शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

कुंपणाने शेत खाल्ल्याचा प्रकार

By admin | Updated: November 15, 2016 00:45 IST

राज्याचे वनमंत्री जंगलामध्ये वाढ करण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर देत असले तरी, प्रत्यक्षात त्या जागेवर लागवड केलेली रोपेच नसल्याची बाब उघड झाली आहे.

रोपेच गायब : रोप लागवडीवर २० लाख रुपयांचा खर्च राजू गेडाम मूलराज्याचे वनमंत्री जंगलामध्ये वाढ करण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर देत असले तरी, प्रत्यक्षात त्या जागेवर लागवड केलेली रोपेच नसल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे वन विभागाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड कार्यक्रमाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मूल तालुक्यातील दहेगाव येथील कक्ष क्र. ५१७ मधील २५ हेक्टर क्षेत्रावर बांबूचे रोपवन लावण्यात आले होते. त्याकरिता पाच वर्षांमध्ये २० लाख रुपये खर्च करण्यात आले. प्रत्यक्षात तेथे लावलेली रोपेच नसल्याने कुंपणानेच शेत खाल्ले की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. वनाचे क्षेत्र वाढावे जेणे करून जमिनीची धूप थांबविता येईल, या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाअंतर्गत वृक्ष लागवड व संगोपणावर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र या उद्देशाला हरताळ फासण्यात येत आहे. २०११ मध्ये चिचपल्ली वनपरिक्षेत्राअंतर्गत मूल परिक्षेत्रातील दहेगाव येथील कक्ष क्र. ५१७ मधील २५ हेक्टर जागेवर बांबू रोपवन करण्यात. रोपवनाची संरक्षण व देखभाल करण्याची जबाबदारी वन विभागाची असताना मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यावर्षी वनाची लागवड व संगोपण करण्यासाठी राज्याचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्षलागवडीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून हजारो हेक्टर जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. त्यांनी वन विभागाला लाखो रुपयांचा निधी वितरित करून वृक्ष लागवड करण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे. मात्र दहेगाव या क्षेत्रात असलेल्या प्रकारासारखा इतरही वनक्षेत्रात असलाच प्रकार आहे की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील दोन वर्षांपूर्वी याच प्रकारचे प्रकरण उघडकीस आले होते. मात्र अधिकाऱ्यांची लॉबी मंत्र्यापर्यंत असल्याने भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठिशी घेतले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वन विभागाचे अधिकारी यात गुंतले असल्याने दहेगाव प्रकाराबाबत वाच्यता केली जात नाही. कुंपणच शेत खायला लागल्याने ते रोपे गायब होणारच, अशी सर्वत्र चर्चा केली जात आहे.विभागीय वनाधिकाऱ्यांना आढळलेले नैसर्गिक बांबूदहेगाव येथे व्यवस्थापन समितीच्या वतीने २५ हेक्टरवर बाबू रोपवनाची लागवड करण्यात आली. त्यावर २०११ ते २०१६ पर्यंत २० लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर नैसर्गिक वाढलेले काही बांबू आढळले. २०११ मध्ये रोपवन लावल्यानंतर चंद्रपूर येथील मूल्यांकन खात्याचे विभागीय वनाधिकारी आर.एच. पांडव, वनक्षेत्र सर्वेक्षक के. एम. जिडगीलवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन रोपांचे मूल्यांकन केले. त्यावेळी त्यांना कक्ष क्र. ५१७ मधील रोपवनात नैसर्गिकरित्या भेरा, येन, बाबू, गराडी, धावळा, साग, रोहन, तेंदू, कडू लिंब आदी प्रजातीतील झाडे आढळून आली. कक्ष क्र. ५१७ मधील नैसर्गिकरित्या वाढलेले बांबू व इतर मिश्र रोपे दिसत असल्याने लागवडीचे बांबू कुठे गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.