शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2016 00:48 IST

यावर्षी खरीप हंगामात पावसाने दगा दिला. सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाल्याने खरीप पिके शेतकरी वाचवू शकला नाही.

रबीचे अतोनात नुकसान : विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊसचंद्रपूर : यावर्षी खरीप हंगामात पावसाने दगा दिला. सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाल्याने खरीप पिके शेतकरी वाचवू शकला नाही. उत्पादनात घट येऊन शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला. रबी हंगामात काही नुकसान भरून निघेल, अशी आशा असतानाही आता ऐन पिक हाती येण्याच्या वेळेवर अवकाळी पावसाने जबर फटका दिला आहे. याच आठवड्याच्या प्रारंभी तीन दिवस अवकाळी पाऊस बरसला. आता पुन्हा शुक्रवारी जिल्ह्यात सर्वत्र वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रबीचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी शेतकऱ्यांवर वरूणराजाची अवकृपा सातत्याने कायम राहिली आहे. खरीप हंगामात मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली. प्रारंभी पाऊस वेळेवर येईल, असा अंदाज हवामान खात्यानेही वर्तविल्याने भरघोस पिक येऊन आर्थिक बाजू सुधारेल, असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र त्यानंतर पावसाने दगा दिला. अधेमधे पावसाने हजेरी लावली. मात्र सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाला. ज्यावेळी शेतकऱ्यांना पावसाची गरज होती. नेमके त्याच वेळी पाऊस बरसला नाही. नदी-नाल्यातही अत्यल्प जलसाठा असल्याने सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अशाही परिस्थिती शेतकऱ्यांनी पीक वाचविण्याचा कसाबसा प्रयत्न केला. मात्र उत्पादनात प्रचंड घट आली. लागवड खर्चही निघू शकला नाही. पाऊस नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी रबी हंगामाकडे पाठ फिरवली. मात्र काही शेतकऱ्यांनी रबीत तरी थोडेफार नुकसान भरून निघेल, या आशेपोटी गहू, हरभरा, लाखोरी, तूर उडीद, मुंग या रबी पिकांची पेरणी केली. आतापर्यंत सर्व ठिकठाक होते. मात्र फेब्रुवारी महिन्याअखेर अवकाळी पावसाने कहर केला.२८, २९ फेब्रुवारी व १ मार्च या सतत तीन दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. घुग्घुस येथे २८ फेब्रुवारीला रात्री गारपीट झाली. तर २९ फेब्रुवारीला ब्रह्मपुरी, जिवती, सिंदेवाही, चिमूर, मूल, सावली, गोंडपिंपरी आदी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गहू, हरभरा, लाखोरी, तूर उडीद, मुंग या रबी पिकांसह भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला आहे. २७ फेब्रुवारीलाही चंद्रपूरसह जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. चंद्रपुरात सुमारे अर्धा तास पाऊस झाला होता. चिमूर, बल्लारपूर, सावली, नागभीड या तालुक्यातही या दिवशी रिमझीम पाऊस झाला. २९ फेब्रुवारीला सिंदेवाही, सावली तालुक्यातील गेवरा, जिवती तालुक्यातील पाटण, गडचांदूर, घुग्घुस व ब्रह्मपुरी येथे मुसळधार पाऊस झाला. तर सायंकाळच्या सुमारास ब्रह्मपुरीत पुन्हा पाऊस झाला. सिंदेवाही येथेही सुमारे एक तास झालेल्या वादळी पावसाने जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले होते. सध्या अनेक शेतकऱ्यांचे रबी पीक हाती येण्याच्या स्थितीत असून लाखोरी, तूर, हरभरा, गहू आदी रबी पिके कापणी करून शेतात ढीग करून आहेत. अशातच आज शुक्रवारी पुन्हा जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. त्यानंतर विजांचा कडकडाटासह वादळी पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्यातील चिमूर, राजुरा, जिवती, मूल, सावली, चंद्रपूर, कोरपना, बल्लारपूर, नागभीड तालुक्यात वादळासह पाऊस बरसला. (शहर प्रतिनिधी)शेतकऱ्यांची धावपळअनेक शेतकऱ्यांची कडधान्य कापून शेतात सुकण्यासाठी ठेवले आहेत. अशातच आज अचानक पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. अनेक शेतकरी कापलेला गहू व इतर पीक वाचविण्यासाठी विजांच्या कडकडाटातच शेतात धावपळ करताना दिसून आल्याचे आमच्या वार्ताहरांनी सांगितले.विजांच्या कडकडाटामुळे शेतकरी भयभीतशेतात काम करीत असताना अनेकांचा वीज पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आज राजुरा, मूल, चंद्रपूर आदी तालुक्यात असाच विजांचा कडकडाट सुरू होता. त्यामुळे शेतात जाऊन पीक कसे वाचवावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. दरम्यान, राजुरा तालुक्यातील मंगी (बू.) येथील मलकू सोमा आडे (६०) यांचा आज शेतात काम करीत असताना वीज पडून मृत्यू झाला. मूल तालुक्यात गारपीटमूल तालुक्यातील अनेक भागात आज दुपारपासूनच पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील अनेक भागात गारपीट झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांची व लहानसहान दुकानदारांची चांगलीच धावपळ झाली.