शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारची दोन वर्षे राष्ट्र विकासाला समर्पित

By admin | Updated: June 20, 2016 00:36 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने आपल्या दोन वर्षाच्या कारकिर्दीचा हिशेब देशातील लोकांना दिला.

हंसराज अहीर यांचे प्रतिपादन : भद्रावती येथे द्विवर्षपूर्ती विकासपर्व कार्यक्रमाचे आयोजनचंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने आपल्या दोन वर्षाच्या कारकिर्दीचा हिशेब देशातील लोकांना दिला. लोकशाहीत अशाच प्रकारची संवेदनशीलता अभिप्रेत आहे. भाजपप्रणित सरकारने हे कर्तव्य पार पाडले, हाच खरा आदर्श आहे. प्रत्येक नागरिकांना त्यांच्या घटनादत्त अधिकारापासून वंचित होता कामा नये, हा दृष्टिकोन ठेवून मोदी सरकारने सर्व घटकातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. यात शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण, शहरी लोक, बेरोजगार, महिला, माजी सैनिक आदींचा समावेश आहे अशा सर्वांना सामावून घेणारे कार्य केंद्र सरकारच्या माध्यमातून अवघ्या दोन वर्षात पार पडले. देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.वरोरा विधानसभा क्षेत्रांतर्गत भद्रावती येथे शुक्रवारला पार पडलेल्या द्विवर्षपूर्ती कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमास वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार नाना श्यामकुळे, माजी पालकमंत्री संजय देवतळे, ज्येष्ठ नेते बळवंत गुंडावार, जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, वरोरा विधानसभा प्रमुख विजय राऊत, ज्येष्ठ नेते खुशाल बेंडे, जि.प. सदय विजय वानखेडे, देवराव भोंगळे, सुरेश महाजन, अशोक हजारे, डॉ. भगवान गायकवाड, बाबा भागडे, तुळशीराम श्रीरामे, ओम मांडवकर, राहुल सराफ, नरेंद्र जीवतोडे, सुरेश महाजन, रवींद्र नागपुरे, शेखर चौधरी, किशोर गोवारदिपे, विजय मोकासे, प्रवीण सातपुते, विकास खटी, प्रशांत डाखरे, गोपाल गोस्वाडे आदींचीे उपस्थिती होती.ना. हंसराज अहीर पुढे म्हणाले, पंतप्रधानांनी अत्यंत व्यापक दृष्टिकोन ठेवून अटल निवृत्ती वेतन, जनधन योजना, गॅस सबसीडी, सर्व समावेशक पीक विमा योजना, दिनदयाल ग्रामज्योती योजना, कृषी सिंचन योजना, स्वयं रोजगारासाठी मुद्रा बँक योजना व अनेक लोक कल्याणकार योजना देऊन देशाच्या विकासाला गतीशिलता दिली. स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व स्वयं रोजगाराला प्रोत्साहन, रासायनिक खतावर सबसीडी देवून वाढत्या भ्रष्टाचारावर अंकुश घातला, असे सांगत काँग्रेसच्या राजवटीत रस्त्याची कामे ३.५ कि.मी. व्हायची, गडकरींच्या मंत्रालयााने हिच कामे प्रतिदिन १८ कि.मी. करुन चमत्कार घडविला. संपुआच्या काळात देशात ६ वॉटर वे होते, आज मोदी सरकारने १०६ वॉटरवेला मंजुरी दिली. यामुळे भविष्यात जल वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढेल असेही ते म्हणाले.याप्रसंगी चंदनसिंह चंदेल, आमदार नाना शामकुळे, हरीश शर्मा, संजय देवतळे आदींनी केंद्र व राज्य सरकारच्या लोक हितकारी योजनांचा आपल्या भाषणातून परामर्श घेतला. मोदीजींच्या सरकारने अवघ्या दोन वर्षात विकासाचा जो टप्पा गाठला, ते कार्य सरकारच्या लोकहिताच्या धोरणांवर टीका करणाऱ्यांना कधीही साध्य झाले नाही, असेही या वक्त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल सराफ यांनी केले तर संचालन किशोर गोवारदिपे यांनी केले. या कार्यक्रमाला स्थानिक भाजपा पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, भाजपा कार्यकर्ते यांच्यासह परिसरातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)