शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

चंद्रपूरच्या किल्लावरील ‘युनियन जॅक’ला १९९ वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2017 00:32 IST

ब्रिटिशांनी पठाणपुरा गेटजवळ युद्ध करून गोंडराजाला पराजय स्वीकार करण्यास बाध्य केले होते.

२० मे १८१८ : ‘इको-प्रो’तर्फे युद्ध शहिदांना श्रद्धांजलीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रिटिशांनी पठाणपुरा गेटजवळ युद्ध करून गोंडराजाला पराजय स्वीकार करण्यास बाध्य केले होते. त्यानंतर त्यांनी पठाणपुरा गेटवर २० मे १८१८ रोजी ‘युनियन जॅक’ फडकविला होता. त्या घटनेला शनिवारी १९९ वर्षे पूर्ण झाली. त्या युध्दातील शहिदांना ‘इको-प्रो’तर्फे श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.चंद्रपूर शहर २० मे १८१८ रोजी इंग्रजाच्या ताब्यात गेले होते. १०-१२ दिवस चाललेल्या या युध्दात नागपूरकर भोसल्यांच्या व गोंडराजाच्या सैनिकांना पराभव स्वीकारावा लागला होता. या युध्दात चंद्रपूरचे किल्लेदार गंगासिंग जाट शहीद झाले. त्यांच्या समाधी परिसरात इको-प्रो संस्थेने स्वच्छता अभियान राबवून पुष्प अर्पण केले. यावेळी इतर शहीद सैनिकांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, गणेशसिंग ठाकूर, इको-प्रोचे नितीन बुरडकर, नितीन रामटेके व धर्मेद्र लुणावत उपस्थित होते. या युद्धात ब्रिटिश अधिकारी मेजर कोरहॅमसुध्दा मारला गेला होता. इंग्रजांनी पठाणपुरा गेट बाहेर एका शेतात मेजर कोरहॅम व इंग्रज सैन्यातील सैनिकांची समाधी बांधल्या आहेत. या परिसरातसुध्दा इको-प्रो सदस्यांनी स्वच्छता अभियान राबविले.इको-प्रोने १ मार्चपासून ‘चंद्रपूर किल्ला (परकोट) स्वच्छता अभियान’ सुरू केले आहे. आज अभियानाचा शनिवारी ७५ वा दिवस होता. र्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी इतिहासाबाबत इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाला इको-प्रो चे विनोद दुधनकर, मनीष गांवडे, हरीश मेश्राम, वैभव मडावी, विकील शेंडे, सुनील पाटील, अभय अमृतकर, सचिन धोतरे उपस्थित होते.शहीद किल्लेदार गंगासिंग जाटगंगासिंग हा आप्पासाहेब भोसल्याचा चंद्रपूर येथील एक विश्वासू किल्लेदार होता. त्याचे आडनाव दिघ्वा असे होते. जटपुरा गेट परिसरात त्याकाळी जाटांची बरीच वस्ती होती. त्यामुळे या गेटचे नाव जटपुरा गेट पडले आहे. गंगासिंगाच्या घरासमोर झालेल्या हातघाईच्या लढाईत गंगासिंग गंभीर जख्मी झाला होता. त्यामुळे त्याने विष प्राशन केले होते. कारण कैद केल्यावर इंग्रज शिक्षा करतील, असे त्याला वाटले. तसेच मरण्याआधी पठाणपुरा गेटवरील गोलदांज अलीखान तोपची याने तोफेचा मारा करून इग्रंज अधिकारी मेजर कोरहॅम यास ठार केले होते. इंग्रज अधिकाऱ्यास ठार केल्याबद्दल गगांसिंगने अलीखानला जवळ बोलावून त्याचा मोठा गौरव करून बक्षीस दिले.