शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कुंपणाने शेत खाल्ल्याचा प्रकार

By admin | Updated: November 15, 2016 00:45 IST

राज्याचे वनमंत्री जंगलामध्ये वाढ करण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर देत असले तरी, प्रत्यक्षात त्या जागेवर लागवड केलेली रोपेच नसल्याची बाब उघड झाली आहे.

रोपेच गायब : रोप लागवडीवर २० लाख रुपयांचा खर्च राजू गेडाम मूलराज्याचे वनमंत्री जंगलामध्ये वाढ करण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर देत असले तरी, प्रत्यक्षात त्या जागेवर लागवड केलेली रोपेच नसल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे वन विभागाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड कार्यक्रमाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मूल तालुक्यातील दहेगाव येथील कक्ष क्र. ५१७ मधील २५ हेक्टर क्षेत्रावर बांबूचे रोपवन लावण्यात आले होते. त्याकरिता पाच वर्षांमध्ये २० लाख रुपये खर्च करण्यात आले. प्रत्यक्षात तेथे लावलेली रोपेच नसल्याने कुंपणानेच शेत खाल्ले की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. वनाचे क्षेत्र वाढावे जेणे करून जमिनीची धूप थांबविता येईल, या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाअंतर्गत वृक्ष लागवड व संगोपणावर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र या उद्देशाला हरताळ फासण्यात येत आहे. २०११ मध्ये चिचपल्ली वनपरिक्षेत्राअंतर्गत मूल परिक्षेत्रातील दहेगाव येथील कक्ष क्र. ५१७ मधील २५ हेक्टर जागेवर बांबू रोपवन करण्यात. रोपवनाची संरक्षण व देखभाल करण्याची जबाबदारी वन विभागाची असताना मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यावर्षी वनाची लागवड व संगोपण करण्यासाठी राज्याचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्षलागवडीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून हजारो हेक्टर जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. त्यांनी वन विभागाला लाखो रुपयांचा निधी वितरित करून वृक्ष लागवड करण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे. मात्र दहेगाव या क्षेत्रात असलेल्या प्रकारासारखा इतरही वनक्षेत्रात असलाच प्रकार आहे की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील दोन वर्षांपूर्वी याच प्रकारचे प्रकरण उघडकीस आले होते. मात्र अधिकाऱ्यांची लॉबी मंत्र्यापर्यंत असल्याने भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठिशी घेतले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वन विभागाचे अधिकारी यात गुंतले असल्याने दहेगाव प्रकाराबाबत वाच्यता केली जात नाही. कुंपणच शेत खायला लागल्याने ते रोपे गायब होणारच, अशी सर्वत्र चर्चा केली जात आहे.विभागीय वनाधिकाऱ्यांना आढळलेले नैसर्गिक बांबूदहेगाव येथे व्यवस्थापन समितीच्या वतीने २५ हेक्टरवर बाबू रोपवनाची लागवड करण्यात आली. त्यावर २०११ ते २०१६ पर्यंत २० लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर नैसर्गिक वाढलेले काही बांबू आढळले. २०११ मध्ये रोपवन लावल्यानंतर चंद्रपूर येथील मूल्यांकन खात्याचे विभागीय वनाधिकारी आर.एच. पांडव, वनक्षेत्र सर्वेक्षक के. एम. जिडगीलवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन रोपांचे मूल्यांकन केले. त्यावेळी त्यांना कक्ष क्र. ५१७ मधील रोपवनात नैसर्गिकरित्या भेरा, येन, बाबू, गराडी, धावळा, साग, रोहन, तेंदू, कडू लिंब आदी प्रजातीतील झाडे आढळून आली. कक्ष क्र. ५१७ मधील नैसर्गिकरित्या वाढलेले बांबू व इतर मिश्र रोपे दिसत असल्याने लागवडीचे बांबू कुठे गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.