शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

देशावर मनुच्या समर्थकांचे असंवैधानिक राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:20 IST

चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य महान आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा आपल्याला घ्यायची आहे. परंतु, त्यांनी दिलेल्या संविधानाप्रमाणेच देश ...

चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य महान आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा आपल्याला घ्यायची आहे. परंतु, त्यांनी दिलेल्या संविधानाप्रमाणेच देश चालत आहे की, नाही हे सजग डोळयाने बघणे गरजेचे आहे. आजही मनुच्या समर्थकांचे राज्य असंवैधानिक पद्धतीने देशावर सुरु आहे. अद्यापही मनुस्मृती जिवंत असून संस्कार आणि परंपरेच्या गोंडस नावाखाली स्त्रियांना गुलामीत ठेवण्यात येत असल्याचे प्रतिपादन जिजाऊ सावित्री रमाई विचारमंचच्या संस्थापिका, बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिलाषा बेहेरे गावतुरे यांनी केले.

मनुस्मृतीचे दिनाचे औचित्य साधून जिजाऊ सावित्री रमाई विचारमंच, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ नगीनाबाग, संत जगनाडे महाराज पंचतेली मंडळ, भुमिपुत्र ब्रिगेड, मुक्ता युवा वाहिनीच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. तसेच संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मंडळाच्या उपाध्यक्ष छाया सोनुले, संत जगनाडे महाराज पंचतेली मंडळाच्या चंदा वैरागडे, भुमिपुत्र ब्रिगेडच्या माया कोसे, रूपेश चहांदे, सुरज मत्ते, मुक्ता युवा वाहिनीच्या श्वेता पेटकुले, निधी निकोडे, अक्षय किन्नाके, जनाधार मंचच्या प्रियंका चव्हाण, अरविंद दुधे, विपिन रामटेके, अतुल बांभोरे, राजस खोब्रागडे, अस्मिता सोनटक्के, माधवी डोंगरे आदी उपस्थित होते. डॉ. अभिलाषा गावतुरे पुढे म्हणाल्या, देशातील मनुव्यवस्था मुठभर लोकांच्या कल्याणासाठी कार्य करते. त्यामुळे शेतकरी, कामगार, दलित व महिलांवर अन्याय वाढला आहे. भारतीय संविधानाने प्रत्येकाला समानता बहाल केली आहे. त्याच्या मौलिक अधिकाराच्या रक्षणासाठी जिजाऊ, फुलेश शाहु व बाबासाहेबांच्या अनुयायांना काम करायचे असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी अनेकांची उपस्थिती होती.