शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

वीज केंद्रातील अनधिकृत संरक्षक भिंत पाडा

By admin | Updated: December 16, 2014 22:51 IST

चंद्रपूर येथे महाऔष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती होण्याच्या अनुषंगाने या मार्गावरील दुर्गापूर येथील ९६.५७, ऊर्जानगर १५.७२ कोंडी (माल) २००.५८, कोंडी चक १८१.९९, नेरी १०५.४२ तसेच रानवेंडली

निवेदन सादर : राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची मागणीचंद्रपूर : चंद्रपूर येथे महाऔष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती होण्याच्या अनुषंगाने या मार्गावरील दुर्गापूर येथील ९६.५७, ऊर्जानगर १५.७२ कोंडी (माल) २००.५८, कोंडी चक १८१.९९, नेरी १०५.४२ तसेच रानवेंडली येथील २००.२५ हेक्टर जमीन प्रकल्पाकरिता घेण्यात आली होती. तसेच राज्य महामार्ग २६१ ला शेवटची सीमा ग्राह्य धारुन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. परंतु आज या सर्व प्रक्रियेला ३० वर्षाहून अधिकचा काळ लोटला आहे. मधल्या काळात शासनाने अनेक कायदे व धोरणात बदल केले आहे. येथील वीज केंद्राची अनाधिकृत संरक्षक भिंत ताबडतोब पाडण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंताना दिले.महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रालयामार्फत मुंबई महामार्ग अधिनियम १९५५, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६९ प्रमाणे नियंत्रण रेषेसंदर्भात ९ मार्च २००१ ला एक धोरण आखण्यात आले. राज्य महामार्ग व प्रमुख राज्य महामार्ग यांच्या धोरणाप्रमाणे नागरी व औद्योगिक परिसर असल्यास रस्त्याच्या मध्यभागापासून २० मीटर तसेच अनागरी भाग असल्यास रस्त्याच्या मध्यभागापासून किमान ४० मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करता येत नाही. परंतु चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामार्फत बांधण्यात आलेली संरक्षक भिंत ही राज्य महामार्ग क्रं. २६१ या रस्त्याच्या मध्यभागातून सरासरी १० मीटर अंतरावर रस्त्यावर येत असून अनाधिकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ऊर्जानगर ग्रामपंचायतीनेसुद्धा अनाधिकृत संरक्षक भिंत पाडण्याचा सर्वानुमते ठराव घेतला. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने शासनाच्या धोरणानुसार नव्याने सरक्षक भिंतीचे बांधकाम केल्यास या परिसरात बाजारपेठेकरिता मुख्य मार्गावर मोठ्याप्रमाणात जागा उपलब्ध होईल व त्यामुळे गावातील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण तसेच गरीब कुटुंबांना उदररनिर्वाह करण्याच्या अनुषंगाने किरकोळ व्यवसाय करता येणार आहे. म्हणून सामान्य व गरीब नागरिकांच्या अनधिकृत बांधकामावर करण्यात येणाऱ्या कारवाई प्रमाणेच चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या या अनधिकृत संरक्षक भिंत तातडीने पाडण्याची कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, रायुकॉं शहर जिल्हाध्यक्ष गजानन पाल, जिल्हा उपाध्यक्ष अमोल ठाकरे, प्रदीप रत्नपारखी, राविकॉं शहर जिल्हाध्यक्ष सुजीत उपरे, संजय ठाकूर, नितीन रत्नपारखी, पवन मेश्राम, शैलेंद्र बेलसरे, नितीन घुबडे, रोशन शेख, आदींनी केली. (प्रतिनिधी)