शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

वीज कंपन्यातील कामे मिळणार बेरोजगार अभियंत्यांना

By admin | Updated: March 31, 2015 01:07 IST

वीज कंपन्यातील देखभाल व दुरुस्तीची कामे लॉटरी पद्धतीने थेट सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंत्यांना देण्याचा

शासनाचा निर्णय : शेकडो बेरोजगारांना मिळणार कामचंद्रपूर : वीज कंपन्यातील देखभाल व दुरुस्तीची कामे लॉटरी पद्धतीने थेट सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंत्यांना देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे शेकडो सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या हाताला काम मिळणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत इमारती, रस्ते तसेच विद्युत विभागाची विविध कामे बेरोजगार अभियंत्यांकडून केली जातात. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी आणि महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी या तिनही कंपन्यातील देखभाल व दुरुस्तीची कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दिली जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाप्रमाणेच विद्युत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचा प्रथम नोंदणीचा वर्ग ‘ब-१’ असा राहील. त्यांना विद्युत कामे वाटपाची एकूण मर्यादा ५० लाखापर्यंतची असून प्रत्येक कामाची कमाल मर्यादा किमान दहा लाख रुपये इतकी राहणार आहे.सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामे वाटप करण्यासाठी महावितरण, महापारेषणचे कार्यालय असल्यास अधीक्षक अभियंता आणि महानिर्मितीशी संबंधित विद्युत निर्मिती केंद्राचे काम असल्यास मुख्य अभियंता हे जिल्हास्तरावरील समितीचे अध्यक्ष राहणार आहेत. या समितीचे सदस्य सचिव संबंधित कार्यालयातील कार्यकारी अभियंता राहणार असून समितीत इतर तीन सदस्यांचा समावेश आहे. राज्य शासनाने यासंबधीत शासन निर्णय २६ मार्चला काढला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने अनेक बेरोजगारर वीज अभियंत्यांना याचा लाभ होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)किमान ५० टक्के कामे मिळणारविभागांतर्गत एकूण पार पाडायच्या वार्षिक कामांपैकी सरासरी किमान ५० टक्के कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दिली जाणार आहेत. तसेच ज्या बेरोजगार अभियंत्यांनी पहिल्या वर्षात मिळालेली दहा लाखांची कामे मुदतीत पूर्ण केली त्यांना दुसऱ्या वर्षी १५ लाख रुपयापर्यंतची वार्षिक पाच कामे अशी एकूण ७५ लाख रुपयांची कामे लॉटरी पद्धतीने देण्यात येणार आहेत.