शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

दारुबंदीचा सर्वच व्यवसायांवर विपरित परिणाम

By admin | Updated: April 10, 2015 00:56 IST

युद्धाचे परिणाम युद्धानंतर जाणवतात असे म्हणतात. चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदीबाबतही हेच म्हणता येईल.

नागभीड : युद्धाचे परिणाम युद्धानंतर जाणवतात असे म्हणतात. चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदीबाबतही हेच म्हणता येईल. एकीकडे दारुबंदीचे जोरदार समर्थन होत असताना दुसरीकडे मात्र दारु व्यवसायाशी निगडीत असलेले छोटेछोटे धंदे बंद तर झालेच. पण त्याचबरोबर नागभीड शहरातील एकंदर ‘मार्केटिंग’ वर सुद्धा या दारुबंदीचा परिणाम जाणवत असल्याचे बोलल्या जात आहे. दारूबंदीचे महिलांनी मात्र स्वागत केले आहे.नागभीड शहराचा विचार केला तर या ठिकाणी देशी दारुची दोन तर विदेशी दारुची चार दुकाने होती. या दुकानांच्या अवतीभोवती अनेकांनी आपले लहान-लहान व्यवसाय थाटले होते. गेल्या एक दोन वर्षात या परिसरात भाजीपाला, अंडी, मासे विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणावर लागली होती. आता या परिसरात कोणीच फिरकत नसल्याने या छोट्या-छोट्या व्यवसायांवर अवकळा आली आहे. याच परिसरात चहा, नाश्ता व अन्य पदार्थाच्या विक्रीचीही दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्या विक्रीवरही मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे एका व्यवसायिकाने ‘लोकमत’ला सांगितले.दुसरे एक व्यावसायिक लोकमतशी बोलताना म्हणाले, खेड्यापाड्यावर दारु मिळत नसल्याने लोक मुद्दाम या निमित्ताने नागभीडला यायचे. आपली हौस पूर्ण केल्यानंतर मुलांसाठी ५-५० रुपयांचे सामान खरेदी करायचे. पण आता लोकांचे येणेच बंद झाल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम जाणवू लागला आहे. नागभीडचा आठवडी बाजार गुरुवारी भरत असतो. दारुबंदी १ एप्रिलला लागू झाली. २ एप्रिलला येथील आठवडी बाजारात एरवी सारखा उत्साह नव्हता. खेड्यापाड्यातील लोक फार कमी बाजारात दिसत होते, अशी माहिती एका जाणकाराने दिली. (तालुका प्रतिनिधी)