शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

बाह्य यंत्रणेच्या पदभरतीमुळे तासिका कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 14:22 IST

शासनाने गंभीर होणे गरजेचे : आयटीआयतील तासिका तत्त्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांत असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्क विसापूर : नागपूर विभागातील आयटीआयमध्ये बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ पुरविण्याचा फतवा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक नागपूर विभागाने ४ ऑक्टोबर २०२४ रोजी काढला आहे. शासन निर्णयाला बगल देण्याचा हा प्रकार आहे. यामुळे १५ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या तासिका तत्त्वावरील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचा आसूड ओढला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

ऐन विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या धामधूमीत आयटीआयमध्ये कार्यरत कर्मचान्यांत असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघाने आयटीआयमध्ये होणारी बाह्य यंत्रणेची पद भरती रद्द करण्याची मागणी पुढे केली आहे. 

महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने नागपूर विभागातील आयटीआयमध्ये मे अभिजित इंटेलिजन्स सिक्युरिटी आणि लेबर सप्लायर्स या बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ पुरविण्याचा करार केला आहे. या खासगी कंपनीला नागपूर विभागातील आयटीआयमध्ये तब्बल ४५५ कर्मचाऱ्यांना भरती करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. यामध्ये गट निदेशक, शिल्प निदेशक (व्यवसायनिहाय), गणित तथा चित्रकला निदेशक, वाहनचालक व सफाई कामगारांचा समावेश आहे. या बाह्य यंत्रणेच्या पद भरतीवर महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघाने आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाने तासिका तत्त्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी अहवाल मागितला होता. प्रारंभी अल्प मानधनावर त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सेवा दिली. सेवारत असताना अनेकांनी वयोमर्यादा ओलांडली. बाह्य यंत्रणा तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची शाश्वता नाही. परिणामी कार्यरत कर्मचाऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे, मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या बाह्य यंत्रणेचा कारभार तुघलकी स्वरूपाचा असल्याची माहिती आहे. 

राज्य शासनाचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्याच्या आयटीआयमध्ये कार्यरत तासिका निदेशकांना कंत्राटी म्हणून समावेश करण्याचे आश्वासन दिले आहे. या अनुषंगाने १४ डिसेंबर २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करून समितीची स्थापना करण्याचे नमूद केले आहे. याची अंमलबजावणी न करता बाह्य यंत्रणा नेमणूक करून तासिका तत्त्वावर कार्यरत निदेशकांना देशोधडीला लावण्याचा प्रकार केला आहे. यामुळे अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची शक्यता बळावली आहे. 

पदभरती तातडीने रद्द कराशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये कार्यरत गट निदेशक, शिल्प निदेशक, गणित व चित्रकला निदेशक, वाहनचालक, सफाई कामगारांची कंत्राटी पदावर नियमित नियुक्ती करावी, आयटीआ- यमध्ये कंत्राटदारामार्फत पद भरती तातडीने रद्द करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघाने केली आहे. यासंदर्भात मे. अभिजित इंटेलिजन्स सिक्युरिटी आणि लेबर सप्लायर्स या बाह्य यंत्रणेच्या कंत्राटदारांशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.

"आम्ही मागील १५ वर्षांपासून आयटीआयमध्ये निदेशक म्हणून कार्यरत आहे. आम्ही आमची सेवा तासिका तत्त्वावर मानधनावर देत आहे. नागपूर विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाने बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून आयटीआयमध्ये पद भरती करण्याचा निर्णय अन्याय करणारा आहे. यामुळे आमची कुटुंबे उद्ध्वस्त होतील. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने अमरावती विभागाच्या धर्तीवर नागपूर विभागाने बाह्य यंत्रणेची आयटीआयमध्ये पद भरती रद्द करावी, ही शासनाकडे आग्रही मागणी आहे." - आशिष गजभिये, कार्याध्यक्ष, म. रा. आयटीआय निदेशक संघ, महाराष्ट्र.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर