शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

वीज वाहिनी वस्तीतून नेण्यामागे अल्ट्राटेकचे कारस्थान

By admin | Updated: June 7, 2014 23:51 IST

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्यावतीने २२0 केव्ही वीज वाहिनीच्या टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. मात्र ही वाहिनी चक्क नांदा फाटा येथील वार्ड क्रमांक पाचमधून नेली जाणार आहे. यामागे अल्ट्राटेक कंपनीचे

चंद्रपूर : अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्यावतीने २२0 केव्ही वीज वाहिनीच्या टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. मात्र ही वाहिनी चक्क नांदा   फाटा येथील वार्ड क्रमांक पाचमधून नेली जाणार आहे. यामागे अल्ट्राटेक कंपनीचे कारस्थान असून निव्वळ खर्च वाचविण्यासाठी हा खटाटोप आहे, असा आरोप आज शनिवारी नांदा येथील नागरिकांनी पत्रकार परिषदेतून केला. नांदा फाटा परिसरात सध्या २२0 केव्ही टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. ही वाहिनी थेट वार्ड क्रमांक पाचमधून चालली आहे. या वाहिनीमुळे आपल्या वस्तीतील नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचे मत येथील नागरिकांचे आहे. या संदर्भात माहिती देताना प्रणबकुमार शहा म्हणाले, ही वाहिनी ज्या परिसरातून जाणार आहे, त्याखाली १५0 घरे आहे. नियमानुसार, मानवी वस्तीमधून उच्चदाब क्षमतेची वीज  वाहिनी नेता येत नाही. तसेच त्यासाठी वस्तीत मनोरेही उभारले जाऊ शकत नाहीत. तरीही मनोर्‍यांसाठी सपन बाला आणि किशोरसिंग राठोड यांच्या अंगणात खड्डे उभारण्यात आले आहेत. २२0 केव्ही वाहिनी या नागरिकांच्या घरावरुन गेल्यास त्याखाली वास्तव्य करणे जोखमीचे आहे. त्यामुळे वस्तीतून वाहिनी नेण्याला आपला विरोध आहे. या संदर्भात ५ जूनला जिल्हाधिकार्‍यांना भेटून निवेदन दिले असता, त्यांनी तात्पुरते काम थांबविण्याचे आणि उपविभागीय अधिकार्‍यांकडून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महापारेषणचे अभियंता गाडगे यांनाही त्याच दिवशी भेटून नागरिकांनी निवेदन दिले. त्यांनीही काम थांबविण्याचे आणि सर्व्हेअरकडून चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, टॉवरमुळे नागरिकांच्या जीवाला कसलाही धोका नसल्याचे सर्व्हेअरकडून  सांगितले जात आहे. अल्ट्राटेक कंपनी मनोर्‍यांच्या उभारणीचा खर्च वाचविण्यासाठी आपल्या जीवाशी खेळत असल्याचा आरोपही यावेळी पत्रकार परिषदेतून करण्यात आला. ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र नसतानाही हे काम सुरू आहे. येथील सरपंच व उपसरपंच टॉवर उभारणीसाठी नागरिकांना विनंती करत आहेत. एवढेच नाही तर, यासाठी विरोध करणार्‍यांना कंपनीतील कामावरून काढले जात आहे. यावरून अल्ट्राटेक कंपनी दबावतंत्राचे धोरण आखत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. या विरोधात आपण गावकर्‍यांसह आंदोलन उभारू, प्रसंगी आत्मदहनसुद्धा करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला पल्लव शहा, मिलन गोयल, प्रदीप हलधर, गोविंद राऊत, अनिल प्रसाद, अनिता गोयल, सुमन यादव, रंजीता सिंग आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)