शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2016 00:48 IST

यावर्षी खरीप हंगामात पावसाने दगा दिला. सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाल्याने खरीप पिके शेतकरी वाचवू शकला नाही.

रबीचे अतोनात नुकसान : विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊसचंद्रपूर : यावर्षी खरीप हंगामात पावसाने दगा दिला. सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाल्याने खरीप पिके शेतकरी वाचवू शकला नाही. उत्पादनात घट येऊन शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला. रबी हंगामात काही नुकसान भरून निघेल, अशी आशा असतानाही आता ऐन पिक हाती येण्याच्या वेळेवर अवकाळी पावसाने जबर फटका दिला आहे. याच आठवड्याच्या प्रारंभी तीन दिवस अवकाळी पाऊस बरसला. आता पुन्हा शुक्रवारी जिल्ह्यात सर्वत्र वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रबीचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी शेतकऱ्यांवर वरूणराजाची अवकृपा सातत्याने कायम राहिली आहे. खरीप हंगामात मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली. प्रारंभी पाऊस वेळेवर येईल, असा अंदाज हवामान खात्यानेही वर्तविल्याने भरघोस पिक येऊन आर्थिक बाजू सुधारेल, असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र त्यानंतर पावसाने दगा दिला. अधेमधे पावसाने हजेरी लावली. मात्र सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाला. ज्यावेळी शेतकऱ्यांना पावसाची गरज होती. नेमके त्याच वेळी पाऊस बरसला नाही. नदी-नाल्यातही अत्यल्प जलसाठा असल्याने सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अशाही परिस्थिती शेतकऱ्यांनी पीक वाचविण्याचा कसाबसा प्रयत्न केला. मात्र उत्पादनात प्रचंड घट आली. लागवड खर्चही निघू शकला नाही. पाऊस नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी रबी हंगामाकडे पाठ फिरवली. मात्र काही शेतकऱ्यांनी रबीत तरी थोडेफार नुकसान भरून निघेल, या आशेपोटी गहू, हरभरा, लाखोरी, तूर उडीद, मुंग या रबी पिकांची पेरणी केली. आतापर्यंत सर्व ठिकठाक होते. मात्र फेब्रुवारी महिन्याअखेर अवकाळी पावसाने कहर केला.२८, २९ फेब्रुवारी व १ मार्च या सतत तीन दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. घुग्घुस येथे २८ फेब्रुवारीला रात्री गारपीट झाली. तर २९ फेब्रुवारीला ब्रह्मपुरी, जिवती, सिंदेवाही, चिमूर, मूल, सावली, गोंडपिंपरी आदी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गहू, हरभरा, लाखोरी, तूर उडीद, मुंग या रबी पिकांसह भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला आहे. २७ फेब्रुवारीलाही चंद्रपूरसह जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. चंद्रपुरात सुमारे अर्धा तास पाऊस झाला होता. चिमूर, बल्लारपूर, सावली, नागभीड या तालुक्यातही या दिवशी रिमझीम पाऊस झाला. २९ फेब्रुवारीला सिंदेवाही, सावली तालुक्यातील गेवरा, जिवती तालुक्यातील पाटण, गडचांदूर, घुग्घुस व ब्रह्मपुरी येथे मुसळधार पाऊस झाला. तर सायंकाळच्या सुमारास ब्रह्मपुरीत पुन्हा पाऊस झाला. सिंदेवाही येथेही सुमारे एक तास झालेल्या वादळी पावसाने जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले होते. सध्या अनेक शेतकऱ्यांचे रबी पीक हाती येण्याच्या स्थितीत असून लाखोरी, तूर, हरभरा, गहू आदी रबी पिके कापणी करून शेतात ढीग करून आहेत. अशातच आज शुक्रवारी पुन्हा जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. त्यानंतर विजांचा कडकडाटासह वादळी पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्यातील चिमूर, राजुरा, जिवती, मूल, सावली, चंद्रपूर, कोरपना, बल्लारपूर, नागभीड तालुक्यात वादळासह पाऊस बरसला. (शहर प्रतिनिधी)शेतकऱ्यांची धावपळअनेक शेतकऱ्यांची कडधान्य कापून शेतात सुकण्यासाठी ठेवले आहेत. अशातच आज अचानक पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. अनेक शेतकरी कापलेला गहू व इतर पीक वाचविण्यासाठी विजांच्या कडकडाटातच शेतात धावपळ करताना दिसून आल्याचे आमच्या वार्ताहरांनी सांगितले.विजांच्या कडकडाटामुळे शेतकरी भयभीतशेतात काम करीत असताना अनेकांचा वीज पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आज राजुरा, मूल, चंद्रपूर आदी तालुक्यात असाच विजांचा कडकडाट सुरू होता. त्यामुळे शेतात जाऊन पीक कसे वाचवावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. दरम्यान, राजुरा तालुक्यातील मंगी (बू.) येथील मलकू सोमा आडे (६०) यांचा आज शेतात काम करीत असताना वीज पडून मृत्यू झाला. मूल तालुक्यात गारपीटमूल तालुक्यातील अनेक भागात आज दुपारपासूनच पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील अनेक भागात गारपीट झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांची व लहानसहान दुकानदारांची चांगलीच धावपळ झाली.