शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

बेरोजगारी भत्त्यापासून वंचित मजुरांची घेतली दखल

By admin | Updated: September 2, 2016 01:05 IST

गोंडपिंपरी शहरातील शेकडो जॉबकार्डधारक मजुरांनी नगरपंचायतीला कामाची मागणी केली होती.

मजुरांना पत्र : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले भत्ता मिळवून देण्याचे आश्वासनगोंडपिंपरी : गोंडपिंपरी शहरातील शेकडो जॉबकार्डधारक मजुरांनी नगरपंचायतीला कामाची मागणी केली होती. मात्र नगरपंचायतीने कामच उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे नगरपंचायतने जॉबकार्डधारक मजुरांना बेरोजगारी भत्ता देणे गरजेचे होते. गेल्या चार महिन्यांचा कालावधी लोटूनही त्यांना बेरोजगारी भत्त्यापासून वंचित ठेवण्यात आले होते. मजुरांची समस्या लक्षात घेत दै. लोकमतने ‘चार महिन्यांपासून मजूर बेरोजगारी भत्त्यापासून वंचित’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकाऱ्यांनी सदर बातमीची दखल घेत मजुरांना जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचे पत्र दिले. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता मजुरांना भत्ता मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.दै. ‘लोकमत’चे ३० जुलै २०१६ रोजी ‘चार महिन्यांपासून मजूर बेरोजगारची भत्त्यापासून वंचित’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली. सदर बातमीची दखल मंत्रालयस्तरावर घेताच नगरपंचायत प्रशासनात खळबळ माजली. अशातच १३ आॅगस्ट २०१६ ला महाराष्ट्र शासन रोहयो प्रभागाचे कार्यासन अधिकारी नितीन पालकर यांनी मनरेगाअंतर्गत जॉबकार्डधारक मजुरांना बेरोजगारी भत्ता मिळण्यासंदर्भात चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र पाठविले. तसेच मजुरांना त्याची माहिती देण्यात आली. त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे पत्रातून कळविले. त्यानुसार, २९ आॅगस्टला भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव गोहणे, साईनाथ मारचे, दामोधर रामगिरवार, दीपक येलमुले यांच्यासह मजुरांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. भेटीदरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी जॉबकार्डधारक मजुरांना बेरोजगारी भत्ता मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आता गोंडपिंपरी शहरातील मजुरांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)जॉबकार्ड दिल्यानंतरही दखल घेतली नव्हतीरोजगार हमी योजनेअंतर्गत गोंडपिंपरी शहरातील मजुरांनी १५ फेब्रुवारी २०१६ रोजी अर्ज करून कामाची मागणी केली होती. मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटूनही जॉबकार्डधारक मजुरांना कामच उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे २४ मे २०१६ रोजी गोंडपिंपरीचे तहसीलदार मल्लिक विरानी यांच्याकडे बेरोजगारी भत्ता मिळण्यासंदर्भात अर्ज केला. परंतु त्यांनीही दुर्लक्ष केल्याने मजूर बेरोजगारी भत्त्यापासून वंचित होते. अधिनियमानुसार, मजुरांनी नगरपंचायतकडे अकुशल कामाची मागणी केल्यानंतर १५ दिवसांच्या आत काम देणे बंधनकारक होते आणि कामच उपलब्ध नसल्यास मजुरांना बेरोजगार भत्ता देणे बंधनकारक आहे. मात्र नगरपंचायतीच्या वेळकाढू धोरणामुळे मजूर बेरोजगारी भत्त्यापासून वंचित होते.