शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अगरबत्ती निर्मितीचे दोन संच सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 22:43 IST

जिल्ह्यातील जंगला शेजारी राहणारे नागरिक व आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधी मिळाव्या यासाठी पोंभुर्णा येथे आंतरराष्ट्रीय कंपनीचा अगरबत्ती प्रकल्प निर्माण होणार आहे. ग्रामीण भागातील जनतेला रोजगार मिळवून देण्याच्या आपल्या अभिवचनाला पूर्ण करण्यासाठी राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुंबईत अगरबत्ती निर्मितीमधील अग्रणी आयटीसी कंपनीसोबत बैठक घेऊन प्रकल्प निमार्णाचा मार्ग मोकळा केला.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : आयटीसीच्या अगरबत्ती प्रकल्पाचे दिवाळीमध्ये पोंभुर्ण्यात लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील जंगला शेजारी राहणारे नागरिक व आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधी मिळाव्या यासाठी पोंभुर्णा येथे आंतरराष्ट्रीय कंपनीचा अगरबत्ती प्रकल्प निर्माण होणार आहे. ग्रामीण भागातील जनतेला रोजगार मिळवून देण्याच्या आपल्या अभिवचनाला पूर्ण करण्यासाठी राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुंबईत अगरबत्ती निर्मितीमधील अग्रणी आयटीसी कंपनीसोबत बैठक घेऊन प्रकल्प निमार्णाचा मार्ग मोकळा केला.चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचे वनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी त्यांना रोजगार देण्याचा मानस सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला होता. चंद्रपूर जिल्हा रोजगार युक्त जिल्हा म्हणून नावलौकिकास यावा यासाठी चंद्रपूरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात लघु उद्योगाला चालना दिली जात आहे. यातूनच अगरबत्ती उद्योग, डायमंड कटिंग सेंटर, टुथपिक निर्मिती केंद्र, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, बांबूवर आधारीत विविध वस्तूंना विक्रीसाठी उभे राहत असलेले विविध केंद्र, आदिवासी महिलांची कुक्कुटपालन कंपनी, असे अनेक उपक्रम जिल्ह्यात सध्या सुरू आहे.चंद्रपूर जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या बांबूपासून अगरबत्ती निर्मिती समूह तयार करण्याबाबत अनेक आंतरराष्ट्रीय अगरबत्ती निर्माण कंपनीशी वाटाघाटी सुरू होत्या. यामध्येच मंगलदिप या विविध सुगंधी अगरबत्ती ब्रॅण्डच्या व्यवसायातील नामांकित आयटीसी कंपनीसोबत बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही उच्चस्तरीय बैठक घेतली. आध्यात्मिक संस्कृतीला मानणाºया भारतामध्ये विदेशातून अगरबत्तीची आयात होऊ नये, तसेच या श्रद्धेच्या विषयाला जंगलातील आदिवासी बांधवांच्या श्रमाचा सुगंध असावा , त्यातून त्यांना अर्थाजन व्हावे या भावनेतून चंद्रपूरमध्ये अगरबत्ती निमार्णाचे काही प्रयोग यापूर्वी करण्यात आले आहे.आगरझरी व अन्य ठिकाणी छोट्या उद्योगसमूहाला चालना दिली आहे. त्यामुळे हा उद्योग करण्यासाठी पोभुर्णासारख्या आदिवासीबहुल भागाची निवड करावी, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले होते. आता या आंतरराष्ट्रीय कंपनीशी करार करण्यात आला आहे. आता पोंभुर्णा येथे अगरबत्ती निर्माण मधील प्राथमिक युनिट आणि पॅकेजिंग युनिट असे दोन संच सुरू केले जाणार आहे. येत्या दिवाळीपर्यंत पोंभुर्णातील हे काम पूर्णत्वास जाईल, अशी आशा देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली.सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीला नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, महाराष्ट्र राज्य बांबू विकास महामंडळाचे डीएसके रेड्डी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, आयटीसी रिजनल मॅनेजर आशिष पॉल, आयटीसी अगरबत्ती चेन्नईचे उपाध्यक्ष सौंदर राजन, सचिन गुप्ता उपस्थित होते.