शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

कॅशलेस होण्याआधीच उहापोह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2017 00:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आर्थिक व्यवहार कॅशलेस होत असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रकाशित होत आहेत.

पिरली गावातील वास्तव : रोखद्वारेच होताच व्यवहार विनायक येसेकर भद्रावतीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आर्थिक व्यवहार कॅशलेस होत असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रकाशित होत आहेत. अशीच एक या तालुक्यातील पिरली गावाची बातमी प्रकाशित झाली. यासंदर्भात प्रत्यक्ष गाव भेट घेऊन तेथील ग्रामस्थांशी व व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता, येथे आजही रोख रकमेद्वारे बहुतेक व्यवहार होत असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्ह्यातील पिरली हे एकमेव गाव कॅशलेस झाल्याची बातमी काही वृत्तपत्रात प्रकाशित झाली. या बातमीने कुतूहल जागृत होवून गावास प्रत्यक्ष भेट दिली. काही दिवसांपूर्वी एका राष्ट्रीयीकृत शाखा भद्रावतीच्या माध्यमातून या गावात शिबिर घेण्यात आला. त्या ठिकाणी मतदार यादीनुसार प्रत्येक कुटूंबाच्या कुटूंब प्रमुखाचे खाते काढण्यात आले. त्या सर्वांना डेबीट कार्ड देण्यात आले आणि गावातील चार व्यवसायीकांना स्वाईप मशीन देण्यात आल्या. याद्वारे पुढील आर्थिक व्यवहार या डेबीट कार्डद्वारे करावा, असे आवाहन शाखा प्रबंधक राजसिंह बिसेन यांनी केले. एक हजार लोकवस्ती असलेल्या या गावात १६० ग्रामस्थांची खाते उघडण्यात आली. तसेच चार दुकानदारांना स्वाईप मशीन देण्यात आली. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर काही वृत्तपत्रात संपूर्ण गाव कॅशलेस झाल्याचे वृत्त देवून आश्चर्यचकित केले. याबाबत बँकेचे शाखा व्यवस्थापक राजसिंह बिसेन यांना विचारना केली असता, आम्ही कार्यक्रमाद्वारे जनजागृती करून साहित्य पुरविले आहे. तसेच मार्च २०१७ नंतर कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाठविले जाईल. गाव कॅशलेस झालेला नाही. परंतु, आम्ही त्यादृष्टीने प्रयत्नरत राहू. तालुक्यातील टाकळी व चिचोर्डी हे दोन गाव कॅशलेससाठी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)कॅशलेस व्यवहार चांगले मात्र मार्गदर्शन आवश्यककॅशलेस व्यवहार हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. शेतकरी हा वेगवेगळ्या गोष्टींच्या खेरदीकरिता कॅश घेवून शहरात जात असतो. रक्कम चोरी होण्याची भीती असते. या व्यवहाराने सुरक्षित आणि चिंतामुक्त राहू शकते. मात्र यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. आजच्या घडीला पिरली गाव कॅशलेस झाले नाही, असे मत पिरली गावातील प्रगतशिल शेतकरी नंदू वाढई यांच्यासह प्रवीण बोधाने, सामाजिक कार्यकर्ते महेश डाखरे यांनी व्यक्त केले.वृत्तपत्रात आलेली बातमी ही दिशाभूल करणारी आहे. आमच्या गावात बँक आॅफ इंडियातर्फे डिजीटल इंडियाच्या माध्यमातून शिबिर घेण्यात आले. या ठिकाणी ग्रामस्थांना डेबीट कार्ड तर व्यवसायिकांना स्वाईप मशीन देण्यात आली. परंतु, याचा वापर एक-अर्धा ग्राहक वगळता कुणीच करीत नाही.- महादेव कोल्हे,सामाजिक कार्यकर्ते पिरलीमाझ्या दुकानात बँक आॅफ इंडियाने स्वाईप मशिन लावून दिली आहे. परंतु सुरुवातीला एक-दोन ग्राहकांनी डेबीट कार्डचा वापर करून व्यवहार केला. संपूर्ण व्यवहार कॅशलेस व्हायला वेळ लागेल. या गावातील ग्रामस्थ या व्यवहाराबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळे कॅशलेस व्यवहार पूर्णत: होण्यास बराच वेळ लागेल.- निलेश मोदी,व्यवसायिक पिरलीसंपूर्ण कॅशलेस व्यवहारासाठी व्यवस्था उपलब्ध करून देणे म्हणजे संपूर्ण गाव कॅशलेस झाला असे होत नाही. याकरिता प्रशिक्षणाची गरज आहे. जोपर्यंत प्रशिक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावातील आर्थिक व्यवहार कॅशलेस होणार नाही. कॅशलेस हे दिवसास्वप्नच ठरेल.- अर्चना डाखरे गृहिणी तथाग्रामपंचायत सदस्य पिरली.