शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कॅशलेस होण्याआधीच उहापोह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2017 00:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आर्थिक व्यवहार कॅशलेस होत असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रकाशित होत आहेत.

पिरली गावातील वास्तव : रोखद्वारेच होताच व्यवहार विनायक येसेकर भद्रावतीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आर्थिक व्यवहार कॅशलेस होत असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रकाशित होत आहेत. अशीच एक या तालुक्यातील पिरली गावाची बातमी प्रकाशित झाली. यासंदर्भात प्रत्यक्ष गाव भेट घेऊन तेथील ग्रामस्थांशी व व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता, येथे आजही रोख रकमेद्वारे बहुतेक व्यवहार होत असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्ह्यातील पिरली हे एकमेव गाव कॅशलेस झाल्याची बातमी काही वृत्तपत्रात प्रकाशित झाली. या बातमीने कुतूहल जागृत होवून गावास प्रत्यक्ष भेट दिली. काही दिवसांपूर्वी एका राष्ट्रीयीकृत शाखा भद्रावतीच्या माध्यमातून या गावात शिबिर घेण्यात आला. त्या ठिकाणी मतदार यादीनुसार प्रत्येक कुटूंबाच्या कुटूंब प्रमुखाचे खाते काढण्यात आले. त्या सर्वांना डेबीट कार्ड देण्यात आले आणि गावातील चार व्यवसायीकांना स्वाईप मशीन देण्यात आल्या. याद्वारे पुढील आर्थिक व्यवहार या डेबीट कार्डद्वारे करावा, असे आवाहन शाखा प्रबंधक राजसिंह बिसेन यांनी केले. एक हजार लोकवस्ती असलेल्या या गावात १६० ग्रामस्थांची खाते उघडण्यात आली. तसेच चार दुकानदारांना स्वाईप मशीन देण्यात आली. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर काही वृत्तपत्रात संपूर्ण गाव कॅशलेस झाल्याचे वृत्त देवून आश्चर्यचकित केले. याबाबत बँकेचे शाखा व्यवस्थापक राजसिंह बिसेन यांना विचारना केली असता, आम्ही कार्यक्रमाद्वारे जनजागृती करून साहित्य पुरविले आहे. तसेच मार्च २०१७ नंतर कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाठविले जाईल. गाव कॅशलेस झालेला नाही. परंतु, आम्ही त्यादृष्टीने प्रयत्नरत राहू. तालुक्यातील टाकळी व चिचोर्डी हे दोन गाव कॅशलेससाठी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)कॅशलेस व्यवहार चांगले मात्र मार्गदर्शन आवश्यककॅशलेस व्यवहार हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. शेतकरी हा वेगवेगळ्या गोष्टींच्या खेरदीकरिता कॅश घेवून शहरात जात असतो. रक्कम चोरी होण्याची भीती असते. या व्यवहाराने सुरक्षित आणि चिंतामुक्त राहू शकते. मात्र यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. आजच्या घडीला पिरली गाव कॅशलेस झाले नाही, असे मत पिरली गावातील प्रगतशिल शेतकरी नंदू वाढई यांच्यासह प्रवीण बोधाने, सामाजिक कार्यकर्ते महेश डाखरे यांनी व्यक्त केले.वृत्तपत्रात आलेली बातमी ही दिशाभूल करणारी आहे. आमच्या गावात बँक आॅफ इंडियातर्फे डिजीटल इंडियाच्या माध्यमातून शिबिर घेण्यात आले. या ठिकाणी ग्रामस्थांना डेबीट कार्ड तर व्यवसायिकांना स्वाईप मशीन देण्यात आली. परंतु, याचा वापर एक-अर्धा ग्राहक वगळता कुणीच करीत नाही.- महादेव कोल्हे,सामाजिक कार्यकर्ते पिरलीमाझ्या दुकानात बँक आॅफ इंडियाने स्वाईप मशिन लावून दिली आहे. परंतु सुरुवातीला एक-दोन ग्राहकांनी डेबीट कार्डचा वापर करून व्यवहार केला. संपूर्ण व्यवहार कॅशलेस व्हायला वेळ लागेल. या गावातील ग्रामस्थ या व्यवहाराबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळे कॅशलेस व्यवहार पूर्णत: होण्यास बराच वेळ लागेल.- निलेश मोदी,व्यवसायिक पिरलीसंपूर्ण कॅशलेस व्यवहारासाठी व्यवस्था उपलब्ध करून देणे म्हणजे संपूर्ण गाव कॅशलेस झाला असे होत नाही. याकरिता प्रशिक्षणाची गरज आहे. जोपर्यंत प्रशिक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावातील आर्थिक व्यवहार कॅशलेस होणार नाही. कॅशलेस हे दिवसास्वप्नच ठरेल.- अर्चना डाखरे गृहिणी तथाग्रामपंचायत सदस्य पिरली.