शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

कुंपणाने शेत खाल्ल्याचा प्रकार

By admin | Updated: November 15, 2016 00:45 IST

राज्याचे वनमंत्री जंगलामध्ये वाढ करण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर देत असले तरी, प्रत्यक्षात त्या जागेवर लागवड केलेली रोपेच नसल्याची बाब उघड झाली आहे.

रोपेच गायब : रोप लागवडीवर २० लाख रुपयांचा खर्च राजू गेडाम मूलराज्याचे वनमंत्री जंगलामध्ये वाढ करण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर देत असले तरी, प्रत्यक्षात त्या जागेवर लागवड केलेली रोपेच नसल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे वन विभागाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड कार्यक्रमाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मूल तालुक्यातील दहेगाव येथील कक्ष क्र. ५१७ मधील २५ हेक्टर क्षेत्रावर बांबूचे रोपवन लावण्यात आले होते. त्याकरिता पाच वर्षांमध्ये २० लाख रुपये खर्च करण्यात आले. प्रत्यक्षात तेथे लावलेली रोपेच नसल्याने कुंपणानेच शेत खाल्ले की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. वनाचे क्षेत्र वाढावे जेणे करून जमिनीची धूप थांबविता येईल, या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाअंतर्गत वृक्ष लागवड व संगोपणावर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र या उद्देशाला हरताळ फासण्यात येत आहे. २०११ मध्ये चिचपल्ली वनपरिक्षेत्राअंतर्गत मूल परिक्षेत्रातील दहेगाव येथील कक्ष क्र. ५१७ मधील २५ हेक्टर जागेवर बांबू रोपवन करण्यात. रोपवनाची संरक्षण व देखभाल करण्याची जबाबदारी वन विभागाची असताना मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यावर्षी वनाची लागवड व संगोपण करण्यासाठी राज्याचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्षलागवडीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून हजारो हेक्टर जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. त्यांनी वन विभागाला लाखो रुपयांचा निधी वितरित करून वृक्ष लागवड करण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे. मात्र दहेगाव या क्षेत्रात असलेल्या प्रकारासारखा इतरही वनक्षेत्रात असलाच प्रकार आहे की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील दोन वर्षांपूर्वी याच प्रकारचे प्रकरण उघडकीस आले होते. मात्र अधिकाऱ्यांची लॉबी मंत्र्यापर्यंत असल्याने भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठिशी घेतले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वन विभागाचे अधिकारी यात गुंतले असल्याने दहेगाव प्रकाराबाबत वाच्यता केली जात नाही. कुंपणच शेत खायला लागल्याने ते रोपे गायब होणारच, अशी सर्वत्र चर्चा केली जात आहे.विभागीय वनाधिकाऱ्यांना आढळलेले नैसर्गिक बांबूदहेगाव येथे व्यवस्थापन समितीच्या वतीने २५ हेक्टरवर बाबू रोपवनाची लागवड करण्यात आली. त्यावर २०११ ते २०१६ पर्यंत २० लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर नैसर्गिक वाढलेले काही बांबू आढळले. २०११ मध्ये रोपवन लावल्यानंतर चंद्रपूर येथील मूल्यांकन खात्याचे विभागीय वनाधिकारी आर.एच. पांडव, वनक्षेत्र सर्वेक्षक के. एम. जिडगीलवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन रोपांचे मूल्यांकन केले. त्यावेळी त्यांना कक्ष क्र. ५१७ मधील रोपवनात नैसर्गिकरित्या भेरा, येन, बाबू, गराडी, धावळा, साग, रोहन, तेंदू, कडू लिंब आदी प्रजातीतील झाडे आढळून आली. कक्ष क्र. ५१७ मधील नैसर्गिकरित्या वाढलेले बांबू व इतर मिश्र रोपे दिसत असल्याने लागवडीचे बांबू कुठे गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.