शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 00:33 IST

आपल्या जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहातेच यासोबतच आपण सकारात्मक विचार करायलाही शिकतो,

हंसराज अहीर यांचे प्रतिपादन : भद्रावतीत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाभद्रावती : आपल्या जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहातेच यासोबतच आपण सकारात्मक विचार करायलाही शिकतो, कोण जिंकतो कोण हरतो हे महत्त्वाचे नसून स्पर्धेत सहभागी होणे महत्त्वाचे आहे. लागणारी जिद्द, आत्मविश्वास हा राष्ट्रासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.भद्रावती प्रिमिअर लीगद्वारे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शाहीद अली ले-आऊट पटांगण संताजी नगर भद्रावती येथे करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी रणजी खेळाडू बाबुराव यादव, १९ वर्षाखाली माजी भारतीय क्रिकेट खेळाडू चंद्रशेखर आत्राम, चंद्रकांत गुंडावार, अशोक हजारे, विजय वानखेडे, अफजलभाई, इम्रानखान, मनोज आष्टनकर व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीची १९ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली संजीवनी कावळे व राज्य संघात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या संघाच्या खेळाडूंचा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत एकूण ४० संघानी सहभागी घेतला असून स्पर्धेचा अंतिम सामना १८ जानेवारीला होणार आहे. कार्यक्रमाचे संचालन समिर उपलंचीवार, प्रास्ताविक अफजलभाई तर आभार इम्रान खान यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)