शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
3
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
4
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
5
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
6
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
7
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
8
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
9
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
10
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
11
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
12
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
13
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
14
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
15
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
16
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
17
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
18
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
19
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
20
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीअभावी बेरोजगारीत वाढ

By admin | Updated: October 22, 2014 23:16 IST

पोंभुर्णा तालुका धानासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या तालुक्यात सिंचनाची पाहिजे तशी व्यवस्था नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहूनच शेती करावी लागते. निसर्गाने दगा

चंद्रपूर : पोंभुर्णा तालुका धानासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या तालुक्यात सिंचनाची पाहिजे तशी व्यवस्था नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहूनच शेती करावी लागते. निसर्गाने दगा दिल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे युवक शेतीकडे न वळता इतर रोजगारांच्या शोधात आहेत. मात्र, या परिसरात एमआयडीसी किंवा अन्य उद्योग नसल्याने बेरोजगारांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. नव्याने राज्यात सत्तेत येणाऱ्या सरकारने तरी तालुक्यात उद्योग किंवा एमआयडीसी स्थापन करावे, अशी मागणी येथील नागरिकांसह महाविद्यालयीन युवकांनी केली आहे. तालुका निर्मितीला १५ वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र, आजही पाहिजे तशा सोयीसुविधा तालुक्यात उपलब्ध नसल्याने नागरिकांना रोजगारासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. ७१ गावांचा समावेश असलेल्या तालुक्यात आजघडीला एकही उद्योग नाही. वैनगंगा, अंधारी नदीच्या पाण्यावर सिंचनाची तसेच उद्योग उभारल्यास बेरोजगारांच्या हाताला काम मिळू शकते, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्याची लोकसंख्या ५० हजार ७८१ आहे. दवर्षी महाविद्यालयीन शिक्षण, आयटीआयमधून प्रमाणपत्र घेऊन शेकडो विद्यार्थी बाहेर पडतात. पदवीधरांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे बेरोजगारीच्या टक्केवारीत वाढ होत आहे. व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या तालुक्यातील बेरोजगारांना पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी फार कमी प्रमाणात नोकरी मिळाली आहे. डी.एड., बी.एड. बीपीएड, एम.ए., एम.एड. शिक्षण घेतलेल्या पदव्युत्तरांना नोकरी मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. बेरोजगारांना त्यांच्या शिक्षणाचा फायदा व्हावा ते स्वयंनिर्भर व्हावे यासाठी शासनाने योजना सुरू केल्या आहेत. परंतु येथे आजघडीला अनेक तरुण बेरोजगारीचे जीवन जगत आहेत. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ३० हजार ९८४ हेक्टर आहे. ३२ ग्रामपंचायती असून ७१ गावांचा समावेश आहे. तालुका निर्मितीला १५ वर्षाचा काळ लोटला. या आदिवासीबहुल मागास तालुक्यात एकही मोठा उद्योग नसल्याने परिसरातील बेरोजगारांना मिळेल ते काम करुन जगावे लागत आहे. तालुक्यामध्ये वैनगंगा व अंधारी या नद्यांचे स्त्रोत लाभले आहे. या नद्यांच्या पाण्यावर एखादा मोठा उद्योग उभा राहिल्यास बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. तालुक्यातील रोजगारांना प्रशिक्षण देऊन बँकांच्या पतपुरवठ्यासाठी शासनस्तरावर पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. लघु उद्योग मंडळाकडून लघु उद्योग उभारणीला मार्गदर्शन करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. पोंभुर्णा तालुका मागासलेला आहे. केवळ धानशेतीवर अनेक शेतकरी अवलंबून आहे. मात्र, निसर्ग साथ देत नसल्याने हा व्यवसायही डबघाईस आला आहे. शासनाने या तालुक्याकडे लक्ष द्यावे. (स्थानिक प्रतिनिधी)