शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

वीज केंद्रातील अनधिकृत संरक्षक भिंत पाडा

By admin | Updated: December 16, 2014 22:51 IST

चंद्रपूर येथे महाऔष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती होण्याच्या अनुषंगाने या मार्गावरील दुर्गापूर येथील ९६.५७, ऊर्जानगर १५.७२ कोंडी (माल) २००.५८, कोंडी चक १८१.९९, नेरी १०५.४२ तसेच रानवेंडली

निवेदन सादर : राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची मागणीचंद्रपूर : चंद्रपूर येथे महाऔष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती होण्याच्या अनुषंगाने या मार्गावरील दुर्गापूर येथील ९६.५७, ऊर्जानगर १५.७२ कोंडी (माल) २००.५८, कोंडी चक १८१.९९, नेरी १०५.४२ तसेच रानवेंडली येथील २००.२५ हेक्टर जमीन प्रकल्पाकरिता घेण्यात आली होती. तसेच राज्य महामार्ग २६१ ला शेवटची सीमा ग्राह्य धारुन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. परंतु आज या सर्व प्रक्रियेला ३० वर्षाहून अधिकचा काळ लोटला आहे. मधल्या काळात शासनाने अनेक कायदे व धोरणात बदल केले आहे. येथील वीज केंद्राची अनाधिकृत संरक्षक भिंत ताबडतोब पाडण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंताना दिले.महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रालयामार्फत मुंबई महामार्ग अधिनियम १९५५, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६९ प्रमाणे नियंत्रण रेषेसंदर्भात ९ मार्च २००१ ला एक धोरण आखण्यात आले. राज्य महामार्ग व प्रमुख राज्य महामार्ग यांच्या धोरणाप्रमाणे नागरी व औद्योगिक परिसर असल्यास रस्त्याच्या मध्यभागापासून २० मीटर तसेच अनागरी भाग असल्यास रस्त्याच्या मध्यभागापासून किमान ४० मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करता येत नाही. परंतु चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामार्फत बांधण्यात आलेली संरक्षक भिंत ही राज्य महामार्ग क्रं. २६१ या रस्त्याच्या मध्यभागातून सरासरी १० मीटर अंतरावर रस्त्यावर येत असून अनाधिकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ऊर्जानगर ग्रामपंचायतीनेसुद्धा अनाधिकृत संरक्षक भिंत पाडण्याचा सर्वानुमते ठराव घेतला. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने शासनाच्या धोरणानुसार नव्याने सरक्षक भिंतीचे बांधकाम केल्यास या परिसरात बाजारपेठेकरिता मुख्य मार्गावर मोठ्याप्रमाणात जागा उपलब्ध होईल व त्यामुळे गावातील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण तसेच गरीब कुटुंबांना उदररनिर्वाह करण्याच्या अनुषंगाने किरकोळ व्यवसाय करता येणार आहे. म्हणून सामान्य व गरीब नागरिकांच्या अनधिकृत बांधकामावर करण्यात येणाऱ्या कारवाई प्रमाणेच चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या या अनधिकृत संरक्षक भिंत तातडीने पाडण्याची कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, रायुकॉं शहर जिल्हाध्यक्ष गजानन पाल, जिल्हा उपाध्यक्ष अमोल ठाकरे, प्रदीप रत्नपारखी, राविकॉं शहर जिल्हाध्यक्ष सुजीत उपरे, संजय ठाकूर, नितीन रत्नपारखी, पवन मेश्राम, शैलेंद्र बेलसरे, नितीन घुबडे, रोशन शेख, आदींनी केली. (प्रतिनिधी)