शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

दोन कोटी वृक्षलागवड हा इव्हेंट नव्हे तर संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2016 01:09 IST

राज्यात दोन कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प यंदा घेतला आहे. हा सर्वानी यशस्वी करायचा आहे.

सुधीर मुनगंटीवार : चंद्रपूर जिल्ह्यात लावणार १५ लाखांवर वृक्षचंद्रपूर : राज्यात दोन कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प यंदा घेतला आहे. हा सर्वानी यशस्वी करायचा आहे. याकडे इव्हेंट म्हणून न बघता संकल्प म्हणून बघा, असे आवाहन वनमंत्री तथा राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी केले.१ जुलै रोजी राज्य सरकारच्या माध्यामातून राज्यभर दोन कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प सरकारने आखला आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आमदार नाना श्यामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकुपाचे क्षेत्र संचालक जे.पी. गरड, महावितरण विभागाचे मुख्य व्यवस्थापक दिलीप घुगल, वनविकास महामंडळाचीे व्यवस्थापक डोळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या उपक्रमाची माहिती देताना मुनगंटीवार म्हणाले, वनविभागाची या मोहिमेसंदर्भातील कामगिरी वाखाणण्यासारखी आहे. वाटपासाठी दोन कोटी रोपे तयार आहेत. खड्डेही खोदून तयार आहेत. मात्र जेवढी रोपे लावली जातील, त्यातील किमान ८० ते ८५ टक्के जगविणे हे आता आपले सर्वांचे काम आणि जबाबदारी राहणार आहे.निसर्ग वाचला तर माणूस वाचेल, हे ओळखून वन आणि वृक्षांचे जतन करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. यासाठी केवळ वनविभागच नाही तर सर्व स्तरातील नागरिक, सामाजिक संस्था, विद्यार्थी, नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याची गरज आहे. सैन्य दलाच्या इको बटालियनच्या माध्यामातूनही मोठया प्रमाणावर वृक्षलागवड होणार असल्याचे त्यांनी सांगितले.चंद्रपूर जिल्ह्यात वनविभागाकडून १५ लाख ५५ हजार वृक्षांची लागवड केली जाणार असल्याची माहिती यावेळी ना. मुनगंटीवारांनी दिली. मध्य चांदा वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनीही या उपक्रमात असलेल्या सहभागाची माहिती दिली . ते म्हणाले, १५ लाख ५५ हजार वृक्षांची लागवड जिल्ह्यात केली जाणार आहे. वनविभागाने १० हजार, वनविकास महामंडळाने ७० हजार, सामाजिक वनिकरण विभागाने ७० हजार या सोबतच विविध सामाजिक संस्थांनीही रोपट्यांची मागणी केली असून त्यानुसार नियोजन केले आहे. वनविभागाच्या २२ रोपवाटिका असून त्यांनाही या उपक्रमाबाबत कळविले आहे. १ जुलैच्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयकांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी समित्या स्थापन केल्या असून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळा घेतल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी आमदार नाना श्यामकुळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदेल यांनीही उपक्रमाविषयी माहिती दिली. (जिल्हा प्रतिनिधी)