शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

एमआयडीसीअभावी बेरोजगारीत वाढ

By admin | Updated: October 22, 2014 23:16 IST

पोंभुर्णा तालुका धानासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या तालुक्यात सिंचनाची पाहिजे तशी व्यवस्था नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहूनच शेती करावी लागते. निसर्गाने दगा

चंद्रपूर : पोंभुर्णा तालुका धानासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या तालुक्यात सिंचनाची पाहिजे तशी व्यवस्था नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहूनच शेती करावी लागते. निसर्गाने दगा दिल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे युवक शेतीकडे न वळता इतर रोजगारांच्या शोधात आहेत. मात्र, या परिसरात एमआयडीसी किंवा अन्य उद्योग नसल्याने बेरोजगारांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. नव्याने राज्यात सत्तेत येणाऱ्या सरकारने तरी तालुक्यात उद्योग किंवा एमआयडीसी स्थापन करावे, अशी मागणी येथील नागरिकांसह महाविद्यालयीन युवकांनी केली आहे. तालुका निर्मितीला १५ वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र, आजही पाहिजे तशा सोयीसुविधा तालुक्यात उपलब्ध नसल्याने नागरिकांना रोजगारासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. ७१ गावांचा समावेश असलेल्या तालुक्यात आजघडीला एकही उद्योग नाही. वैनगंगा, अंधारी नदीच्या पाण्यावर सिंचनाची तसेच उद्योग उभारल्यास बेरोजगारांच्या हाताला काम मिळू शकते, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्याची लोकसंख्या ५० हजार ७८१ आहे. दवर्षी महाविद्यालयीन शिक्षण, आयटीआयमधून प्रमाणपत्र घेऊन शेकडो विद्यार्थी बाहेर पडतात. पदवीधरांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे बेरोजगारीच्या टक्केवारीत वाढ होत आहे. व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या तालुक्यातील बेरोजगारांना पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी फार कमी प्रमाणात नोकरी मिळाली आहे. डी.एड., बी.एड. बीपीएड, एम.ए., एम.एड. शिक्षण घेतलेल्या पदव्युत्तरांना नोकरी मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. बेरोजगारांना त्यांच्या शिक्षणाचा फायदा व्हावा ते स्वयंनिर्भर व्हावे यासाठी शासनाने योजना सुरू केल्या आहेत. परंतु येथे आजघडीला अनेक तरुण बेरोजगारीचे जीवन जगत आहेत. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ३० हजार ९८४ हेक्टर आहे. ३२ ग्रामपंचायती असून ७१ गावांचा समावेश आहे. तालुका निर्मितीला १५ वर्षाचा काळ लोटला. या आदिवासीबहुल मागास तालुक्यात एकही मोठा उद्योग नसल्याने परिसरातील बेरोजगारांना मिळेल ते काम करुन जगावे लागत आहे. तालुक्यामध्ये वैनगंगा व अंधारी या नद्यांचे स्त्रोत लाभले आहे. या नद्यांच्या पाण्यावर एखादा मोठा उद्योग उभा राहिल्यास बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. तालुक्यातील रोजगारांना प्रशिक्षण देऊन बँकांच्या पतपुरवठ्यासाठी शासनस्तरावर पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. लघु उद्योग मंडळाकडून लघु उद्योग उभारणीला मार्गदर्शन करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. पोंभुर्णा तालुका मागासलेला आहे. केवळ धानशेतीवर अनेक शेतकरी अवलंबून आहे. मात्र, निसर्ग साथ देत नसल्याने हा व्यवसायही डबघाईस आला आहे. शासनाने या तालुक्याकडे लक्ष द्यावे. (स्थानिक प्रतिनिधी)