शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

दारुबंदीचा सर्वच व्यवसायांवर विपरित परिणाम

By admin | Updated: April 10, 2015 00:56 IST

युद्धाचे परिणाम युद्धानंतर जाणवतात असे म्हणतात. चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदीबाबतही हेच म्हणता येईल.

नागभीड : युद्धाचे परिणाम युद्धानंतर जाणवतात असे म्हणतात. चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदीबाबतही हेच म्हणता येईल. एकीकडे दारुबंदीचे जोरदार समर्थन होत असताना दुसरीकडे मात्र दारु व्यवसायाशी निगडीत असलेले छोटेछोटे धंदे बंद तर झालेच. पण त्याचबरोबर नागभीड शहरातील एकंदर ‘मार्केटिंग’ वर सुद्धा या दारुबंदीचा परिणाम जाणवत असल्याचे बोलल्या जात आहे. दारूबंदीचे महिलांनी मात्र स्वागत केले आहे.नागभीड शहराचा विचार केला तर या ठिकाणी देशी दारुची दोन तर विदेशी दारुची चार दुकाने होती. या दुकानांच्या अवतीभोवती अनेकांनी आपले लहान-लहान व्यवसाय थाटले होते. गेल्या एक दोन वर्षात या परिसरात भाजीपाला, अंडी, मासे विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणावर लागली होती. आता या परिसरात कोणीच फिरकत नसल्याने या छोट्या-छोट्या व्यवसायांवर अवकळा आली आहे. याच परिसरात चहा, नाश्ता व अन्य पदार्थाच्या विक्रीचीही दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्या विक्रीवरही मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे एका व्यवसायिकाने ‘लोकमत’ला सांगितले.दुसरे एक व्यावसायिक लोकमतशी बोलताना म्हणाले, खेड्यापाड्यावर दारु मिळत नसल्याने लोक मुद्दाम या निमित्ताने नागभीडला यायचे. आपली हौस पूर्ण केल्यानंतर मुलांसाठी ५-५० रुपयांचे सामान खरेदी करायचे. पण आता लोकांचे येणेच बंद झाल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम जाणवू लागला आहे. नागभीडचा आठवडी बाजार गुरुवारी भरत असतो. दारुबंदी १ एप्रिलला लागू झाली. २ एप्रिलला येथील आठवडी बाजारात एरवी सारखा उत्साह नव्हता. खेड्यापाड्यातील लोक फार कमी बाजारात दिसत होते, अशी माहिती एका जाणकाराने दिली. (तालुका प्रतिनिधी)