शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

तणाव कमी करण्यासाठी पोलिसांकडून जोपासला जातो अनोखा छंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:28 IST

चंद्रपूर : गेल्या वर्षभरापासून वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलीस दलही कोरोनो योद्धांच्या रूपात सेवा देत आहेत. ही सेवा देत असताना ...

चंद्रपूर : गेल्या वर्षभरापासून वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलीस दलही कोरोनो योद्धांच्या रूपात सेवा देत आहेत. ही सेवा देत असताना पोलीस विभागावर मोठा तणाव आहे. मात्र स्वत:ला तणावमुक्त ठेवण्यासाठी पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी विविध छंद जोपासून तणावविरहित राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनातर्फे वेळोवेळी लॉकडाऊन अर्थात कडक निर्बंध लागू केले जात आहेत. त्यामुळे पोलीस रस्त्यावर उतरल्याशिवाय गर्दी नियंत्रणात आणणे शक्य नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोठा ताण आहे. सततच्या व्यस्ततेवर उपाय म्हणून आरोग्यासह शांतचित्त राहण्यासाठी पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी अनेक छंद जोपासत स्वत:मधील सुप्तगुण जोपासत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस दलात असे अनेक अधिकारी व कर्मचारी आहेत. ते नोकरीवर लागण्यापूर्वीपासूनच आपला छंद जोपासत आहेत. या छंदातून मन:शांती व एक वेगळी ऊर्जा मिळत असल्याने त्यांचा अनुभव त्यांनी ‘लोकमत’जवळ कथन केला.

अवांतर वाचनाचा छंद

शालेय जीवनापासून अवांतर वाचनाची सवय जडली. आतातर तो छंद झाला आहे. दररोज वाचन केल्याशिवाय चैनच मिळत नाही. यासोबत सकाळी एक तास नियमित व्यायामुसद्धा करीत असतो. त्यामुळे आलेला तणाव दूर होण्यास मदत होत असते. मन शांत ठेवण्यासाठी पुस्तकाला मित्र बनविणे गरजेचे आहे. त्यातूनच योग्य दिशा मिळत असते. आपला बौद्धिक विकास होत असतो.

-प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक

वाचनाला प्राधान्य

तणाव जाणवल्यास वाचनाला सुरुवात करायची. आपोआपच तणाव नाहीसा होतो. पूर्वीपासूनच वाचनाची आवड होती. ती आता आणखीच वृद्धिंगत झाली आहे. कोरोनाकाळातही वाचन सुरूच आहे. विविध विषयांचे वाचन केल्याने माहिती मिळते तसेच मानसिक समाधान लाभत असते. त्यामुळे दररोज एक तास तरी वाचन करीत असतो.

-शेखर देशमुख, पोलीस उपअधीक्षक (गृह)

आनापान साधना

तणावातून मुक्ती मिळविण्यासाठी आनापान साधना करीत असतो. त्यातून मन शांत होत असते आणि प्रसन्न वाटत असते. दहा दिवसाचे आनापान साधना शिबिर केले आहे. तेव्हापासून नियमित आनापान करीत असतो. त्यातून मन एकाग्र होत असते. कधी काही तणाव वाटल्यास तिथेच श्वासाची प्रक्रिया बघत असतो.

किरण मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

सायकलिंग व रनिंग

दररोज सकाळी सायकलिंग करणे आणि रनिंग करणे हा माझा नित्यक्रम आहे. त्यामुळे दिवसभर फ्रेश वाटत असते. तणाव जाणवत नाही तसेच शरीर सुदृढ राहण्यास मदत मिळत असते. पूर्वीपासून व्यायाम व सायकलिंगची सवय होती. आता तो छंदच झाला आहे. यामध्ये कधीच खंड पडू देत नाही.

हृदयनाथ यादव, वाहतूक निरीक्षक, चंद्रपूर