा पडला आहे. राजुरा तालुक्यातील गोवरी-चिंचोली परिसरात कपाशीवर अज्ञात रोगाने कहर केला आहे तर गोवरी येथील तुळशीराम जुनघरी या शेतकऱ्यांचा शेतातील दोन एकरातील कपाशीचे पीक अज्ञात रोगाने उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कपाशीवरील रोग हटविण्यासाठी अनेकदा कपाशीवर फवारणी केली. मात्र अज्ञात रोगापासून कपाशीची सुटका झाली नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.कपाशीवर चूरडा व अन्य रोगांनी अतिक्रमण केले आहे. कपाशीला अज्ञात रोगांनी ग्रासल्याने कपाशीची वाढ पूर्णत: खुंटली आहे. महागड्या औषधाची फवारणी करून कपाशी पिकाला वाचविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहे. मात्र पिकांवरील रोग हटण्याची कोणतेच चिन्ह दिसत नाही. शेतकरी आधीच आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास आवळत चालला आहे. अस्मानी सुल्तानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी पूरता कोलमडून गेला आहे. शेतकऱ्यांची सारी भिस्त कपाशीवर आहे. (वार्ताहर)कृषी विभागानेशेतकऱ्यांना मार्गदर्शन करावेकपाशीच्या पिकावर अज्ञात रोगाचे थैमान व अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकांना त्यापासून वाचविण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करीत आहे. त्याचा नाहक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास कपाशीचे पीक वाचविता येऊ शकते.कपाशीवर सध्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. अज्ञात रोग व अळीने अतिक्रमण केल्यामुळे किटकनाशक फवारणी करण्यात येत आहे. परंतु कपाशीवर त्याचा फारसा परिणाम होत नसल्याने शेतकऱ्यांची धडधड वाढली आहे.- श्रीधर जुनघरी, शेतकरी, गोवरी