शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारी भत्त्यापासून वंचित मजुरांची घेतली दखल

By admin | Updated: September 2, 2016 01:05 IST

गोंडपिंपरी शहरातील शेकडो जॉबकार्डधारक मजुरांनी नगरपंचायतीला कामाची मागणी केली होती.

मजुरांना पत्र : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले भत्ता मिळवून देण्याचे आश्वासनगोंडपिंपरी : गोंडपिंपरी शहरातील शेकडो जॉबकार्डधारक मजुरांनी नगरपंचायतीला कामाची मागणी केली होती. मात्र नगरपंचायतीने कामच उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे नगरपंचायतने जॉबकार्डधारक मजुरांना बेरोजगारी भत्ता देणे गरजेचे होते. गेल्या चार महिन्यांचा कालावधी लोटूनही त्यांना बेरोजगारी भत्त्यापासून वंचित ठेवण्यात आले होते. मजुरांची समस्या लक्षात घेत दै. लोकमतने ‘चार महिन्यांपासून मजूर बेरोजगारी भत्त्यापासून वंचित’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकाऱ्यांनी सदर बातमीची दखल घेत मजुरांना जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचे पत्र दिले. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता मजुरांना भत्ता मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.दै. ‘लोकमत’चे ३० जुलै २०१६ रोजी ‘चार महिन्यांपासून मजूर बेरोजगारची भत्त्यापासून वंचित’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली. सदर बातमीची दखल मंत्रालयस्तरावर घेताच नगरपंचायत प्रशासनात खळबळ माजली. अशातच १३ आॅगस्ट २०१६ ला महाराष्ट्र शासन रोहयो प्रभागाचे कार्यासन अधिकारी नितीन पालकर यांनी मनरेगाअंतर्गत जॉबकार्डधारक मजुरांना बेरोजगारी भत्ता मिळण्यासंदर्भात चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र पाठविले. तसेच मजुरांना त्याची माहिती देण्यात आली. त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे पत्रातून कळविले. त्यानुसार, २९ आॅगस्टला भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव गोहणे, साईनाथ मारचे, दामोधर रामगिरवार, दीपक येलमुले यांच्यासह मजुरांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. भेटीदरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी जॉबकार्डधारक मजुरांना बेरोजगारी भत्ता मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आता गोंडपिंपरी शहरातील मजुरांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)जॉबकार्ड दिल्यानंतरही दखल घेतली नव्हतीरोजगार हमी योजनेअंतर्गत गोंडपिंपरी शहरातील मजुरांनी १५ फेब्रुवारी २०१६ रोजी अर्ज करून कामाची मागणी केली होती. मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटूनही जॉबकार्डधारक मजुरांना कामच उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे २४ मे २०१६ रोजी गोंडपिंपरीचे तहसीलदार मल्लिक विरानी यांच्याकडे बेरोजगारी भत्ता मिळण्यासंदर्भात अर्ज केला. परंतु त्यांनीही दुर्लक्ष केल्याने मजूर बेरोजगारी भत्त्यापासून वंचित होते. अधिनियमानुसार, मजुरांनी नगरपंचायतकडे अकुशल कामाची मागणी केल्यानंतर १५ दिवसांच्या आत काम देणे बंधनकारक होते आणि कामच उपलब्ध नसल्यास मजुरांना बेरोजगार भत्ता देणे बंधनकारक आहे. मात्र नगरपंचायतीच्या वेळकाढू धोरणामुळे मजूर बेरोजगारी भत्त्यापासून वंचित होते.