शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मोदी सरकारची दोन वर्षे राष्ट्र विकासाला समर्पित

By admin | Updated: June 20, 2016 00:36 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने आपल्या दोन वर्षाच्या कारकिर्दीचा हिशेब देशातील लोकांना दिला.

हंसराज अहीर यांचे प्रतिपादन : भद्रावती येथे द्विवर्षपूर्ती विकासपर्व कार्यक्रमाचे आयोजनचंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने आपल्या दोन वर्षाच्या कारकिर्दीचा हिशेब देशातील लोकांना दिला. लोकशाहीत अशाच प्रकारची संवेदनशीलता अभिप्रेत आहे. भाजपप्रणित सरकारने हे कर्तव्य पार पाडले, हाच खरा आदर्श आहे. प्रत्येक नागरिकांना त्यांच्या घटनादत्त अधिकारापासून वंचित होता कामा नये, हा दृष्टिकोन ठेवून मोदी सरकारने सर्व घटकातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. यात शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण, शहरी लोक, बेरोजगार, महिला, माजी सैनिक आदींचा समावेश आहे अशा सर्वांना सामावून घेणारे कार्य केंद्र सरकारच्या माध्यमातून अवघ्या दोन वर्षात पार पडले. देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.वरोरा विधानसभा क्षेत्रांतर्गत भद्रावती येथे शुक्रवारला पार पडलेल्या द्विवर्षपूर्ती कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमास वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार नाना श्यामकुळे, माजी पालकमंत्री संजय देवतळे, ज्येष्ठ नेते बळवंत गुंडावार, जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, वरोरा विधानसभा प्रमुख विजय राऊत, ज्येष्ठ नेते खुशाल बेंडे, जि.प. सदय विजय वानखेडे, देवराव भोंगळे, सुरेश महाजन, अशोक हजारे, डॉ. भगवान गायकवाड, बाबा भागडे, तुळशीराम श्रीरामे, ओम मांडवकर, राहुल सराफ, नरेंद्र जीवतोडे, सुरेश महाजन, रवींद्र नागपुरे, शेखर चौधरी, किशोर गोवारदिपे, विजय मोकासे, प्रवीण सातपुते, विकास खटी, प्रशांत डाखरे, गोपाल गोस्वाडे आदींचीे उपस्थिती होती.ना. हंसराज अहीर पुढे म्हणाले, पंतप्रधानांनी अत्यंत व्यापक दृष्टिकोन ठेवून अटल निवृत्ती वेतन, जनधन योजना, गॅस सबसीडी, सर्व समावेशक पीक विमा योजना, दिनदयाल ग्रामज्योती योजना, कृषी सिंचन योजना, स्वयं रोजगारासाठी मुद्रा बँक योजना व अनेक लोक कल्याणकार योजना देऊन देशाच्या विकासाला गतीशिलता दिली. स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व स्वयं रोजगाराला प्रोत्साहन, रासायनिक खतावर सबसीडी देवून वाढत्या भ्रष्टाचारावर अंकुश घातला, असे सांगत काँग्रेसच्या राजवटीत रस्त्याची कामे ३.५ कि.मी. व्हायची, गडकरींच्या मंत्रालयााने हिच कामे प्रतिदिन १८ कि.मी. करुन चमत्कार घडविला. संपुआच्या काळात देशात ६ वॉटर वे होते, आज मोदी सरकारने १०६ वॉटरवेला मंजुरी दिली. यामुळे भविष्यात जल वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढेल असेही ते म्हणाले.याप्रसंगी चंदनसिंह चंदेल, आमदार नाना शामकुळे, हरीश शर्मा, संजय देवतळे आदींनी केंद्र व राज्य सरकारच्या लोक हितकारी योजनांचा आपल्या भाषणातून परामर्श घेतला. मोदीजींच्या सरकारने अवघ्या दोन वर्षात विकासाचा जो टप्पा गाठला, ते कार्य सरकारच्या लोकहिताच्या धोरणांवर टीका करणाऱ्यांना कधीही साध्य झाले नाही, असेही या वक्त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल सराफ यांनी केले तर संचालन किशोर गोवारदिपे यांनी केले. या कार्यक्रमाला स्थानिक भाजपा पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, भाजपा कार्यकर्ते यांच्यासह परिसरातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)