शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

दोन कोटी वृक्षलागवड हा इव्हेंट नव्हे तर संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2016 01:09 IST

राज्यात दोन कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प यंदा घेतला आहे. हा सर्वानी यशस्वी करायचा आहे.

सुधीर मुनगंटीवार : चंद्रपूर जिल्ह्यात लावणार १५ लाखांवर वृक्षचंद्रपूर : राज्यात दोन कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प यंदा घेतला आहे. हा सर्वानी यशस्वी करायचा आहे. याकडे इव्हेंट म्हणून न बघता संकल्प म्हणून बघा, असे आवाहन वनमंत्री तथा राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी केले.१ जुलै रोजी राज्य सरकारच्या माध्यामातून राज्यभर दोन कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प सरकारने आखला आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आमदार नाना श्यामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकुपाचे क्षेत्र संचालक जे.पी. गरड, महावितरण विभागाचे मुख्य व्यवस्थापक दिलीप घुगल, वनविकास महामंडळाचीे व्यवस्थापक डोळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या उपक्रमाची माहिती देताना मुनगंटीवार म्हणाले, वनविभागाची या मोहिमेसंदर्भातील कामगिरी वाखाणण्यासारखी आहे. वाटपासाठी दोन कोटी रोपे तयार आहेत. खड्डेही खोदून तयार आहेत. मात्र जेवढी रोपे लावली जातील, त्यातील किमान ८० ते ८५ टक्के जगविणे हे आता आपले सर्वांचे काम आणि जबाबदारी राहणार आहे.निसर्ग वाचला तर माणूस वाचेल, हे ओळखून वन आणि वृक्षांचे जतन करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. यासाठी केवळ वनविभागच नाही तर सर्व स्तरातील नागरिक, सामाजिक संस्था, विद्यार्थी, नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याची गरज आहे. सैन्य दलाच्या इको बटालियनच्या माध्यामातूनही मोठया प्रमाणावर वृक्षलागवड होणार असल्याचे त्यांनी सांगितले.चंद्रपूर जिल्ह्यात वनविभागाकडून १५ लाख ५५ हजार वृक्षांची लागवड केली जाणार असल्याची माहिती यावेळी ना. मुनगंटीवारांनी दिली. मध्य चांदा वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनीही या उपक्रमात असलेल्या सहभागाची माहिती दिली . ते म्हणाले, १५ लाख ५५ हजार वृक्षांची लागवड जिल्ह्यात केली जाणार आहे. वनविभागाने १० हजार, वनविकास महामंडळाने ७० हजार, सामाजिक वनिकरण विभागाने ७० हजार या सोबतच विविध सामाजिक संस्थांनीही रोपट्यांची मागणी केली असून त्यानुसार नियोजन केले आहे. वनविभागाच्या २२ रोपवाटिका असून त्यांनाही या उपक्रमाबाबत कळविले आहे. १ जुलैच्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयकांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी समित्या स्थापन केल्या असून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळा घेतल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी आमदार नाना श्यामकुळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदेल यांनीही उपक्रमाविषयी माहिती दिली. (जिल्हा प्रतिनिधी)