शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By admin | Updated: April 9, 2016 01:26 IST

कोरपना तालुक्यातील मोठा सिमेंट प्रकल्प असलेल्या मुर्ली अ‍ॅग्रो सिमेंट कंपनीला कोरपना तहसील कार्यालयाने शुक्रवारी अखेर टाळे ठोकले.

मुर्ली अ‍ॅग्रोला टाळे : ४०० स्थायी तर ६०० अस्थायी कामगार अधांतरीरत्नाकर चटप नांदाफाटाकोरपना तालुक्यातील मोठा सिमेंट प्रकल्प असलेल्या मुर्ली अ‍ॅग्रो सिमेंट कंपनीला कोरपना तहसील कार्यालयाने शुक्रवारी अखेर टाळे ठोकले. मागील अनेक दिवसांपासून येथील कामगारांच्या वेतनाचा प्रश्न अनुत्तरीत असताना दुसरीकडे शासनाचा कर न भरल्याने सदर कारवाई झाल्याचे समजते. यामुळे कंपनीत काम करणाऱ्या ४०० स्थायी आणि ६०० अस्थायी कामगारांवर उपासमारीची टांगती तलवार दिसत आहे.यापूर्वी वेजबोर्डनुसार वेतन न मिळणे, कंपनीचे उत्पादन ठप्प होणे आणि वेतनात असलेली अनियमितता कामगारांसाठी मोठी डोकेदुखी ठरली होती. सहा ते सात महिन्याआधी कामगारांनी आंदोलन करून काही महिन्याचे वेतन मिळवून घेतले. मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे दिसत आहे. या कंपनीत स्थानिक तसेच परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात आहे. तर काही कामगार परजिल्ह्यातून किरायाच्या खोलीत राहून आपला संसार चालवित आहे. कंपनीची स्थापना झाल्यानंतर नजीकच्या शेतकऱ्यांना रोजगाराची संधी मिळेल आणि आयुष्याची भाकर शोधता येईल, अशी आशा होती. मात्र हाताला काम मिळत नसल्याने स्थानिक युवकांमध्ये कमालीची नाराजी पसरलेली दिसत आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी या प्रकल्पासाठी दिल्या तर काहींना नोकरीचे आमीषही देण्यात आले. परंतु कंपनीचे कामकाज सुरळीत नसल्याने वेतनाचा प्रश्न स्थानिकांना भेडसावत आहे. कंपनीत कामगारांना मुलभूत सुविधा देण्यात याव्या, यासाठी कामगार संघटनांनी यापूर्वी आंदोलने केली खरी, मात्र अद्यापही कामगारांना न्याय मिळाला नाही. पक्षीय राजकारणातून श्रेय लाटण्याची धडपड कामगार नेत्यांमध्ये अधिक दिसून येत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या कंपनीमध्ये कामगारांना राहण्याची, पाण्याची, आरोग्य आदी सुविधा नाही. त्यामुळे स्वत: खर्च करून मिळेल त्या वेतनात कामगार काम करीत आहे. कंपनीला टाळे ठोकल्याने कंपनी कामकाज बंद होईल काय, अशी चर्चा कामगारांमध्ये आहे. आतील मुख्य दाराला टाळे ठोकले असल्याने कामगार बाहेरूनच नियमित हजेरी बुकात स्वाक्षरी करून परत येत आहे. उल्लेखनीय बाब अशी की एवढी मोठी कारवाई झाल्यानंतरही याबाबत प्रशासन सुस्त असुन कामगारांबाबत कुठलीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही, असे कामगारांचेच म्हणणे आहे.